शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

जिल्ह्यासाठी ८४ कोटी ७१ लाखांचा परतावा, प्रथमच भरघोस परतावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 1:53 PM

महाराष्ट्र शासनाने हवामानावर आधारित सुरू केलेल्या फळपीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील १८,५६९ शेतकऱ्यांनी १७ हजार १४ हेक्टर क्षेत्रासाठी फळपीक विमा योजनेचा लाभ घेतला होता. जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदारांना ८४ कोटी ७१ लाख २२ हजार रुपयांचा परतावा जाहीर झाला असून, शेतकऱ्यांच्या खात्यात परताव्याची रक्कम जमा झाली आहे.

ठळक मुद्देफळपीक विमा योजनेअंतर्गत दिलासा, शेतकरी समाधानीकेंद्राच्या हिश्शामुळे परताव्याला उशीर

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाने हवामानावर आधारित सुरू केलेल्या फळपीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील १८,५६९ शेतकऱ्यांनी १७ हजार १४ हेक्टर क्षेत्रासाठी फळपीक विमा योजनेचा लाभ घेतला होता. जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदारांना ८४ कोटी ७१ लाख २२ हजार रुपयांचा परतावा जाहीर झाला असून, शेतकऱ्यांच्या खात्यात परताव्याची रक्कम जमा झाली आहे.हवामानावर आधारित असलेल्या फळपीक विमा योजनेंतर्गत केंद्र शासनाने हिश्शाची रक्कम न भरल्यानेच परतावा अद्याप रखडला होता. परंतु यावर्षी जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच भरघोस परतावा शासनाने जाहीर केला आहे.

स्वयंचलित हवामान केंद्राच्या अहवालानुसार शेतकरी लाभार्थी निश्चित करण्यात आले असून, परतावा जाहीर झाल्याने विमा कंपनीकडून खातेदारांची बँकनिहाय यादी जाहीर करून लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात फळपीक परताव्याची रक्कम जमा करण्यास प्रारंभ झाला आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील १८,१९८ आंबा बागायतदारांनी १४,७५५ हेक्टरसाठी ८ कोटी ९२ लाख रुपये प्रीमियम भरला होता. सर्वच्या सर्व आंबा बागायतदारांना परतावा प्राप्त झाला असून, परताव्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे.

१८,१५८ आंबा बागायतदारांच्या खात्यात ८४ कोटी ३३ लाख रुपये जमा झाले आहेत. जिल्ह्यातील २,७४० काजू बागायतदारांनी २,२५९ हेक्टर क्षेत्रावरील विमा उतरविला होता. त्यासाठी ९६ लाख चार हजार प्रीमियम भरला होता. त्यातील केवळ ३७१ शेतकऱ्यांना ३८ लाख २२ हजार परतावा जाहीर झाला आहे. काजू उत्पादक शेतकऱ्यांना मात्र परतावा कमी प्राप्त झाला आहे.गतवर्षी जानेवारीअखेरीस तापमानात मोठी घट झाली होती. मे महिन्यात अवेळी पाऊस झाला होता. मार्च महिन्यातही तापमानात वाढ झाली होती. परिणामी वातावरणातील बदलामुळे उत्पादनावर परिणाम झाला होता. शिवाय कोरोनामुळे आंबा विक्रीवरही परिणाम झाला होता. यंदा शेतकऱ्यांना पहिल्यांदाच भरघोस परतावा प्राप्त झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.गतवर्षी ऑगस्टमध्ये फळपीक विमा योजनेचा परतावा जाहीर झाला होता. यावर्षी सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना परताव्यासाठी प्रतीक्षा करावी लागली. काजू उत्पादकांमध्ये नाराजी असून, आंबा उत्पादकांना मात्र परताव्याने तारले आहे. सन २०१७ - १८मध्ये जिल्ह्यातील १४,२७८ शेतकऱ्यांना ५५ कोटी १२ लाख ६३ हजार ७०४ रुपयांचा परतावा देण्यात आला.

त्यानंतर यावर्षी ८४ कोटी ७१ लाख २२ हजारांचा परतावा जाहीर झाला आहे. जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात फळपीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना परतावा मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाकडून दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRatnagiriरत्नागिरी