शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
7
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
9
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
10
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
11
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
12
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
13
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
14
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
15
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
16
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
17
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
18
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
19
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
20
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

“अमित शाह म्हणजे गजनी, उद्धव ठाकरे मात्र रामशास्त्री बाण्याचे नेतृत्व”; शिवसेनेची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 13:34 IST

आता शिवसेनेकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर बोचरी टीका करण्यात आली आहे.

रायगड: महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि भाजपमध्ये जवळपास दररोज आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. अनेकविध मुद्द्यांवरून दोन्ही पक्ष आमनेसामने येताना दिसत आहेत. रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या दिल्ली दौऱ्यादरम्यान केंद्रीय गृहमंत्री यांची भेट घेतली. यावेळी नक्षलग्रस्त भागाच्या समस्यांबाबतच्या बैठकीलाही उपस्थिती लावली. यानंतर आता शिवसेनेकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर बोचरी टीका करण्यात आली आहे. अमित शाह म्हणजे गजनी आहेत. याउलट, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र रामशास्त्री बाण्याचे नेतृत्व आहे, असे म्हटले आहे. (shiv sena arvind sawant alleged that bjp leader and union home minister amit shah is ghajini)

शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांना ईडीचे समन्स; सिटी बँक घोटाळा प्रकरणी हजर राहण्याचे आदेश

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला असून, यानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा आणि तर्क-वितर्कांना सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते आणि माजी केंद्रीयमंत्री अनंत गीते यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला होता. मात्र, यानंतर अरविंद सावंत यांनी भाजपवर टीका केली आहे. 

“राजसाहेब, भाजपशी युती करा, फायदा होईल”; पुण्यातील मनसे नेत्यांचा दबाव वाढला!

अमित शाह हे गजनी आहेत

मैने ऐसे कोई बोला नहीं था, हा गजनीचा झटका त्यांना येतो. अमित शाह गजनी असतील, पण आमचे मुख्यमंत्री उद्धव मात्र रामशास्त्री बाण्याने काम करणारे आमचे नेतृत्व आहे, हे लक्षात ठेवा, असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. भाजपने शिवसेनेला दिलेला शब्द पाळला नाही, या गोष्टीकडे अरविंद सावंत यांचा रोख होता, असे सांगितले जात आहे. 

“आम्हाला पुन्हा सत्तेची संधी मिळणारच आहे, तेव्हा...”: देवेंद्र फडणवीस

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिल्लीत भेट झाली. केंद्रीय गृह मंत्रालयाची नक्षलग्रस्त राज्यांतील मुख्यमंत्र्याशी दिल्लीत बैठक बोलावली होती. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही उपस्थित होते. याशिवाय बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आदी उपस्थित होते. तब्बल साडेतीन तास ही बैठक चालली. नक्षलग्रस्त भागात विकासाला गती मिळण्यासाठी केंद्र सरकारने या परिसरात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी १२०० कोटींच्या निधीची मदत करावी, नक्षल प्रभावित भागांतील रस्ते व पूल बांधकाम प्रकल्पांना मंजुरी मिळावी. या भागातील लोकोपयोगी कामांसाठी वन अधिनियमांतर्गत पुढचे तीन वर्षांसाठी मुदत वाढ मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत केली. 

टॅग्स :PoliticsराजकारणAmit Shahअमित शाहUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाArvind Sawantअरविंद सावंतBJPभाजपा