शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

“महिला आरक्षण लागू करायला केंद्र १० वर्षे लावेल, काँग्रेस सत्तेत येताच...”: मल्लिकार्जुन खरगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 15:24 IST

Women Reservation Bill: भाजपला खरे तर महिलांना आरक्षण द्यायचेच नाही, असे सांगत काँग्रेस सत्तेत आल्यावर महत्त्वाच्या सुधारणा करू, असे आश्वासन अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी दिले.

Women Reservation Bill: केंद्र सरकारने विशेष अधिवेशन घेत महिला आरक्षण विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत पारित केले. मात्र, यावरून विरोधक केंद्र सरकारवर टीका करत आहेत. महिला आरक्षण विधेयकात गुंतागुंत आहे. महिला आरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यास केंद्र सरकार १० वर्षे लावेल. परंतु, काँग्रेस सत्तेत येताच या विधेयकात आवश्यक सुधारणा करून तत्काळ अंमलबजावणीसाठी प्रयत्न करू, असा दावा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. तसेच यावेळी केंद्र सरकारवर निशाणाही साधला.

आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस केंद्रात सत्तेवर आल्यास महिला आरक्षण विधेयकात सुधारणा करेल. या विधेयकाच्या तत्काळ अंमलबजावणीत कोणतीही मोठी कायदेशीर गुंतागुंत नसताना मोदी सरकार मात्र या विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी आगामी १० वर्षे प्रतीक्षा करायला लावणार आहे, असा दावा खरगे यांनी केला. जयपूर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खरगे बोलत होते. संसदेत या विधेयकाला पाठिंबा देताना काँग्रेसने ते तत्काळ लागू करण्याची मागणी केली होती. तसेच त्यात इतर मागासवर्गीय (ओबीसी) महिलांसाठी वेगळे आरक्षण असावे, अशी काँग्रेसची मागणी आहे.  केंद्रात २०२४ मध्ये आमचे सरकार जेव्हा येईल, तेव्हा आम्ही सर्वप्रथम या विधेयकात तशी सुधारणा करू, अशी ग्वाही खरगे यांनी दिली. 

भाजपला खरे तर महिलांना आरक्षण द्यायचेच नाही

केंद्र सरकारने  अनुसूचित जाती-जमातींना काय महत्त्व दिले? लोकसभा अधिवेशन पंतप्रधान नव्हे तर राष्ट्रपती बोलावतात. पण राष्ट्रपतींनाच येथे आदराचे स्थान नाही. आम्ही महिलांचा खूप आदर करतो, असा मोदींचा दावा कशाच्या आधारे आहे? संसदेच्या नवीन वास्तूच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते, कलाकारांसह इतर अनेकांना आमंत्रित करण्यात आले होते पण राष्ट्रपतींना आमंत्रण नव्हते. हा त्यांचा अपमान आहे. भाजपला खरे तर महिलांना आरक्षण द्यायचेच नाही. भाजपने निवडणुकीपूर्वी महिला आरक्षण विधेयक आणले. कारण अनेक विरोधी पक्षांनी मिळून ‘इंडिया’ आघाडी स्थापन केली आहे. जेव्हा राहुल गांधी, सोनिया गांधी आणि आम्ही मिळून विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडिया’ची स्थापना केली तेव्हा भाजपच्या मनात महिला विधेयक आले, या शब्दांत खरगे यांनी केंद्र सरकावर हल्लाबोल केला. 

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भाजपची कोणतीही महिला अध्यक्ष झाली आहे का? संघाच्या उच्च पदापर्यंत कोणतीही महिला पोहोचली आहे का? काँग्रेस हाच महिलांचा खरा आदर करणारा पक्ष आहे. काँग्रेसच्या काळात पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू होत्या, विजयालक्ष्मी पंडित संयुक्त राष्ट्रांत होत्या, मीरा कुमार लोकसभेच्या अध्यक्ष होत्या, पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या, पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील होत्या, असे खरगे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Women Reservationमहिला आरक्षणMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेCentral Governmentकेंद्र सरकारcongressकाँग्रेस