शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

"संयम सुटला की कोणपण फुटला"; मनसेच्या वसंत मोरेंनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 16:46 IST

रायगड जिल्ह्यातील कोलाड येथे जागर यात्रेदरम्यान बोलताना मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी थेट इशाराच दिला.

मुंबई/रायगड - राज्यात गेली पंधरा वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गामुळे संताप व्यक्त होत असताना मनसेने रविवारपासून कोकण जागर यात्रेचा प्रारंभ केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोलाड येथील सभेतून राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. तसेच, आंदोलक मनसैनिकांवर होत असलेल्या कारवाईलाही प्रत्युत्तर दिले. दरम्यान, येथील यात्रेत अमित ठाकरेही सहभागी झाले आहेत. या यात्रेदरम्यान, मनसेचे पुण्यातील माजी नगरसेवक वसंत मोरे यांनीही सहभाग घेतला असून मंत्री महोदयांवर जोरदार टीका केलीय. तसेच, सरकारला एकप्रकारे इशाराही दिलाय.

रायगड जिल्ह्यातील कोलाड येथे जागर यात्रेदरम्यान बोलताना मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी थेट इशाराच दिला. अस्वलाच्या अंगावर ४-५ केस वाढले तर काही फरक पडत नसतो. मनसैनिकांना केसेस होतील असे कुणी आम्हाला सांगू नका, आम्ही त्याला घाबरत नाही. तसेच, आज जशी यात्रा आहे, तशा यात्रा पुन्हा होतील हा विश्वास आमच्यावर ठेऊ नका. कारण, संयम जर सुटला तर कोणपण फुटला हे सांगता येणार नाही. 

मंत्री बोलत आहेत की, महाराष्ट्र सैनिक उठतो आणि कुठेतरी रस्त्यावर जाऊन नुकसान करतो. पण, मला वाटतं ज्याला जी भाषा कळते, त्या भाषेत समजून सांगणार पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना असल्याचं मोरे यांनी म्हटलं. निवडणुका जवळ आल्या की आंदोलन व्हायला लागले, असं समजायंचं, असे मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं. पण, सामंतसाहेब, तुम्हाला आज कळाल असेल की निवडणुका जवळ आल्या आहेत. मात्र, तुम्ही जेव्हा पक्ष बदलला तेव्हाच आम्हाला कळालं निवडणुका जवळ आल्या आहेत, असे म्हणत उदय सामंत यांच्यावर पलटवार केला. 

जागर यात्रा ही आंदोलनाचा सभ्य मार्ग - राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पदयात्रा हा आंदोलनाचा सभ्य मार्ग असल्याचे सांगत, सरकारला जाग आणण्यासाठी हे आंदोलन करीत आहोत. रस्त्यावर पडलेला खड्डा भरता येतो, पण गेलेलं माणसाचं आयुष्य परत मिळत नाही, अशी भावनिक साद घालत राज ठाकरेंनी सरकारवर जोरदार टीका केली. मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडपट्टीवर ते म्हणाले, जी माणसे तुम्हाला लुटत आली त्यांच्या हातात तुम्ही सत्ता देत आहात. तुम्ही जागृत राहा. कोकणी बांधवांना गेली अनेक वर्षे खड्डे सहन करावे लागतात. याचा तुम्हाला राग कसा येत नाही, असे आवाहनही त्यांनी केले. आंदोलन करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिस स्टेशनमध्ये अंडरवेअरवर बसवलं. सरकार कोणतंही असो, आजचं असो किंवा कालचं.  सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही आलेले नसते, असा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :RaigadरायगडMNSमनसेhighwayमहामार्गagitationआंदोलन