शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

श्रीवर्धनमध्ये शेतीनुकसानाची दुग्ध व्यवसायाला झळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 2:40 AM

: श्रीवर्धन तालुक्यातील दुर्गम गाव, वाड्या परिसरातील यंदा अवेळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

- गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील दुर्गम गाव, वाड्या परिसरातील यंदा अवेळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरवर्षी अनेक पिकातून जनावरांना उर्वरित चारा मुबलक मिळत होता. त्यामुळे परंपरेनुसार शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायच केला जात असे त्यातून चांगले उत्पन्न मिळत असल्याने आर्थिक प्रश्नही सुटत होते. मात्र, यावेळी जनावरांना चारा मुबलक मिळत नसल्याने येथील शेतकऱ्यांना व्यवसायापुढे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यातच माळरानावरील गवत पेटवून दिल्याने चाºयाचा तूटवडा निर्माण झाला आहे.तालुक्यात मागील काळात चाºयाचा प्रश्न उद्भवत नसल्याने शेतकऱ्यांनी शेती या मुख्य व्यवसायासोबतच दुग्ध व्यवसायाला प्राधान्य दिले. याच कालावधीत दुधाला योग्य दर मिळाल्याने जोड व्यवसायावर परिसरातील शेतकरी सधन झाले. अल्पावधीतच हा व्यवसाय भरभराटीस येऊन अनेक शेतकºयांनी प्रगती साधली व दुग्ध व्यवसायाकडे कल दाखविला. आज चित्र पालटले असून, दुधाचे भाव निम्म्यावर, तर पशुखाद्याचे भाव दुपटीने वाढल्याने दुग्धव्यवसायाकडे शेतकºयांनी पाठ फिरवल्याने हा व्यवसाय शेवटची घटका मोजत आहे. जनावरांच्या चाºयावर होणारा खर्च व दूध उत्पादनातून मिळणारे उत्पन्न हे समसमान असल्याने शेतकºयांच्या पदरात काहीच पडत नाही. जिल्ह्यात दुग्ध उत्पादन वृद्धीसाठी प्रयत्न झाल्याचे दुर्मिळच मात्र धवलक्रांतीचे स्वप्न आजही नजरेच्या टप्प्यात नाही.एकीकडे यावेळी अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतीतून अखेरीस जनावरांना मिळणारा पेंढा हा चारा मिळाला नाही. याशिवाय माळरानावरील गवत वानवा लावून पेटून देण्यात येत असल्याने उन्हाळी चाºयाचा प्रश्न निर्माण होत आहे. हिरवा चारा मिळणे दुरापास्त झाल्याने वाळलेल्या चाºयावर जनावरांची भूक भागवावी लागत आहे. याचा परिणाम दुधाळ जनावरांवर जास्त प्रमाणात होत असल्याने दुग्धोत्पादनात घट झाली आहे. अशा व्यवसायापुढे अनेक अडचणी निर्माण होत असल्याने शेतकºयांनी दुग्ध व्यवसायाकडे पाठ फिरवली आहे.तोट्याची कारणेशासनाची उदासीनता, महत्त्वाच्या योजना बंद, अत्याधुनिक सामग्री व तंत्रज्ञाचा अभाव हे आहेत. ठोस उपयायोजना, तसेच धोरणात्मक बदल अपेक्षित, आवश्यक यंत्रसामग्री व सुविधा निर्माण करणे, योजनांची प्रभावी अंमलबजावणी, तसेच नवीन योजना सुरू करणे सहकारी संस्थांना विश्वासात घेणे गरजेचे आहे.अतिवृष्टीमुळे यावेळी शेतकºयांचे मोठे नुकसान होऊन दुग्धव्यवसायावर परिणाम झाले आहे. यामुळेच पशुविभागाकडून मागील पंधरवड्यात जनावरांना चाºयासाठी मका बियाणे वाटप करण्यात आले आहे. पुढे शेतकºयांसाठी पंचायत समिती कृषी विभाग श्रीवर्धन मार्फत भाजीपाला बियाणेचे वाटप करण्यात येणार आहे.- बी. एल. कांबळे, कृषी अधिकारी,पंचायत समिती श्रीवर्धनजनावरांसाठी पोषक खाद्य नाहीउदासीनता हा मुख्य अडसर तालुक्यातील शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. बºयाच शेतकºयांना शासनाच्या योजनांची अद्याप नावेही माहित नाहीत. श्रीवर्धनसह दक्षिण रायगडमध्ये सध्या सुरती, मुरा, पंढरपुरी जातीच्या म्हशी दिसतात, तसेच जर्सी, एचएफ जातीच्या गायीसुद्धा आहेत.या जनावरांसाठी येथे पोषक खाद्याची उपलब्धता होत नाही. या म्हशी किंवा गायी एकावेळी ५ ते ७ लिटर दूध देतात. त्यांचे व्यवस्थित संगोपन झाल्यास दुधाचे प्रमाण वाढू शकते.तालुक्यात पाण्याची ही मुबलकता आहे. त्याचा योग्य पद्धतीने वापर केल्यास त्याचा दुग्ध व्यवसायास मोठा हातभार लागू शकतो. शेतकºयांना याबद्दल सखोल मार्गदर्शन होताना दिसत नाही. असे झाल्यास नक्कीच एक दिवस धवलक्रांती सत्यात उतरल्याशिवाय राहणार नाही. यात शासन आणि शेतकºयांत उदासिनता प्रकर्षाने जाणवते.

टॅग्स :Raigadरायगड