शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

महिलांची पाण्यासाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 3:24 AM

खालापूर शहरात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा जीव टांगणीला लागला आहे. खालापूर हे तालुक्याचे ठिकाण असतानाही या परिसरातील महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.

मोहोपाडा : एकीकडे खालापूर शहर स्मार्ट सिटीमध्ये रूपांतर होण्याच्या मार्गावर असताना मात्र खालापूर शहरातील नागरिकांना आजही पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या भेडसावत आहे.

खालापूर शहरात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा जीव टांगणीला लागला आहे. खालापूर हे तालुक्याचे ठिकाण असतानाही या परिसरातील महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. येथील महिलांना काही अंतर पायपीट करून विहिरीतून पाणी आणावे लागत आहे. यावेळी रस्ता ओलांडताना अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. डोक्यावर भरलेल्या पाण्याचे हंडे घेऊन महिलांना रस्ता ओलांडावा लागत आहे. यावेळी रस्ता ओलांडत असताना अपघात होण्याची अधिक शक्यता आहे. काही वर्षापूर्वीच ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाले. निवडणुकीअगोदर सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासने देखील पाण्यात गेल्यासारखी नागरिकांना वाटू लागली आहेत. शहरातील नागरिक आजही या गंभीर समस्येला सामोरे जाताना दिसत आहेत. महिलांना यामध्ये मोठा त्रास सहन करावा लागत असून याकरिता खालापूर नगरपंचायतीने महिलांसमोर असणारी पाण्याची समस्या त्वरित सोडवावी, अशी मागणी जोर धरत आहे. 

टॅग्स :Raigadरायगड