शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदावरून राजकीय हालचालींना वेग, वसुंधरा राजेंच्या बाजूने जोरदार लॉबिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 16:53 IST

कोटा उत्तरचे पराभूत उमेदवार प्रल्हाद गुंजाळ हे स्वतः वसुंधरा राजे यांच्या बाजूने लॉबिंग करण्यात व्यस्त आहेत. 

राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदावरून राजकीय हालचाली वाढल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नावावरून अद्याप सस्पेंस आहे. राजस्थानमध्ये उद्या विधीमंडळ पक्षासोबत निरीक्षकांची बैठक होणार आहे. मात्र, यादरम्यान येणाऱ्या बातम्यांवरून येथील नेत्यांच्या बाजूने लॉबिंग सुरू झाल्याचा दावा केला जात आहे. कोटा उत्तरचे पराभूत उमेदवार प्रल्हाद गुंजाळ हे स्वतः वसुंधरा राजे यांच्या बाजूने लॉबिंग करण्यात व्यस्त आहेत. 

दुसरीकडे, राजस्थानचे विरोधी पक्षनेते राहिलेले राजेंद्र राठोड यांनी वसुंधरा राजे यांच्यावर निशाणा साधला आहे. आपल्या नावावर निवडणूक जिंकली असा कोणताही गैरसमज नसावा, राजस्थानमधील विजय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर मिळाला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला आहे. भाजपने 199 पैकी 115 जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला आहे. तेव्हापासून मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत चर्चा सुरू आहे. 

राजस्थानमध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, गजेंद्र सिंह शेखावत, सीपी जोशी यांच्यासह अनेक नावे मुख्यमंत्रीपदासाठी दावेदार आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये वसुंधरा राजे या मुख्यमंत्रीपदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. मात्र, भाजपने अद्याप कोणाच्याही नावाला मान्यता दिलेली नाही. हायकमांडने येथे निरीक्षक पाठवले आहेत. यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह सरोज पांडे आणि विनोद तावडे यांचा समावेश आहे. उद्या निरीक्षक आमदारांची बैठक घेऊ शकतात, असे म्हटले जात आहे.

कोटा उत्तरमधून निवडणुकीत पराभूत झालेले प्रल्हाद गुंजाळ हे मुख्यमंत्रीपदासाठी वसुंधरा राजे यांचा प्रचार करत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  प्रल्हाद गुंजाळ जयपूरमध्ये पक्षाच्या बड्या नेत्यांची भेट घेत आहेत. तसेच,  प्रल्हाद गुंजाळ हे सातत्याने वसुंधरा राजे यांच्या बाजूने नेत्यांचा पाठिंबा मागत आहेत. यापूर्वी एका आमदाराच्या वडिलांनीही वसुंधरा राजे यांच्या मुलावर आमदारांना रोखल्याचा आरोप केला होता.

राजेंद्र राठोड यांनी वसुंधरा राजेंवर साधला निशाणा राजस्थानमधील विरोधी पक्षनेते राहिलेले भाजपचे ज्येष्ठ नेते राजेंद्र राठोड यांनी वसुंधरा राजे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते सोमवारी म्हणाले की, राजस्थानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर पक्षाचा विजय झाला आहे. आपल्या नावावर निवडणूक जिंकली असा गैरसमज इथे कोणीही ठेवू नये, असे ते म्हणाले. दरम्यान, हे विधान अशावेळी आले आहे, जेव्हा राजस्थानचा मुख्यमंत्री चेहरा जाहीर होणार आहे. याठिकाणी वसुंधरा राजेंचे समर्थन करणाऱ्या आमदार आणि नेत्यांवरही लॉबिंगचे आरोप झाले आहेत. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकBJPभाजपाElectionनिवडणूक