शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

अनलॉकडाउन १.० मुळे रायगड जिल्ह्यात अर्थकारणाला गती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 23:54 IST

विशेष प्रतिनिधी। लोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग : पाचवा लॉकडाउन हा खऱ्या अर्थाने अनलॉकडाउन ठरला आहे. केंद्र सरकारने बºयाच बाबींसाठी ...

विशेष प्रतिनिधी।लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : पाचवा लॉकडाउन हा खऱ्या अर्थाने अनलॉकडाउन ठरला आहे. केंद्र सरकारने बºयाच बाबींसाठी शिथिलता दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश उद्योग-व्यवसाय सुरू झाल्याचे दिसून आले. कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असतानादेखील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने सोशल डिस्टन्सिंगला धाब्यावर बसवल्याचे चित्र होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. नागरिकांनी स्वत:ला आपापल्या घरामध्ये क्वारंटाइन करून घेतले होते. कोरोनाचा वाढता आकडा लक्षात घेत सरकारने बरेच निर्बंध लादले होते. त्यामुळे उद्योग-व्यवसाय ठप्प झाले होते. कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, परंतु लॉकडाउन किती काळ लांबवायचा याला मर्यादा घालणे गरजेचे होते. तसे केले नसते तर देशाची आर्थिक घडी अधिक विस्कटली असती. याचसाठी सरकारने पाचव्या लॉकडाउनमध्ये बहुतांश बाबींना व्यवहार करण्याची मुभा दिली आहे.

सरकारी कार्यालयामध्ये १५ टक्के उपस्थिती, तर खासगी कार्यालयांमध्ये १० टक्के कर्मचारी यांची उपस्थिती राहणार आहे. बँका, पतसंस्था, विविध दुकाने, संस्थांचे व्यवहार सुरू झाले. आरटीओ, जिल्हा उपनिबंधक, पोस्टाची पार्सल आणि खासगी पार्सल सेवा, कुरियर सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. मार्केट सुरू आहेत. अत्यावश्यक सेवा देणारे उद्योग तसेच त्यावर अवलंबून असलेल्या सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अर्थव्यवहारांना गती देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे, मात्र नागरिकांत अद्यापही कोरोनाची दहशत कायम असल्याचेही दिसून आले.

अंतर्गत प्रवासी बस वाहतूक, तसेच अंतर्गत जिल्ह्यातील अन्य वाहतुकीवरही निर्बंध कायम आहेत. त्याचप्रमाणे शाळा, महाविद्यालये कोचिंग क्लासेस, हॉटेल, लॉजिंग, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल, सलून, स्पा, सिनेमागृह, नाट्यगृह तसेच गर्दी होणाºया कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलेली नसल्याने त्यांचे व्यवहार बंद असल्याचे दिसून आले.कोरोनाबाधित क्षेत्रामध्ये फक्त अत्यावश्यक सेवांनाच परवानगी देण्यात आली आहे, मार्केट आणि मेडिकल स्टोअर सुरू राहणार आहेत. दरम्यान, अनलॉकडाउनमुळे बाजारांमध्ये नागरिकांनी गर्दी केली होती. नागरिक तोंडावर मास्क लावल्याचे दिसत होते, मात्र सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवले होते.

बँका, पतसंस्था, विविध दुकाने, संस्थांचे व्यवहार सुरू झाले. आरटीओ, जिल्हा उपनिबंधक, पोस्टाची पार्सल आणि खासगी पार्सल सेवा, कुरियर सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. मार्केट सुरू आहेत. अत्यावश्यक सेवा देणारे उद्योग तसेच त्यावर अवलंबून असलेल्या सेवा सुरू करण्यात आल्या आहेत.