शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

गाळमुक्त धरण, शिवार योजना लोकसहभागातून; रवींद्र चव्हाण यांचे अधिकाऱ्यांना आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 01:18 IST

नदी, नाले, विहिरी, धरण गाळमुक्त केल्यास पाण्याची समस्या भासणार नाही.

विशेष प्रतिनिधी ।अलिबाग : जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे. या समस्येवर मात करण्यासाठी शासन ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना’ ही महत्त्वाकांक्षी योजना राबवित आहे. या योजनेची माहिती ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक गावात एक अधिकारी नेमण्यात यावा आणि लोकसहभाग जास्तीत जास्त प्रमाणात वाढावा. लोकसहभाग वाढल्यास योजनची कामे लवकरात लवकर होतील. यासाठी शासकीय विभागाच्या कृषी, महसूल आदी विभागातील अधिकारी, कर्मचारी वर्गानी प्रत्येक गावाचे नियोजन करून पाण्याच्या व्यवस्थापनाचा आराखडा तयार करावा, असे आदेश राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण व माहिती तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी येथे दिले आहेत.गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना व ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत किसान कल्याण दिवस कार्यशाळेचे आयोजन येथील पी.एन.पी. नाट्यगृहात करण्यात आले होते. या वेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) विश्वनाथ वेटकोळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके, आत्मा प्रकल्प संचालक पांडुरंग शिगेदार, नांदेड जिल्ह्यातील शेंबोली गावचे सरपंच बाळासाहेब देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. नियमित कामापेक्षा हे काम वेगळे असून ते नियोजनबद्ध झाल्यास वेगळेच समाधान तुम्हाला मिळणार आहे. जलक्र ांतीच्या कामात सर्वांनी सहभाग घ्यावा व योजनेचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, नागरिकांना जास्तीत जास्त प्रमाणात करून घ्यावा, असे आवाहनही चव्हाण यांनी या वेळी उपस्थित अधिकारी, कर्मचाºयांना केले.जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेचा एक भाग म्हणून गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना शासन राबविण्यता येत आहे. ही योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी यामध्ये लोकांचा सहभाग असणे गरजेचे असून, यासाठी मोठी लोकचळवळ उभी केली पाहिजे. गाळमुक्त धरण योजनेमुळे पाण्याची पातळी वाढते, पाण्याचे स्रोत वाढतात, तसेच काढलेला गाळ शेतकºयांनी शेतामध्ये वापरल्यास जमिनीची सुपीकता वाढून उत्पन्नवाढीसाठी याचा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.नदी, नाले, विहिरी, धरण गाळमुक्त केल्यास पाण्याची समस्या भासणार नाही. या कामासाठी जेसीबीची कमतरता भासत असेल, तर त्याचीही पूर्तता करण्याचा प्रयत्न केला जाईल. ज्या तालुक्यांमध्ये कंपन्या आहेत, त्यांच्याशीही संपर्क साधून त्यांना योजनेत सहभागी करून घ्यावे. पोलादपूर तालुक्यातील १४ गावांमध्ये फ्री वॉटर कप योजना कार्यान्वित करण्यात आल्याचेही सूर्यवंशी यांनी अखेरीस सांगितले.

टॅग्स :Waterपाणी