शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अनलॉकडाउन १.० मुळे रायगड जिल्ह्यात अर्थकारणाला गती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 23:54 IST

विशेष प्रतिनिधी। लोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग : पाचवा लॉकडाउन हा खऱ्या अर्थाने अनलॉकडाउन ठरला आहे. केंद्र सरकारने बºयाच बाबींसाठी ...

विशेष प्रतिनिधी।लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : पाचवा लॉकडाउन हा खऱ्या अर्थाने अनलॉकडाउन ठरला आहे. केंद्र सरकारने बºयाच बाबींसाठी शिथिलता दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश उद्योग-व्यवसाय सुरू झाल्याचे दिसून आले. कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असतानादेखील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने सोशल डिस्टन्सिंगला धाब्यावर बसवल्याचे चित्र होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. नागरिकांनी स्वत:ला आपापल्या घरामध्ये क्वारंटाइन करून घेतले होते. कोरोनाचा वाढता आकडा लक्षात घेत सरकारने बरेच निर्बंध लादले होते. त्यामुळे उद्योग-व्यवसाय ठप्प झाले होते. कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, परंतु लॉकडाउन किती काळ लांबवायचा याला मर्यादा घालणे गरजेचे होते. तसे केले नसते तर देशाची आर्थिक घडी अधिक विस्कटली असती. याचसाठी सरकारने पाचव्या लॉकडाउनमध्ये बहुतांश बाबींना व्यवहार करण्याची मुभा दिली आहे.

सरकारी कार्यालयामध्ये १५ टक्के उपस्थिती, तर खासगी कार्यालयांमध्ये १० टक्के कर्मचारी यांची उपस्थिती राहणार आहे. बँका, पतसंस्था, विविध दुकाने, संस्थांचे व्यवहार सुरू झाले. आरटीओ, जिल्हा उपनिबंधक, पोस्टाची पार्सल आणि खासगी पार्सल सेवा, कुरियर सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. मार्केट सुरू आहेत. अत्यावश्यक सेवा देणारे उद्योग तसेच त्यावर अवलंबून असलेल्या सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अर्थव्यवहारांना गती देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे, मात्र नागरिकांत अद्यापही कोरोनाची दहशत कायम असल्याचेही दिसून आले.

अंतर्गत प्रवासी बस वाहतूक, तसेच अंतर्गत जिल्ह्यातील अन्य वाहतुकीवरही निर्बंध कायम आहेत. त्याचप्रमाणे शाळा, महाविद्यालये कोचिंग क्लासेस, हॉटेल, लॉजिंग, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल, सलून, स्पा, सिनेमागृह, नाट्यगृह तसेच गर्दी होणाºया कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलेली नसल्याने त्यांचे व्यवहार बंद असल्याचे दिसून आले.कोरोनाबाधित क्षेत्रामध्ये फक्त अत्यावश्यक सेवांनाच परवानगी देण्यात आली आहे, मार्केट आणि मेडिकल स्टोअर सुरू राहणार आहेत. दरम्यान, अनलॉकडाउनमुळे बाजारांमध्ये नागरिकांनी गर्दी केली होती. नागरिक तोंडावर मास्क लावल्याचे दिसत होते, मात्र सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवले होते.

बँका, पतसंस्था, विविध दुकाने, संस्थांचे व्यवहार सुरू झाले. आरटीओ, जिल्हा उपनिबंधक, पोस्टाची पार्सल आणि खासगी पार्सल सेवा, कुरियर सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. मार्केट सुरू आहेत. अत्यावश्यक सेवा देणारे उद्योग तसेच त्यावर अवलंबून असलेल्या सेवा सुरू करण्यात आल्या आहेत.