शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

“अमित शाह म्हणजे गजनी, उद्धव ठाकरे मात्र रामशास्त्री बाण्याचे नेतृत्व”; शिवसेनेची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 13:34 IST

आता शिवसेनेकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर बोचरी टीका करण्यात आली आहे.

रायगड: महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि भाजपमध्ये जवळपास दररोज आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. अनेकविध मुद्द्यांवरून दोन्ही पक्ष आमनेसामने येताना दिसत आहेत. रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या दिल्ली दौऱ्यादरम्यान केंद्रीय गृहमंत्री यांची भेट घेतली. यावेळी नक्षलग्रस्त भागाच्या समस्यांबाबतच्या बैठकीलाही उपस्थिती लावली. यानंतर आता शिवसेनेकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर बोचरी टीका करण्यात आली आहे. अमित शाह म्हणजे गजनी आहेत. याउलट, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र रामशास्त्री बाण्याचे नेतृत्व आहे, असे म्हटले आहे. (shiv sena arvind sawant alleged that bjp leader and union home minister amit shah is ghajini)

शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांना ईडीचे समन्स; सिटी बँक घोटाळा प्रकरणी हजर राहण्याचे आदेश

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला असून, यानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा आणि तर्क-वितर्कांना सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते आणि माजी केंद्रीयमंत्री अनंत गीते यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला होता. मात्र, यानंतर अरविंद सावंत यांनी भाजपवर टीका केली आहे. 

“राजसाहेब, भाजपशी युती करा, फायदा होईल”; पुण्यातील मनसे नेत्यांचा दबाव वाढला!

अमित शाह हे गजनी आहेत

मैने ऐसे कोई बोला नहीं था, हा गजनीचा झटका त्यांना येतो. अमित शाह गजनी असतील, पण आमचे मुख्यमंत्री उद्धव मात्र रामशास्त्री बाण्याने काम करणारे आमचे नेतृत्व आहे, हे लक्षात ठेवा, असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. भाजपने शिवसेनेला दिलेला शब्द पाळला नाही, या गोष्टीकडे अरविंद सावंत यांचा रोख होता, असे सांगितले जात आहे. 

“आम्हाला पुन्हा सत्तेची संधी मिळणारच आहे, तेव्हा...”: देवेंद्र फडणवीस

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिल्लीत भेट झाली. केंद्रीय गृह मंत्रालयाची नक्षलग्रस्त राज्यांतील मुख्यमंत्र्याशी दिल्लीत बैठक बोलावली होती. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही उपस्थित होते. याशिवाय बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आदी उपस्थित होते. तब्बल साडेतीन तास ही बैठक चालली. नक्षलग्रस्त भागात विकासाला गती मिळण्यासाठी केंद्र सरकारने या परिसरात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी १२०० कोटींच्या निधीची मदत करावी, नक्षल प्रभावित भागांतील रस्ते व पूल बांधकाम प्रकल्पांना मंजुरी मिळावी. या भागातील लोकोपयोगी कामांसाठी वन अधिनियमांतर्गत पुढचे तीन वर्षांसाठी मुदत वाढ मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत केली. 

टॅग्स :PoliticsराजकारणAmit Shahअमित शाहUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाArvind Sawantअरविंद सावंतBJPभाजपा