शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
Daily Top 2Weekly Top 5

लोकांनी परिवर्तनाचा मूड तयार केलाय, काँग्रेसला निरोप देण्याचं ठरवलंय - अमित शाह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 12:27 IST

राजस्थानच्या लोकांनी परिवर्तनाचा मूड तयार केला आहे. लोकांनी काँग्रेसला निरोप देण्याचे ठरवले आहे, असे अमित शाह म्हणाले.

जयपूर : राजस्थान विधानसभेच्या मतदानाचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. राजस्थानमध्ये २५ नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेला प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे. याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राजस्थानमध्ये पुढील सरकार भाजपचे स्थापन होणार आहे. राजस्थानच्या लोकांनी परिवर्तनाचा मूड तयार केला आहे. लोकांनी काँग्रेसला निरोप देण्याचे ठरवले आहे, असे अमित शाह म्हणाले.

राजस्थानच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील लोकांनी परिवर्तनाचा मूड तयार केला आहे. राजस्थानच्या जनतेने प्रत्येक क्षेत्रात अपयशी आणि अपयशी ठरलेल्या काँग्रेस सरकारला निरोप देण्याचे मन बनवले आहे. मी संपूर्ण राजस्थानचा दौरा केला आहे. त्यामुळे मी आत्मविश्वासाने सांगू इच्छितो की, राजस्थानमध्ये पुढील सरकार भाजपचेच स्थापन होईल. केंद्रातील भाजपच्या नरेंद्र मोदी सरकारने राजस्थानमधील कोट्यवधी लाभार्थ्यांना केंद्रीय योजनांचा थेट लाभ पारदर्शक पद्धतीने दिला आहे, असे अमित शाह यांनी सांगितले. तसेच, राजस्थान नेहमीच मोदीजींच्या पाठीशी उभा राहिला आहे आणि भाजपला पाठिंबा दिला आहे. राजस्थानच्या जनतेने लोकसभेच्या २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपला सर्व जागा देऊन मोदीजींना नेहमीच पाठिंबा दिला आहे, असे अमित शाह म्हणाले. 

याचबरोबर, अमित शाह यांनी राजस्थानमधील काँग्रेस सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, सालासर येथील राम दरबारावर बुलडोझर चालवण्यात आला. अलवरमधील शिवलिंग ड्रिलिंग मशीनने फोडले. काठुमारमध्ये गोठ्यावर बुलडोझर फिरवला, अशा तुष्टीकरणाची अनेक प्रकरणे राजस्थानमध्ये पाहायला मिळाली आहेत. गेहलोत सरकारमध्ये तुष्टीकरणाचे राजकारण शिगेला पोहोचले आहे. गेल्या ५ वर्षांत छाबरा, भिलवाडा, करौली, जोधपूर, चित्तोडगड, नोहर, मेवात, मालपुरा, जयपूर येथे नियोजित दंगली झाल्या. व्होट बँकेच्या राजकारणामुळे गेहलोत सरकारने दंगलखोरांवर कोणतीही ठोस कारवाई केली नाही, असेही अमित शाह म्हणाले.

दरम्यान, राजस्थानमध्ये प्रामुख्याने काँग्रेस आणि भाजपमध्ये लढल्या जात असलेल्या निवडणुकीच्या प्रचारात अनेक राष्ट्रीय व स्थानिक मुद्द्यांवर भर दिला जात आहे. परंतु संपूर्ण निवडणूक ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याभोवतीच केंद्रित झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता ही भाजपसाठी राजस्थानसह अन्य राज्यांमध्ये मोठी ताकद मानली जात आहे, दुसरीकडे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे त्यांनी राबविलेल्या कल्याणकारी योजना आणि गॅरंटीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच, भाजपने मुख्यमंत्रिपदासाठी वसुंधराराजे यांचे नाव जाहीर केले नसले, तरी सध्या त्यांच्याच नावाची चर्चा राज्यातील मतदारांमध्ये  सुरू आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शाहRajasthanराजस्थानRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपाElectionनिवडणूक