शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

गाळमुक्त धरण, शिवार योजना लोकसहभागातून; रवींद्र चव्हाण यांचे अधिकाऱ्यांना आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 01:18 IST

नदी, नाले, विहिरी, धरण गाळमुक्त केल्यास पाण्याची समस्या भासणार नाही.

विशेष प्रतिनिधी ।अलिबाग : जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे. या समस्येवर मात करण्यासाठी शासन ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना’ ही महत्त्वाकांक्षी योजना राबवित आहे. या योजनेची माहिती ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक गावात एक अधिकारी नेमण्यात यावा आणि लोकसहभाग जास्तीत जास्त प्रमाणात वाढावा. लोकसहभाग वाढल्यास योजनची कामे लवकरात लवकर होतील. यासाठी शासकीय विभागाच्या कृषी, महसूल आदी विभागातील अधिकारी, कर्मचारी वर्गानी प्रत्येक गावाचे नियोजन करून पाण्याच्या व्यवस्थापनाचा आराखडा तयार करावा, असे आदेश राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण व माहिती तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी येथे दिले आहेत.गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना व ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत किसान कल्याण दिवस कार्यशाळेचे आयोजन येथील पी.एन.पी. नाट्यगृहात करण्यात आले होते. या वेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) विश्वनाथ वेटकोळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके, आत्मा प्रकल्प संचालक पांडुरंग शिगेदार, नांदेड जिल्ह्यातील शेंबोली गावचे सरपंच बाळासाहेब देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. नियमित कामापेक्षा हे काम वेगळे असून ते नियोजनबद्ध झाल्यास वेगळेच समाधान तुम्हाला मिळणार आहे. जलक्र ांतीच्या कामात सर्वांनी सहभाग घ्यावा व योजनेचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, नागरिकांना जास्तीत जास्त प्रमाणात करून घ्यावा, असे आवाहनही चव्हाण यांनी या वेळी उपस्थित अधिकारी, कर्मचाºयांना केले.जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेचा एक भाग म्हणून गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना शासन राबविण्यता येत आहे. ही योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी यामध्ये लोकांचा सहभाग असणे गरजेचे असून, यासाठी मोठी लोकचळवळ उभी केली पाहिजे. गाळमुक्त धरण योजनेमुळे पाण्याची पातळी वाढते, पाण्याचे स्रोत वाढतात, तसेच काढलेला गाळ शेतकºयांनी शेतामध्ये वापरल्यास जमिनीची सुपीकता वाढून उत्पन्नवाढीसाठी याचा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.नदी, नाले, विहिरी, धरण गाळमुक्त केल्यास पाण्याची समस्या भासणार नाही. या कामासाठी जेसीबीची कमतरता भासत असेल, तर त्याचीही पूर्तता करण्याचा प्रयत्न केला जाईल. ज्या तालुक्यांमध्ये कंपन्या आहेत, त्यांच्याशीही संपर्क साधून त्यांना योजनेत सहभागी करून घ्यावे. पोलादपूर तालुक्यातील १४ गावांमध्ये फ्री वॉटर कप योजना कार्यान्वित करण्यात आल्याचेही सूर्यवंशी यांनी अखेरीस सांगितले.

टॅग्स :Waterपाणी