शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लोकांनी परिवर्तनाचा मूड तयार केलाय, काँग्रेसला निरोप देण्याचं ठरवलंय - अमित शाह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 12:27 IST

राजस्थानच्या लोकांनी परिवर्तनाचा मूड तयार केला आहे. लोकांनी काँग्रेसला निरोप देण्याचे ठरवले आहे, असे अमित शाह म्हणाले.

जयपूर : राजस्थान विधानसभेच्या मतदानाचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. राजस्थानमध्ये २५ नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेला प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे. याआधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राजस्थानमध्ये पुढील सरकार भाजपचे स्थापन होणार आहे. राजस्थानच्या लोकांनी परिवर्तनाचा मूड तयार केला आहे. लोकांनी काँग्रेसला निरोप देण्याचे ठरवले आहे, असे अमित शाह म्हणाले.

राजस्थानच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील लोकांनी परिवर्तनाचा मूड तयार केला आहे. राजस्थानच्या जनतेने प्रत्येक क्षेत्रात अपयशी आणि अपयशी ठरलेल्या काँग्रेस सरकारला निरोप देण्याचे मन बनवले आहे. मी संपूर्ण राजस्थानचा दौरा केला आहे. त्यामुळे मी आत्मविश्वासाने सांगू इच्छितो की, राजस्थानमध्ये पुढील सरकार भाजपचेच स्थापन होईल. केंद्रातील भाजपच्या नरेंद्र मोदी सरकारने राजस्थानमधील कोट्यवधी लाभार्थ्यांना केंद्रीय योजनांचा थेट लाभ पारदर्शक पद्धतीने दिला आहे, असे अमित शाह यांनी सांगितले. तसेच, राजस्थान नेहमीच मोदीजींच्या पाठीशी उभा राहिला आहे आणि भाजपला पाठिंबा दिला आहे. राजस्थानच्या जनतेने लोकसभेच्या २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपला सर्व जागा देऊन मोदीजींना नेहमीच पाठिंबा दिला आहे, असे अमित शाह म्हणाले. 

याचबरोबर, अमित शाह यांनी राजस्थानमधील काँग्रेस सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, सालासर येथील राम दरबारावर बुलडोझर चालवण्यात आला. अलवरमधील शिवलिंग ड्रिलिंग मशीनने फोडले. काठुमारमध्ये गोठ्यावर बुलडोझर फिरवला, अशा तुष्टीकरणाची अनेक प्रकरणे राजस्थानमध्ये पाहायला मिळाली आहेत. गेहलोत सरकारमध्ये तुष्टीकरणाचे राजकारण शिगेला पोहोचले आहे. गेल्या ५ वर्षांत छाबरा, भिलवाडा, करौली, जोधपूर, चित्तोडगड, नोहर, मेवात, मालपुरा, जयपूर येथे नियोजित दंगली झाल्या. व्होट बँकेच्या राजकारणामुळे गेहलोत सरकारने दंगलखोरांवर कोणतीही ठोस कारवाई केली नाही, असेही अमित शाह म्हणाले.

दरम्यान, राजस्थानमध्ये प्रामुख्याने काँग्रेस आणि भाजपमध्ये लढल्या जात असलेल्या निवडणुकीच्या प्रचारात अनेक राष्ट्रीय व स्थानिक मुद्द्यांवर भर दिला जात आहे. परंतु संपूर्ण निवडणूक ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याभोवतीच केंद्रित झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता ही भाजपसाठी राजस्थानसह अन्य राज्यांमध्ये मोठी ताकद मानली जात आहे, दुसरीकडे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे त्यांनी राबविलेल्या कल्याणकारी योजना आणि गॅरंटीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच, भाजपने मुख्यमंत्रिपदासाठी वसुंधराराजे यांचे नाव जाहीर केले नसले, तरी सध्या त्यांच्याच नावाची चर्चा राज्यातील मतदारांमध्ये  सुरू आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शाहRajasthanराजस्थानRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपाElectionनिवडणूक