शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

...तर भाजपसमोर पर्यायच नसणार; मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी वसुंधरा राजेंचा खास प्लॅन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 13:46 IST

राजस्थानात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यास पक्षाकडून वसुंधरा राजेंच्या जागी दुसऱ्या एखाद्या नेत्याला मुख्यमंत्रिपदाची संधी दिली जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

जयपूर :राजस्थान विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून आता सगळ्यांचं लक्ष ३ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागलं आहे. राजस्थानाची सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेस आणि भाजप या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये जोरदार रस्सीखेच आहे. अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसला पुन्हा सत्तेत येण्याची आशा आहे, तर काँग्रेसला पराभूत करत राजस्थानात आपलं सरकार येईल, असा भाजपचा दावा आहे. मात्र दोन्ही पक्षांनी ही निवडणूक अत्यंत ताकदीने लढवली असल्याने कोणत्याही एका पक्षाला बहुमताचा जादुई आकडा गाठणं शक्य होईल की नाही, याबाबत साशंकता आहे. या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवारांची भूमिका महत्त्वाची ठरणार असून या अपक्ष निवडून येणाऱ्या आमदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी निकालाआधीच भाजप आणि काँग्रेसकडून रणनीती आखली जात आहे. भाजप नेत्या आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे यांनीही यासाठी कंबर कसली आहे.

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून वसुंधरा राजेंचे पंख छाटण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा निवडणूक काळात राजस्थानच्या राजकीय वर्तुळात रंगत होती. भाजपला राजस्थानात स्पष्ट बहुमत मिळाल्यास पक्षाकडून वसुंधरा राजेंऐवजी दुसऱ्या एखाद्या नेत्याला मुख्यमंत्रिपदाची संधी दिली जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. मात्र बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश आल्यास आणि पक्षावर अपक्ष आमदारांची जुळवाजुळव करण्याची वेळ आल्यास वसुंधरा राजे पुन्हा एकदा गेमचेंजर ठरू शकतात. त्यामुळे वसुंधरा राजे यांनी आतापासून तयारी सुरू केली असून भाजपमध्ये बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांशी त्यांनी संपर्क साधण्यास सुरुवात केल्याचे समजते.

राजस्थानात कोणत्या पक्षात किती बंडखोर?

राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना बंडखोरीचा सामना करावा लागला. भाजपच्या ३२ तर काँग्रेसच्या २२ बंडखोरांनी निवडणूक लढवली. भाजपच्या ३२ बंडखोरांपैकी २० उमेदवार हे वसुंधरा राजे यांचे समर्थक असल्याचे बोलले जाते. यातील डझनभर उमेदवार निवडणूक आले तर निकालानंतर ते वसुंधरा राजे मुख्यमंत्री व्हाव्यात, यासाठी मोर्चेबांधणी करू शकतात. 

२०१८ची पुनरावृत्ती होणार?

यंदा निवडणूक काळात वसुंधरा राजेंनी राज्यभरात झंझावाती प्रचार केला होता. मात्र पक्षातून बंडखोरी करत निवडणूक लढवत असलेल्या आपल्या समर्थकांच्या मतदारसंघात त्या भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी गेल्या नव्हत्या. या बंडखोरांपैकी जे उमेदवार निवडून येतील ते वसुंधरा राजेंना भाजपने मुख्यमंत्रिपदाची संधी दिली तरंच ते पक्षासोबत येतील, अन्यथा त्यांच्यासमोर काँग्रेसचा पर्यायही असणार आहे. २०१८च्या निवडणुकीत काँग्रेसलाही बहुमतासाठी बाहेरच्या एका आमदाराची गरज लागली होती. त्यामुळे सचिन पायलट यांच्या नावाची मुख्यमंत्रिपदासाठी चर्चा असतानाही अपक्षांची जमवाजमव करणाऱ्या अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्रिपद देण्याशिवाय काँग्रेसकडे पर्याय उरला नाही. यावेळी भाजपच्या बाबतीत अशी परिस्थिती निर्माण होऊन पक्ष बहुमतापासून दूर राहिल्यास आणि अपक्षांना सोबत घेण्याची गरज भासल्यास वसुंधरा राजे यांच्यासमोर पुन्हा मुख्यमंत्री होण्याची संधी चालून येणार आहे. त्यामुळे ही संधी दवडली जाऊ नये, यासाठी त्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली असून निकालात नेमकं काय होतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकRajasthanराजस्थानAshok Gahlotअशोक गहलोतBJPभाजपाcongressकाँग्रेस