शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

दोन दिवसात धावल्या २६७ गाड्या, उत्पन्नात मात्र घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 4:30 AM

Ratnagiri StateTransport: शासनाने कोरोना संसर्ग टाळण्यासाठी वीकेंड लाॅकडाऊन घोषित केला होता. अत्यावश्यक सेवा म्हणून एस.टी.ला लाॅकडाऊनमधून वगळण्यात आले होते. पण नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करीत, घराबाहेर पडणेच टाळले. त्यामुळे शनिवार, रविवार या दोन दिवसात प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी एस.टी.च्या सेवेवर परिणाम झाला.

ठळक मुद्देदोन दिवसात धावल्या २६७ गाड्या, उत्पन्नात मात्र घट प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी एस.टी.च्या सेवेवर परिणाम

मेहरून नाकाडे

रत्नागिरी : शासनाने कोरोना संसर्ग टाळण्यासाठी वीकेंड लाॅकडाऊन घोषित केला होता. अत्यावश्यक सेवा म्हणून एस.टी.ला लाॅकडाऊनमधून वगळण्यात आले होते. पण नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करीत, घराबाहेर पडणेच टाळले. त्यामुळे शनिवार, रविवार या दोन दिवसात प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी एस.टी.च्या सेवेवर परिणाम झाला.

गेल्या दोन दिवसात बहुतांश मार्गावरील फेऱ्या रद्द करण्यात आल्या. शिवाय दोन दिवसात जेमतेम २६१ फेऱ्या केल्या. प्रवासी भारमानही फारसे लाभले नसल्याने उत्पन्नात घट झाली. गतवर्षी लाॅकडाऊनमुळे एस.टी.च्या उत्पन्नावर चांगलाच परिणाम झाला होता. हळूहळू उत्पन्नाची गाडी रुळावर येत असताना, पुन्हा रत्नागिरी विभागाला आर्थिक झळ सोसावी लागत आहे.

  • आगारातील एकूण बसेसची संख्या ६००
  • दोन दिवसात धावलेल्या बसेस २६७
  • फेऱ्या झाल्या आगारामध्ये ८८२
  • पैसे मिळाले दोन दिवसात २४०६४३१
  • दोन दिवसात ७५ लाखांचा तोटा 

 दैनंदिन ६०० गाड्यांद्वारे ४ हजार २०० फेऱ्यांद्वारे दोन ते सव्वादोन लाख प्रवाशांची वाहतूक करण्यात येत असल्यामुळे ५० लाखांपर्यंत उत्पन्न रत्नागिरी विभागाला प्राप्त होत आहे.मात्र शनिवारी ६८१, तर रविवारी २०१ फेऱ्या संपूर्ण विभागात होऊ शकल्या. त्यामुळे शनिवारी ३७ हजार ६२०, तर रविवारी ४५२० प्रवाशांनी प्रवास केला. दोन दिवसात अवघ्या ४२१४० प्रवाशांनी प्रवास केला. दोन दिवसात २४ लाख ६४३१ रुपयांचे उत्पन्न लाभले आहे. मात्र दैनंदिन उत्पन्नाच्या तुलनेत ७५ लाख ९३ हजार ५६९ रुपयांचा तोटा विभागाला सोसावा लागत आहे.

निम्मेच कर्मचारी कामावर

शनिवारी ४०२ व रविवारी १३२, असे मिळून एकूण ५३४ चालक, वाहक कामावर होते. अन्य कर्मचाऱ्यांना मात्र सुटी देण्यात आली होती. वीकेंड लाॅकडाऊनमुळे प्रवाशांअभावी वाहतूक ठप्प झाली होती. कोरोना संसर्गाचा धोका असतानाही सेवेवर असणाऱ्या चालक, वाहकांनी सेवा बजावली. वाहकांचा तर प्रवाशांशी संपर्क येतच असल्याने खबरदारी घ्यावी लागते.

शासन आदेशाचे पालन करीत एस.टी.ची सेवा सुरू ठेवण्यात आली होती. मात्र प्रवासी भारमानाअभावी एस.टी.च्या सेवेवर परिणाम झाला आहे. सोमवारी मात्र बऱ्यापैकी प्रवासी प्रतिसाद लाभला.- सुनील भोकरे,विभाग नियंत्रक, रत्नागिरी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याstate transportएसटीRatnagiriरत्नागिरी