शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

"मोदींनी माझ्या भविष्याची चिंता करू नये", सचिन पायलट यांचे प्रत्युत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 13:52 IST

सचिन पायलट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विधान तथ्यापलीकडचे असल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल काँग्रेस नेते सचिन पायलट यांचे वडील राजेश पायलट यांचा उल्लेख करून काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. दरम्यान, काँग्रेसमध्ये कोणी खरे बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याला संपवले जाते, असा घणाघाती आरोप नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील भिलवाडा येथील प्रचारसभेत केला होता. तसेच, काँग्रेसमधील कुटुंबासमोर कोणीही काहीही बोलले की, तो संपलाच. एकेकाळी राजेश पायलट यांनी काँग्रेसच्या भल्यासाठी त्यांना आव्हान दिले होते, परंतु त्यांना ते आवडले नाही आणि आज ते त्यांच्या मुलाला त्याची शिक्षा देत आहेत, असे नरेंद्र मोदींनी गांधी कुटुंबाचे नाव न घेता म्हटले होते. यावर आता माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

सचिन पायलट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विधान तथ्यापलीकडचे असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, "वास्तविक सत्य हे आहे की, दिवंगत पायलट साहेब इंदिरा गांधींच्या प्रेरणेने लोकसेवेसाठी काँग्रेसमध्ये आले होते. त्यांनी दीर्घकाळ जनतेची सेवा केली आणि आयुष्यभर जातीयवादी शक्तींविरुद्ध लढा दिला." याचबरोबर, काँग्रेस पक्ष सचिन पायलट यांना शिक्षा करत असल्याच्या नरेंद्र मोदींच्या दाव्यावर त्यांनी पलटवार केला आहे. "मला वाटते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्या वर्तमान आणि भविष्याची चिंता करू नये. माझा पक्ष आणि जनता याची काळजी घेईल. भाजपकडे देशासाठी कोणताही रोडमॅप नाही, त्यामुळे नरेंद्र मोदी महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लोकांचे लक्ष वळवण्यासाठी अशा गोष्टी बोलत आहेत", असे सचिन पायलट यांनी सांगितले.

दरम्यान, राजेश पायलट यांचा हवाला देत भिलवाडा येथील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उल्लेख केलेली एक घटना १९९७ ची आहे. त्यावेळी काँग्रेस पक्षाने अध्यक्षपदासाठी निवडणूक घेतली होती. त्यावेळी पक्षात सीताराम केशरी यांचे खूप कौतुक झाले होते, पण अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजेश पायलट यांनी सीताराम केशरी यांना आव्हान दिले होते. त्यांना जिंकणे शक्य नाही हे माहीत असतानाही त्यांनी 'पक्ष वाचवण्याच्या' नावाखाली निवडणूक लढवली होती. यानंतर राजेश पायलट यांनी पक्षाच्या हायकमांडचा पाठिंबा गमावल्याचे बोलले जात होते.

मोदी, गेहलोत आणि वसुंधरा यांचीच चर्चाराजस्थानमध्ये २५ नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असलेला प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे. राजस्थानमध्ये प्रामुख्याने काँग्रेस आणि भाजपमध्ये लढल्या जात असलेल्या निवडणुकीच्या प्रचारात अनेक राष्ट्रीय व स्थानिक मुद्द्यांवर भर दिला जात आहे. परंतु संपूर्ण निवडणूक ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याभोवतीच केंद्रित झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता ही भाजपसाठी राजस्थानसह अन्य राज्यांमध्ये मोठी ताकद मानली जात आहे, दुसरीकडे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे त्यांनी राबविलेल्या कल्याणकारी योजना आणि गॅरंटीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच, भाजपने मुख्यमंत्रिपदासाठी वसुंधराराजे यांचे नाव जाहीर केले नसले, तरी सध्या त्यांच्याच नावाची चर्चा राज्यातील मतदारांमध्ये  सुरू आहे. 

टॅग्स :Sachin Pilotसचिन पायलटRajasthanराजस्थानRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस