शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

बघतायना कसा 'चिरडतोय'! योगी आदित्यनाथ यांनी राजस्थानात केली इस्रायलची 'तारीफ', स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 17:13 IST

"अराजकता, गुंडगिरी आणि दहशतवाद हा सुसंस्कृत समाजासाठी सर्वात मोठा कलंक."

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजस्थानात बोलताना इस्रायलने हमासला दिलेल्या प्रत्युत्तराचे कौतुक केले आहे. त्यांनी काँग्रेसवरही लांगूलचालनाच्या राजकारणाचा आरोप केला. या शिवाय, उत्तर प्रदेशात होत असलेल्या बुलडोझर अँक्शनचाही उल्लेख केला. तसेच, तालिबानी मानसिकतेचा पराभव होईल आणि राष्ट्रवादाचा विजय होईल, असेही योगी यांनी म्हटले आहे. ते खासदार बाबा बालक नाथ यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तिजारा येथे पोहोचले होते.

योगी आदित्यनाथ म्हणाले, 'मला सांगण्यात आले आहे की, काँग्रेसने तिजारा विधानसभा मतदारसंघात ज्या व्यक्तीला पाठवले आहे. ती स्वत:बद्दल मोठ-मोठ्या उपमा लावते. बजरगंबलींची गदा हाच तालिबानवरील उपचार आहे. आपण बघत आहात ना, सध्या इस्रायल गाझातील तालिबानी मानसिकता कशा पद्धतीने चिरडण्याचे काम करत आहे. अचून निशाणा मारत.' महत्वाची गोष्ट म्हणजे, काँग्रेसने बाबा बालक नाथ यांच्या विरोधात तिजारा येथून मुस्लीम उमेदवार इम्रान खान यांना तिकीट दिले आहे. 

योगी म्हणाले, "अराजकता, गुंडगिरी आणि दहशतवाद हा सुसंस्कृत समाजासाठी सर्वात मोठा कलंक आहे. मात्र, व्होटबँकेचे राजकारण जेव्हा दहशतवाद, गुंडगिरी आणि अराजकतेसोबत जोडले जाते, तेव्हा एक गरीब, एक निष्पाप, महिला, व्यापारी आणि संपूर्ण सुसंस्कृत समाजाला दोका निर्माण होतो. एवढेच नाही, तर कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून योगींनी गेहलोत सरकारला कोंडीत पकडले आणि पंतप्रधान मोदींच्या कामाचे कौतुक केले.

...अन् काश्मीर आणि अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा सुटला -राजस्थान राज्याचा एक गौरवशाली इतिहास आहे. मात्र, ह्या इतिहासाला कंलक लावण्याचे काम काँग्रेसकडून होत आहे. देशातील काश्मीरची समस्याही काँग्रेसमुळेच निर्माण झाली. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० हटवून समस्या सोडवली. यामुळे दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले. आता दहशतवाद कायमचा नष्ट झाला आहे, असे योगींनी म्हटले. योगींनी यावेळी अयोध्येतील राम मंदिराबद्दलही भाष्य केले. काँग्रेसने राम मंदिराच्या मुद्द्यावरील वादावर कधीच तोडगा काढला नाही. मात्र, मोदी आणि योगी येताच अयोध्येतील राम मंदिराचा मुद्द्यावरही सुटला, असेही योगी यावेळी म्हटले.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धTerrorismदहशतवादRajasthanराजस्थानBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी