शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
2
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
5
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

"काँग्रेस राहुल गांधींच्या मार्गावर चालली, तर संपूर्ण देशात सुपडा साफ निश्चित", अमित शाहांचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 3:16 PM

अशोक गेहलोत यांच्या सरकारने राज्यात घराणेशाही आणि जातीयवाद वाढवला असल्याचे अमित शाह म्हणाले.

नवी दिल्ली :  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजस्थानमधील उदयपूर येथे एका सभेला संबोधित करताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी परदेशात जाऊन भारताबद्दल वाईट बोलतात. काँग्रेस या मार्गावर चालत राहिल्यास ईशान्येप्रमाणे संपूर्ण देशातून काँग्रेसचा सुपडा साफ होईल, असे अमित शाह म्हणाले. यासोबतच राजस्थानच्या गेहलोत सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना ते म्हणाले की, आज राज्यातील जनता त्रस्त आहे.

अशोक गेहलोत यांच्या सरकारने राज्यात घराणेशाही आणि जातीयवाद वाढवला असल्याचे अमित शाह म्हणाले. तुष्टीकरणाचे राजकारण करून राज्यात हिंसाचाराचा नंगा नाच निर्माण करण्याचे काम सरकारने केले आहे. यामुळेच आज राज्यातील जनता त्रस्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या उत्तम धोरणांनी देशाला प्रगतीच्या मार्गावर नेले आहे. आपल्या विचारसरणीने हा देश सुरक्षित बनवला आहे, असे अमित शाह यांनी सांगितले.

सुरक्षेच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर निशाणा साधताना अमित शाह म्हणाले, केंद्र सरकारने सीमाभागाला प्रथम प्राधान्य दिले आहे. आपल्या देशाच्या सीमेची सुरक्षा हीच राष्ट्राची सुरक्षा आहे, त्यामुळे सीमेवरील पायाभूत सुविधा वाढविण्याचे काम सरकार सातत्याने करत आहे. आजच्या काळात आमच्याकडे कोणी डोळे वर करून पाहू शकत नाही आणि आमची एक इंचही जमीन घेऊ शकत नाही. आपल्या विचारसरणीने देश सुरक्षित केला आहे, असे अमित शाह म्हणाले.

राजस्थानमध्ये 86 लाख शौचालये बांधण्यात आली. उज्ज्वला योजनेंतर्गत सुमारे साडेपाच लाख कनेक्शन देण्यात आले. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर द्रौपदी मुर्मू या आदिवासी आणि गरीब घरातील महिलेने तिला महामहिम बनवून देशाची प्रतिष्ठा वाढवली आहे. नरेंद्र मोदींची नऊ वर्षे ही गरीब कल्याणाची नऊ वर्षे आहेत. ही नऊ वर्षे भारताच्या विजयाची आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत, भारताचे ज्ञान आणि भारतीयत्वाचे ब्रँड अॅम्बेसेडर बनून जगामध्ये आदर मिळवण्याचे काम केले आहे,असे अमित शाह यांनी सांगितले.

नुकतेच पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर गेले होते. तिथे त्याला मिळालेला आदर सगळ्यांनी पाहिला. हा पंतप्रधानांचा आदर आहे तसेच भारताच्या 130 कोटी जनतेचा आदर आहे. सरकारने प्रत्येक क्षेत्रात नवा आयाम मिळवला आहे. सोनिया-मनमोहन यांचे सरकार असताना पाकिस्तानातून दररोज दहशतवादी घुसायचे आणि भारतात स्फोट घडवून आणायचे, असे म्हणत अमित शाह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. दरम्यान, यावेळी या रॅलीत राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी यांच्यासह अनेक बडे नेतेही सहभागी झाले होते.

टॅग्स :Amit Shahअमित शाहRajasthanराजस्थानcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी