शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

लोकांनी परिवर्तनाचा मूड तयार केलाय, काँग्रेसला निरोप देण्याचं ठरवलंय - अमित शाह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 12:27 IST

राजस्थानच्या लोकांनी परिवर्तनाचा मूड तयार केला आहे. लोकांनी काँग्रेसला निरोप देण्याचे ठरवले आहे, असे अमित शाह म्हणाले.

जयपूर : राजस्थान विधानसभेच्या मतदानाचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. राजस्थानमध्ये २५ नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेला प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे. याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राजस्थानमध्ये पुढील सरकार भाजपचे स्थापन होणार आहे. राजस्थानच्या लोकांनी परिवर्तनाचा मूड तयार केला आहे. लोकांनी काँग्रेसला निरोप देण्याचे ठरवले आहे, असे अमित शाह म्हणाले.

राजस्थानच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील लोकांनी परिवर्तनाचा मूड तयार केला आहे. राजस्थानच्या जनतेने प्रत्येक क्षेत्रात अपयशी आणि अपयशी ठरलेल्या काँग्रेस सरकारला निरोप देण्याचे मन बनवले आहे. मी संपूर्ण राजस्थानचा दौरा केला आहे. त्यामुळे मी आत्मविश्वासाने सांगू इच्छितो की, राजस्थानमध्ये पुढील सरकार भाजपचेच स्थापन होईल. केंद्रातील भाजपच्या नरेंद्र मोदी सरकारने राजस्थानमधील कोट्यवधी लाभार्थ्यांना केंद्रीय योजनांचा थेट लाभ पारदर्शक पद्धतीने दिला आहे, असे अमित शाह यांनी सांगितले. तसेच, राजस्थान नेहमीच मोदीजींच्या पाठीशी उभा राहिला आहे आणि भाजपला पाठिंबा दिला आहे. राजस्थानच्या जनतेने लोकसभेच्या २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपला सर्व जागा देऊन मोदीजींना नेहमीच पाठिंबा दिला आहे, असे अमित शाह म्हणाले. 

याचबरोबर, अमित शाह यांनी राजस्थानमधील काँग्रेस सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, सालासर येथील राम दरबारावर बुलडोझर चालवण्यात आला. अलवरमधील शिवलिंग ड्रिलिंग मशीनने फोडले. काठुमारमध्ये गोठ्यावर बुलडोझर फिरवला, अशा तुष्टीकरणाची अनेक प्रकरणे राजस्थानमध्ये पाहायला मिळाली आहेत. गेहलोत सरकारमध्ये तुष्टीकरणाचे राजकारण शिगेला पोहोचले आहे. गेल्या ५ वर्षांत छाबरा, भिलवाडा, करौली, जोधपूर, चित्तोडगड, नोहर, मेवात, मालपुरा, जयपूर येथे नियोजित दंगली झाल्या. व्होट बँकेच्या राजकारणामुळे गेहलोत सरकारने दंगलखोरांवर कोणतीही ठोस कारवाई केली नाही, असेही अमित शाह म्हणाले.

दरम्यान, राजस्थानमध्ये प्रामुख्याने काँग्रेस आणि भाजपमध्ये लढल्या जात असलेल्या निवडणुकीच्या प्रचारात अनेक राष्ट्रीय व स्थानिक मुद्द्यांवर भर दिला जात आहे. परंतु संपूर्ण निवडणूक ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याभोवतीच केंद्रित झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता ही भाजपसाठी राजस्थानसह अन्य राज्यांमध्ये मोठी ताकद मानली जात आहे, दुसरीकडे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे त्यांनी राबविलेल्या कल्याणकारी योजना आणि गॅरंटीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच, भाजपने मुख्यमंत्रिपदासाठी वसुंधराराजे यांचे नाव जाहीर केले नसले, तरी सध्या त्यांच्याच नावाची चर्चा राज्यातील मतदारांमध्ये  सुरू आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शाहRajasthanराजस्थानRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपाElectionनिवडणूक