शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

आंबोलीतील माती बंधाऱ्याचे काम ग्रामस्थांनी पाडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 11:08 PM

निकृष्ट दर्जाच्या कामाची ओरड : अभियंता नसल्याने व्यक्त के ली नाराजी

मुरुड : खारभूमी विभागामार्फत मुरुड शहरातील मयेकर यांच्या शेतामधील पुढील भागापासून ते आंबोली येथील स्मशानभूमी परिसरापर्यंत मातीचा मोठा बंधारा बांधण्यात येत आहे. वरची आळी आंबोली गावातील ग्रामस्थांनी हे काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचे निदर्शनास आणल्याने काम बंद पडले आहे. ग्रामस्थांनी खारभूमी विभागाच्या अनागोंदी कारभारावरसुद्धा आक्षेप नोंदवला आहे. काम पूर्ण झाले नसताना अ‍ॅडव्हान्स बिल का अदा करण्यात आले, असा प्रश्न उपस्थित करून कोट्यवधी रुपयांचे काम सुरू असताना खारभूमी विभागाचा कोणताही अधिकारी अथवा अभियंता उपस्थित राहत नाही, याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

लक्ष्मीखार, तेलवडे व आंबोली परिसरातील समुद्राचे पाणी भात शेतीमध्ये शिरू नये, यासाठी कोटी रुपये खर्च करून बंधारा बांधण्यात येत आहे. तेलवडे, शीघ्रे ते आंबोली परिसरातील असंख्य एकर जमीन गेल्या कित्येक वर्षांपासून समुद्राचे पाणी जाऊन नापीक बनली आहे. यासाठी हा बंधारा बांधण्यात येत आहे. आंबोली स्मशानभूमीपर्यंत हे काम आले असून काम सुरू करताना ग्रामस्थांना विश्वासात न घेता काम पूर्ण करण्यात येत असल्याची ओरड येथील ग्रामस्थांनी केली आहे. सर्व एकत्र जमून त्यांनी सुरू असलेल्या मातीच्या भरावाचे काम बंद पाडले आहे. या बंधाºयाची उंची या अगोदरच १२ फूट आहे. त्यावरच ठेकेदाराने फक्त सहा इंची मातीचा भराव टाकल्याचे ग्रामस्थांची ओरड आहे. अंदाजपत्रकाप्रमाणे काम होत नसून, संबंधित ठेकेदाराने या कामाचे विश्लेषण ग्रामस्थांना भेटून करण्यात यावे, अशी मागणी केली. जोपर्यंत ठेकेदार ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करत नाही, तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही, असा एल्गार ग्रामस्थांनी करून सुरू असलेले काम तातडीने बंद करण्यात आले आहे. बंधाºयाचे काम बंद पाडण्यामध्ये खारआंबोली वरची वाडीमधील अध्यक्ष महादेव कमाने, मंगेश ठाकूर, मनोज दामोदर कमाने, संदीप ठाकूर, वसंत खंडागळे, हरी ठाकूर, महेंद्र बैकर आदी ग्रामस्थांचा सहभाग होता.उपस्थित व्यवस्थापकाने ग्रामस्थांना मूळ ठेकेदारांशी संवाद करून दिला, त्या वेळी लवकरच येथील ग्रामस्थांशी भेट घेऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचे अभिवाचन दिले आहे.