शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

सांबरकुंड धरण; योग्य मोबदला दिला, तरच धरणाला जमीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 11:28 IST

सोमवारी शेतकऱ्यांनी अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांना याबाबत निवेदन दिले आहे. त्यामुळे धरण उभारणीला ब्रेक मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

अलिबाग : एकीकडे सांबरकुंड धरण बांधकामाचा मार्ग मोकळा झाला असून धरण बांधण्यासाठी धरण उभारणीसाठी पुणे येथील महालक्ष्मी इंटरप्रायझेस कंपनीला ठेकाही दिला आहे, मात्र योग्य मोबदला दिला जात नाही, तोपर्यंत धरणाला जमीन देणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. सोमवारी शेतकऱ्यांनी अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांना याबाबत निवेदन दिले आहे. त्यामुळे धरण उभारणीला ब्रेक मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अलिबाग तालुक्यातील रामराज विभागातील महान, सांबरवाडी परिसरात सांबर कुंड धरणाला चाळीस वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली आहे. धरणामध्ये २३० खातेदारांची जमीन, घरे जाणार आहेत. २०११ ला शासनाने निवाडा केला होता. त्यानुसार शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला दिला जाणार होता. तो शेतकऱ्यांना मान्य नव्हता. २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार मोबदला देण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या बैठकीत २०१३ प्रमाणे दर निश्चित करून मोबदला शेतकऱ्यांना द्या, असे आदेश दिले होते. शेतकऱ्यांना २०१३ प्रमाणे मोबदला देण्याबाबत आदेश झालेला असतानाही प्रशासनाने उच्चतम दर ऐवजी न्यूनतम दर पकडला. त्यामुळे हेक्टरी ८२ लाख २८ हजार २४० रुपये दर निश्चित केला.  गुंठ्याला २ लाख ८ हजार म्हणजे हेक्टरी २ कोटी ८ हजार देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. 

पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्याची ग्वाहीसांबर कुंड धरणात बेघर होणाऱ्या धरणग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसन हे राजेवाडी येथे केले जात आहे. मात्र हे करताना शेतकऱ्यांना विचारात घेतले जात नाही. याबाबत अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांच्याकडे व्यथा मांडली. यावर थोरवे यांनी घटनास्थळी येऊन बैठक लावून प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले आहे. 

टॅग्स :RaigadरायगडDamधरणFarmerशेतकरी