शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

पावसाच्या तडाख्याने हजारो हेक्टर क्षेत्रातील भातपीक पाण्याखाली; शेतकरी आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 12:44 AM

बुडालेल्या भातपिकांचा चिखल, वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीच्या झालेल्या आर्थिक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याची माहिती उरण नायब तहसीलदार संदीप खोमणे यांनी दिली.

मधुकर ठाकूर उरण : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे उरण परिसरातील शेकडो एकर भातपिके पाण्याखाली गेली आहेत. हाती येण्याच्या तयारीत असलेल्या भातपिकाचा अवकाळी पावसामुळे चिखल झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

यंदा आवश्यकतेनुसार पाऊस पडला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीला चांगलेच फळ येऊन भातपीक चांगलेच फोफावले होते. तयार झालेले भातपीक हाती येण्याच्या तयारीत असतानाच निसर्गाच्या कोपाने डाव साधला. मागील दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार वादळी पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यात कापणीसाठी तयार असलेली भातपिके आकंठ बुडाली आहेत. काही ठिकाणी तर भातपिकांचा चिखल झाला आहे. उरण परिसरातील हजारो हेक्टर क्षेत्रातील भातशेतीच पाण्यात गेली आहे. वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीच्या झालेल्या आर्थिक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याची माहिती उरण नायब तहसीलदार संदीप खोमणे यांनी दिली.

नवी मुंबई शहरात ९० मिमी पावसाची नोंद

नवी मुंबई शहरात गेल्या तीन दिवसांपासून संध्याकाळी पडत असलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडत आहे. नवी मुंबई शहरात मागील चोवीस तासांत सुमारे ९०.७४ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली असून, दररोज काही काळ कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहरातील काही भागातील रस्त्यांवर पाणी साचत आहे. गुरुवारी १५ ऑक्टोबर रोजी बेलापूर विभागात १४३.०६ मिमी, नेरूळ ११८.५० मिमी, वाशी विभागात ८८.६० मिमी, कोपरखैरणे ९२.३० मिमी तर ऐरोली विभागात ४०.०० मिमी पावसाची नोंद झाली.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी