शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

पावसाने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू; मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 11:59 PM

भाताचे नुकसान : विजांच्या कडकडाटासह पाऊस

दासगाव : यंदा परतीच्या पावसाने गेल्या तीन दिवसांपासून संपूर्ण कोकणाला विजेच्या कडकडाटासह झोडपून काढले आहे. या पावसामुळे भातशेतीचे मोठ्या  प्रमाणात नुकसान झाले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, चार दिवस कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्याप्रमाणे गेल्या दोन दिवसांपासून कोकणात विजेच्या कडकडाटासह परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. महाड तालुक्यातदेखील पावसाचा मोठ्या प्रमाणात जोर असून, गेले तीन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. जनजीवन विस्कळीत झाले असून या पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका शेतकऱ्यांना बसला आहे. 

दासगाव येथील रमेश भिकू राणे या एकाच शेतकऱ्याची जवळपास तीन एकर जमिनीमधील भातशेती जमीनदोस्त झाली असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अशा प्रकारे महाड तालुक्यात अनेक शेतकरी आहेत की ज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांचे पोटच यावर अवलंबून आहे, त्या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने लवकरच नुकसानीचे पंचनामे करून मदत जाहीर करण्याची गरज निर्माण झाली आहे.

माझ्या तीन एकर शेतीमध्ये भातलागवड केलेली आहे. दरवर्षी या शेतीमधून दहा खंडी भातपीक निघते. माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह याच भातपिकावर अवलंबून आहे. परतीच्या पावसामुळे संपूर्ण शेती जमीनदोस्त झाली आहे. माझे जवळपास दोन लाखांचे नुकसान झाले आहे. माझ्या कुटुंबावर उपासमारीची पाळी येऊ नये यासाठी शासनाकडून पंचनामे करून मदत मिळावी, अशी अपेक्षा आहे. - रमेश भिकू राणे, शेतकरी दासगाव.

रायगडमधील शेतकरी चिंतातुर

पश्चिम बंगालच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सुरू झालेल्या अतिवृष्टीने रायगडातील शेतीला फटका बसला आहे. पावसाने बहरलेली उभी भातपिके कोलमडून पडली असून, हाताशी आलेले पीक पडल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. दरम्यान, हवामान खात्याने १७ ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने शेतकरी अधिक चिंताग्रस्त झाला आहे. या वर्षी जिल्ह्यात १ लाख हेक्टरवर शेतकऱ्यांनी भातशेती लावली आहे. जिल्ह्यात पडलेल्या पावसाने भातशेती चांगलीच बहरली होती. त्यामुळे शेतकऱ्याला चांगले पीक येऊन हाताशी पैसेही मिळणार होते. मात्र अवेळी पडत असलेल्या पावसाने भातशेतीचे अतोनात नुकसान होत आहे. त्यातच वादळामुळे सुरू झालेल्या अतिवृष्टीने भातशेतीचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात भातशेती चांगलीच बहरली असताना काही भागात कापणीही सुरू झाली आहे. त्यामुळे कापलेल्या भाताचे भारे शेतकऱ्यांनी बांधून ठेवले आहेत. तर काही शेतकरी दसऱ्यानंतर भातकापणीला सुरुवात करतात. मात्र, पावसाने कापलेली भातपिके भिजली असून उभे असलेले पीकही पडले आहे. त्यामुळे भातपिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच १७ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा देण्यात आल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी