शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

...तर भाजपसमोर पर्यायच नसणार; मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी वसुंधरा राजेंचा खास प्लॅन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 13:46 IST

राजस्थानात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यास पक्षाकडून वसुंधरा राजेंच्या जागी दुसऱ्या एखाद्या नेत्याला मुख्यमंत्रिपदाची संधी दिली जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

जयपूर :राजस्थान विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून आता सगळ्यांचं लक्ष ३ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागलं आहे. राजस्थानाची सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेस आणि भाजप या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये जोरदार रस्सीखेच आहे. अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसला पुन्हा सत्तेत येण्याची आशा आहे, तर काँग्रेसला पराभूत करत राजस्थानात आपलं सरकार येईल, असा भाजपचा दावा आहे. मात्र दोन्ही पक्षांनी ही निवडणूक अत्यंत ताकदीने लढवली असल्याने कोणत्याही एका पक्षाला बहुमताचा जादुई आकडा गाठणं शक्य होईल की नाही, याबाबत साशंकता आहे. या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवारांची भूमिका महत्त्वाची ठरणार असून या अपक्ष निवडून येणाऱ्या आमदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी निकालाआधीच भाजप आणि काँग्रेसकडून रणनीती आखली जात आहे. भाजप नेत्या आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे यांनीही यासाठी कंबर कसली आहे.

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून वसुंधरा राजेंचे पंख छाटण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा निवडणूक काळात राजस्थानच्या राजकीय वर्तुळात रंगत होती. भाजपला राजस्थानात स्पष्ट बहुमत मिळाल्यास पक्षाकडून वसुंधरा राजेंऐवजी दुसऱ्या एखाद्या नेत्याला मुख्यमंत्रिपदाची संधी दिली जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. मात्र बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश आल्यास आणि पक्षावर अपक्ष आमदारांची जुळवाजुळव करण्याची वेळ आल्यास वसुंधरा राजे पुन्हा एकदा गेमचेंजर ठरू शकतात. त्यामुळे वसुंधरा राजे यांनी आतापासून तयारी सुरू केली असून भाजपमध्ये बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांशी त्यांनी संपर्क साधण्यास सुरुवात केल्याचे समजते.

राजस्थानात कोणत्या पक्षात किती बंडखोर?

राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना बंडखोरीचा सामना करावा लागला. भाजपच्या ३२ तर काँग्रेसच्या २२ बंडखोरांनी निवडणूक लढवली. भाजपच्या ३२ बंडखोरांपैकी २० उमेदवार हे वसुंधरा राजे यांचे समर्थक असल्याचे बोलले जाते. यातील डझनभर उमेदवार निवडणूक आले तर निकालानंतर ते वसुंधरा राजे मुख्यमंत्री व्हाव्यात, यासाठी मोर्चेबांधणी करू शकतात. 

२०१८ची पुनरावृत्ती होणार?

यंदा निवडणूक काळात वसुंधरा राजेंनी राज्यभरात झंझावाती प्रचार केला होता. मात्र पक्षातून बंडखोरी करत निवडणूक लढवत असलेल्या आपल्या समर्थकांच्या मतदारसंघात त्या भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी गेल्या नव्हत्या. या बंडखोरांपैकी जे उमेदवार निवडून येतील ते वसुंधरा राजेंना भाजपने मुख्यमंत्रिपदाची संधी दिली तरंच ते पक्षासोबत येतील, अन्यथा त्यांच्यासमोर काँग्रेसचा पर्यायही असणार आहे. २०१८च्या निवडणुकीत काँग्रेसलाही बहुमतासाठी बाहेरच्या एका आमदाराची गरज लागली होती. त्यामुळे सचिन पायलट यांच्या नावाची मुख्यमंत्रिपदासाठी चर्चा असतानाही अपक्षांची जमवाजमव करणाऱ्या अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्रिपद देण्याशिवाय काँग्रेसकडे पर्याय उरला नाही. यावेळी भाजपच्या बाबतीत अशी परिस्थिती निर्माण होऊन पक्ष बहुमतापासून दूर राहिल्यास आणि अपक्षांना सोबत घेण्याची गरज भासल्यास वसुंधरा राजे यांच्यासमोर पुन्हा मुख्यमंत्री होण्याची संधी चालून येणार आहे. त्यामुळे ही संधी दवडली जाऊ नये, यासाठी त्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली असून निकालात नेमकं काय होतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकRajasthanराजस्थानAshok Gahlotअशोक गहलोतBJPभाजपाcongressकाँग्रेस