शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

चिरनेर-आक्कादेवी दरम्यान साकवाचे काम निकृष्ट दर्जाचे; जंगल सत्याग्रहाचे ऐतिहासिक ठिकाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 1:17 AM

राजिपचे चौकशी करून कारवाईचे आदेश

उरण : उरणमध्ये लॉकडाउनचा गैरफायदा घेत ठेकेदाराकडून आदिवासींच्या रहदारीसाठी रायगड जिल्हा परिषदेमार्फत बांधण्यात येणाऱ्या चिरनेर-आक्कादेवी आदिवासीवाडी दरम्यान साकवाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. आदिवासींच्या वर्दळीसाठी उपयुक्त ठरणाºया साकवाच्या कामासाठी पावणेआठ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कामाचा दर्जा खालावला असून अतिवृष्टीत कधीही कोसळण्याची भीती आदिवासींकडून व्यक्त केली जात आहे.

उरण तालुक्यातील चिरनेर ग्रामपंचायतीच्या हद्दीत आक्कादेवी माळरानावर सुमारे २०० जणांची वस्ती आहे. चिरनेर जंगल सत्याग्रहातील आक्कादेवी माळरानही ऐतिहासिक ठिकाण आहे. याच ठिकाणी हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांचेही स्मारक असून दरवर्षी ३० सष्टेंबर रोजी हुतात्मा दिनाच्या निमित्ताने अभिवादन, मानवंदना देण्याचा कार्यक्रमही आयोजित करण्यात येतो.

आक्कादेवी माळरानावर वास्तव्य करणाºया ग्रामस्थांना रस्त्यात येणारे वाहते नाले पार करून ये-जा करावी लागते. पावसाळ्यात नाले तुडुंब भरून वाहत असल्याने वर्दळ करणे अवघड होते. शिवाय जीवासही धोका संभवतो. आदिवासींची समस्या हेरून रायगड जिल्हा परिषदेमार्फत चिरनेर - आक्कादेवी आदिवासीवाडी साकव बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

उभारण्यात येत असलेल्या सुमारे १५ मीटर लांबीच्या साकवाच्या बांधकामासाठी ७ लाख ७६ हजार ८४३ खर्चाच्या कामाला मंजुरी देण्यात आली असून ठेकेदाराने कामालाही सुरुवात केली आहे. मात्र लॉकडाउनचा गैरफायदा उठवत ठेकेदाराकडून साकवाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. पीसीसी, स्टील, सिमेंट, काँक्रीटच्या बांधकामात चक्क दगड, माती आणि तत्सम निरुपयोगी सामानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे.

एम-१२, एम-१५, एम-२०, एम-३५ आदी ग्रेडमधील बांधकामात निविदाप्रमाणे वायब्रेटिंग, क्युरिंग, सेंटरिंग आदींचा ठेकेदाराकडून वापरच केला जात नाही. कामाच्या निकृष्ट दर्जाबाबत येथील काही आदिवासींनी उरण पंचायत समिती आणि राजिप सदस्यांच्या भेटीगाठी घेऊन माहिती देऊन नाराजी व्यक्त केली आहे.

राजिप सदस्य विजय भोईर यांनी ही गंभीर बाब राजिप मुख्याधिकारी दिलीप हळदे यांच्याही निदर्शनास आणून दिली आहे. अद्यापही कारवाई केली नसल्याचे आदिवासींकडून सांगण्यात येत आहे. अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे ठेकेदाराला एक प्रकारे पाठबळच मिळत आहे. त्यामुळे पावसाळ्यात दुर्घटना झाल्यास त्यास संबंधित अधिकारी, ठेकेदार जबाबदार असतील, सरकारचा आदिवासींच्या विकासासाठी लाखोंचा होणारा खर्चही पाण्यात जात असल्याची तक्रार ग्रामस्थ करत आहेत.

मुख्याधिकाºयांच्या आदेशानंतर कारवाई

च्चिरनेर - आक्कादेवी आदिवासीवाडी दरम्यान साकवाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबाबत राजिप मुख्याधिकारी दिलीप हळदे यांच्या आदेशानंतर चौकशी करून कारवाई करण्याच्या सूचना राजिपचे पनवेल-उरण विभागाचे उपअभियंता बारदेशकर यांना दिल्याची माहिती राजिपचे अतिरिक्त मुख्याधिकारी रणधीर सोमवंशी यांनी दिली.

टॅग्स :Raigadरायगड