शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

"संयम सुटला की कोणपण फुटला"; मनसेच्या वसंत मोरेंनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 16:46 IST

रायगड जिल्ह्यातील कोलाड येथे जागर यात्रेदरम्यान बोलताना मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी थेट इशाराच दिला.

मुंबई/रायगड - राज्यात गेली पंधरा वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गामुळे संताप व्यक्त होत असताना मनसेने रविवारपासून कोकण जागर यात्रेचा प्रारंभ केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोलाड येथील सभेतून राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. तसेच, आंदोलक मनसैनिकांवर होत असलेल्या कारवाईलाही प्रत्युत्तर दिले. दरम्यान, येथील यात्रेत अमित ठाकरेही सहभागी झाले आहेत. या यात्रेदरम्यान, मनसेचे पुण्यातील माजी नगरसेवक वसंत मोरे यांनीही सहभाग घेतला असून मंत्री महोदयांवर जोरदार टीका केलीय. तसेच, सरकारला एकप्रकारे इशाराही दिलाय.

रायगड जिल्ह्यातील कोलाड येथे जागर यात्रेदरम्यान बोलताना मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी थेट इशाराच दिला. अस्वलाच्या अंगावर ४-५ केस वाढले तर काही फरक पडत नसतो. मनसैनिकांना केसेस होतील असे कुणी आम्हाला सांगू नका, आम्ही त्याला घाबरत नाही. तसेच, आज जशी यात्रा आहे, तशा यात्रा पुन्हा होतील हा विश्वास आमच्यावर ठेऊ नका. कारण, संयम जर सुटला तर कोणपण फुटला हे सांगता येणार नाही. 

मंत्री बोलत आहेत की, महाराष्ट्र सैनिक उठतो आणि कुठेतरी रस्त्यावर जाऊन नुकसान करतो. पण, मला वाटतं ज्याला जी भाषा कळते, त्या भाषेत समजून सांगणार पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना असल्याचं मोरे यांनी म्हटलं. निवडणुका जवळ आल्या की आंदोलन व्हायला लागले, असं समजायंचं, असे मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं. पण, सामंतसाहेब, तुम्हाला आज कळाल असेल की निवडणुका जवळ आल्या आहेत. मात्र, तुम्ही जेव्हा पक्ष बदलला तेव्हाच आम्हाला कळालं निवडणुका जवळ आल्या आहेत, असे म्हणत उदय सामंत यांच्यावर पलटवार केला. 

जागर यात्रा ही आंदोलनाचा सभ्य मार्ग - राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पदयात्रा हा आंदोलनाचा सभ्य मार्ग असल्याचे सांगत, सरकारला जाग आणण्यासाठी हे आंदोलन करीत आहोत. रस्त्यावर पडलेला खड्डा भरता येतो, पण गेलेलं माणसाचं आयुष्य परत मिळत नाही, अशी भावनिक साद घालत राज ठाकरेंनी सरकारवर जोरदार टीका केली. मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडपट्टीवर ते म्हणाले, जी माणसे तुम्हाला लुटत आली त्यांच्या हातात तुम्ही सत्ता देत आहात. तुम्ही जागृत राहा. कोकणी बांधवांना गेली अनेक वर्षे खड्डे सहन करावे लागतात. याचा तुम्हाला राग कसा येत नाही, असे आवाहनही त्यांनी केले. आंदोलन करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिस स्टेशनमध्ये अंडरवेअरवर बसवलं. सरकार कोणतंही असो, आजचं असो किंवा कालचं.  सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही आलेले नसते, असा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :RaigadरायगडMNSमनसेhighwayमहामार्गagitationआंदोलन