शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

आदेश देऊनही वर्षभरात समस्यांवर कार्यवाही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 1:03 AM

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : हजारो आदिवासींचा समावेश

अलिबाग : केंद्र शासनाचा भारतीय वन कायदा २०१९ चा मसुदा रद्द करणे आणि कोकण विभागीय महसूल आयुक्तांनी जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या समस्या निवारणार्थ दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी न केल्याने श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली गुरुवारी जिल्ह्यातील तीन हजार आदिवासींनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्र्चा काढला.

श्रमजीवी संघटनेचे कार्याध्यक्ष केशव नानकर, उप कार्याध्यक्षा स्नेहा दुबे-पंडित, राज्य सरचिटणीस बाळाराम भोईर, रायगड जिल्हाध्यक्ष अशोक पवार, जिल्हा सरचिटणीस संजय गुरव आदीच्या नेतृत्वाखाली येथील क्रीडाभुवन मैदानावरून रानभाज्यांच्या टोपल्या व पालखीसह निघालेला मोर्चा शिस्तबद्ध पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला. हिराकोट तलावाजवळ पोलिसांनी मोर्चा अडविला. त्यानंतर त्याचे जाहीर सभेत रूपांतर झाले. या वेळी ठाणे जिल्हा सरचिटणीस राजेश चन्ने, दशरथ भालके, जिल्हा महिला प्रमुख योगिता दुर्गे आदी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आदिवासी बांधवांवर होणाऱ्या अन्यायाबाबत विचार मांडले.जिल्ह्यातील पनवेल, उरण, खालापूर, कर्जत, सुधागड या तालुक्यात आदिवासी, कातकरी व ठाकूर कुटुंबे असून श्रमजीवी संघटना या आदिवासी कातकरी, ठाकूर, महिला, युवा व इतर मागासवर्गीयांसाठी कार्यरत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा शासनाच्या राज्य आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्यात आदिवासी बांधवांच्या या विविध समस्यांबाबत चर्चा झाली. त्यानंतर कोकण विभागीय महसूल आयुक्तांनी संघटना पदाधिकारी व अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊ न रायगड जिल्हा प्रशासनास लेखी आदेश दिले. त्या आदेशांचा अनेकदा पाठपुरावा करूनही वर्षभरात कोणतेही काम करण्यात आलेले नाही. या विषयांसंदर्भात १९ डिसेंबर २०१८ रोजी बैठक आयोजित करण्यासाठी दिलेल्या पत्रानंतर आजपर्यंत यावर बैठकही घेतलेली नसल्याचे शिष्टमंडळाने रायगडचे प्रभारी जिल्हाधिकारी भरत शितोळे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.नऊ मागण्यांचे निवेदनभारतीय वन कायदा (सुधारणा) २०१९ चा केंद्र सरकारच्या मसुद्यातील आदिवासींचा हक्क डावलणाºया जाचक अटी तत्काळ रद्द करण्यात याव्यात, मसुद्यात वन अधिकाऱ्यांना दिलेले अमर्यादित अधिकार रद्द करावे, वनांचे खासगीकरण करून भांडवलदार कंपन्यांना वनशेती करण्याची तरतूद रद्द करावी, वन संसाधनावर असलेला आदिवासींचा पारंपरिक अधिकार अबाधित राखावा, संयुक्त वन व्यवस्थापनाऐवजी वन हक्कदारांची समिती गठित करून त्यांच्यावर वन संवर्धन व संरक्षण करण्याची सक्ती करण्यात यावी, आदी नऊ मागण्यांचा समावेश आहे.जिल्हाधिकारी घेणार बैठकश्रमजीवी संघटना पदाधिकारी व आदिवासी बांधव यांच्यासमवेत निवेदनात नमूद मागण्यांबाबत प्रभारी जिल्हाधिकारी भरत शितोळे यांनी चर्चा केली. मोर्चाने दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने १२ जुलै रोजी पनवेल येथे रायगडचे जिल्हाधिकारी, संबंधित महसूल अधिकारी आणि अन्य शासकीय विभागांचे अधिकारी आणि श्रमजीवी संघटना पदाधिकारी यांची संयुक्त बैठक पनवेलमध्ये आयोजित करून निर्णय घेण्यात येणार आहे.

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग