शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

बघतायना कसा 'चिरडतोय'! योगी आदित्यनाथ यांनी राजस्थानात केली इस्रायलची 'तारीफ', स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 17:13 IST

"अराजकता, गुंडगिरी आणि दहशतवाद हा सुसंस्कृत समाजासाठी सर्वात मोठा कलंक."

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजस्थानात बोलताना इस्रायलने हमासला दिलेल्या प्रत्युत्तराचे कौतुक केले आहे. त्यांनी काँग्रेसवरही लांगूलचालनाच्या राजकारणाचा आरोप केला. या शिवाय, उत्तर प्रदेशात होत असलेल्या बुलडोझर अँक्शनचाही उल्लेख केला. तसेच, तालिबानी मानसिकतेचा पराभव होईल आणि राष्ट्रवादाचा विजय होईल, असेही योगी यांनी म्हटले आहे. ते खासदार बाबा बालक नाथ यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तिजारा येथे पोहोचले होते.

योगी आदित्यनाथ म्हणाले, 'मला सांगण्यात आले आहे की, काँग्रेसने तिजारा विधानसभा मतदारसंघात ज्या व्यक्तीला पाठवले आहे. ती स्वत:बद्दल मोठ-मोठ्या उपमा लावते. बजरगंबलींची गदा हाच तालिबानवरील उपचार आहे. आपण बघत आहात ना, सध्या इस्रायल गाझातील तालिबानी मानसिकता कशा पद्धतीने चिरडण्याचे काम करत आहे. अचून निशाणा मारत.' महत्वाची गोष्ट म्हणजे, काँग्रेसने बाबा बालक नाथ यांच्या विरोधात तिजारा येथून मुस्लीम उमेदवार इम्रान खान यांना तिकीट दिले आहे. 

योगी म्हणाले, "अराजकता, गुंडगिरी आणि दहशतवाद हा सुसंस्कृत समाजासाठी सर्वात मोठा कलंक आहे. मात्र, व्होटबँकेचे राजकारण जेव्हा दहशतवाद, गुंडगिरी आणि अराजकतेसोबत जोडले जाते, तेव्हा एक गरीब, एक निष्पाप, महिला, व्यापारी आणि संपूर्ण सुसंस्कृत समाजाला दोका निर्माण होतो. एवढेच नाही, तर कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून योगींनी गेहलोत सरकारला कोंडीत पकडले आणि पंतप्रधान मोदींच्या कामाचे कौतुक केले.

...अन् काश्मीर आणि अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा सुटला -राजस्थान राज्याचा एक गौरवशाली इतिहास आहे. मात्र, ह्या इतिहासाला कंलक लावण्याचे काम काँग्रेसकडून होत आहे. देशातील काश्मीरची समस्याही काँग्रेसमुळेच निर्माण झाली. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० हटवून समस्या सोडवली. यामुळे दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले. आता दहशतवाद कायमचा नष्ट झाला आहे, असे योगींनी म्हटले. योगींनी यावेळी अयोध्येतील राम मंदिराबद्दलही भाष्य केले. काँग्रेसने राम मंदिराच्या मुद्द्यावरील वादावर कधीच तोडगा काढला नाही. मात्र, मोदी आणि योगी येताच अयोध्येतील राम मंदिराचा मुद्द्यावरही सुटला, असेही योगी यावेळी म्हटले.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धTerrorismदहशतवादRajasthanराजस्थानBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी