शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

आगरदांडा बंदरात तटरक्षक दलातर्फे दोन महाकाय बोटी दाखल, अतिजलद पेट्रोलिंग होणार शक्य 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2021 4:36 AM

रायगड जिल्ह्याच्या सागरी सुरक्षेसाठी गुरुवारी भारतीय तटरक्षक दलाच्या दिमतीला आगरदांडा बंदरात अग्रीम आयसीजीएस व अचूक आयसीजीएस हे दोन सुसज्ज जहाजे तैनात करण्यात आली आहेत.

आगरदांडा : रायगड जिल्ह्याच्या सागरी सुरक्षेसाठी गुरुवारी भारतीय तटरक्षक दलाच्या दिमतीला आगरदांडा बंदरात अग्रीम आयसीजीएस व अचूक आयसीजीएस हे दोन सुसज्ज जहाजे तैनात करण्यात आली आहेत. ५० मीटर बाय ७ मीटर लांबीच्या या अत्याधुनिक जहाजांमुळे अतिजलद पेट्रोलिंग शक्य होणार असून रायगडच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ वा तुफानी वाऱ्यापासून खोल समुद्रात मच्छीमारांना उद्भवणाऱ्या संकटाचा मुकाबला करणे व मदतीचा हात देणे शक्य होणार आहे.मुंबई येथे १९९३ साली बॉम्बस्फोट झाल्यानंतर खऱ्या अर्थाने सागरी सुरक्षेला खूप महत्त्व देण्यात आले. तद्नंतर तटरक्षक दलाची ठिकठिकाणी टेहळणी केंद्र निर्माण होऊन अतिरेकी कारवाया रोखण्यासाठी सागरी सुरक्षा दल सोबत भारतीय तटरक्षक दलाने कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर आगरदांडा येथे भारतीय तटरक्षक दलाचे टेहळणी केंद्र तयार करण्यात आले आहे. सुरुवातीला टेहळणी करण्यासाठी स्थानिक मच्छीमारांच्या होड्यांचे साह्य घेऊन टेहळणी करण्यात येत होती. परंतु आता स्वतंत्र मोठ्या बोटी आल्याने आगरदांडा टेहळणी केंद्राला खूप मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. अतिरेकी कारवायांवर नजर ठेवता ठेवता स्थानिक मच्छीमार हे समुद्रात संकटात सापडल्यावर या महाकाय बोटींचे मोठे सहाय्य्य प्राप्त होणार आहे.अमली पदार्थांची तस्करी रोखणे, अतिरेक्यांच्या हालचालींवर करडी नजर ठेवणे तसेच समुद्रात उदभवणाऱ्या अस्मानी, सुलतानी संकटाप्रसंगी बचाव कार्यात नेहमीच तटरक्षक दल कार्यरत असते. दोन बोटींमुळे पेट्रोलिंग खूप लांबवर होऊन खोल समुद्रात होणाऱ्या अतिरेकी कारवायांवर पायबंद ठेवता येणार आहे. 

टॅग्स :Raigadरायगड