शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना : योजनेचा लाभच मिळत नसल्याने संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 1:34 AM

शासनाच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ न मिळाल्याने आडी गवळवाडीवरील शेतकऱ्यांनी महाड तहसीलदारांना निवेदन दिले आहे.

दासगाव - शासनाच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ न मिळाल्याने आडी गवळवाडीवरील शेतकऱ्यांनी महाड तहसीलदारांना निवेदन दिले आहे. तलाठी आणि ग्रामसेवक हे एकमेकांकडे बोट दाखवत शेतकऱ्यांना उत्तरे देत नसल्याने अखेर शेतक-यांनी हे निवेदन दिले आहे. याबाबत तहसीलदारांनी गंभीर दखल घेत योग्य कार्यवाही करण्याचे गट विकास अधिकारी यांना सूचित केले आहे.अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राज्यात १ डिसेंबर २०१८ पासून राबवण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार साधारण जानेवारी, फेब्रुवारीमध्ये या योजनेतील लाभार्थी शेतक-यांनी आपले अर्ज संबंधित शासकीय कर्मचाºयांकडे सुपूर्द केले. त्यातील काहींना या योजनेचा लाभ देखील प्राप्त झाला. मात्र महाड तालुक्यातील आडी गवळवाडी येथील शेतक-यांना या योजनेचा लाभच मिळाला नाही. या ग्रामपंचायतीमधील जवळपास ३२ शेतक-यांनी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले अर्ज दखल केले होते. मात्र यातील केवळ दोनच शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. ज्या शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही त्या शेतकºयांनी पुन्हा अर्ज करण्यासाठी प्रयत्न केले. अर्ज दाखल करण्याची तारीख २५ जून असून अर्ज आपल्याकडे नाहीत अशी उत्तरे तलाठी आणि ग्रामसेवकांकडून मिळत आहे. अर्ज या विहित वेळेत न मिळाल्यास अन्याय होण्याची भीती या शेतक-यांना आहे.याबाबत उर्वरित शेतक-यांनी ग्रामसेवक तायडे यांना विचारले असता त्यांनी तलाठ्यांकडे बोट दाखवले. मात्र हे काम ग्रामसेवकाकडे असल्याने आपला यात संबंध नाही असे उत्तर तलाठी पानसरे यांनी शेतकºयांना दिले. यामुळे या शेतकºयांनी थेट महाड सभापती दत्ताराम फळसकर यांची भेट घेतली. मात्र ग्रामसेवक तायडे याठिकाणी उपस्थित राहिले नाहीत.अखेर या ३२ शेतकºयांनी आपले निवेदन महाड तहसीलदार चंद्रसेन पवार यांना दिले.आडी गवळवाडी येथील शेतकºयांनी महाड तहसीलदार चंद्रसेन पवार यांना यामध्ये लक्ष घालावे अशी विनंती केली. तहसीलदार पवार यांनी तत्काळ महाड गट विकास अधिकारी प्रमोद गोडांबे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला आणि संबंधित ग्रामसेवकावर योग्य ती कार्यवाही व्हावी असे सूचित केले. पवार यांच्या या भूमिकेनंतर आडी गवळवाडी शेतकºयांनी गट विकास अधिकारी गोडांबे यांना देखील निवेदन दिले. यावेळी सरपंच विशाल चव्हाण, नथुराम कदम उपसरपंच, संतोष कांबळे, पांडुरंग कांबळे, सुनंदा खेडेकर, संतोष नटे, अंकिता महाडिक, सुषमा काते, ज्योती काते, आशा कांबळे, पार्वती मुरुडकर यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.आमच्या गावातील जवळपास ३२ शेतक-यांपैकी केवळ दोनच शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. याबाबत विचारणा केली असता ग्रामसेवक उत्तर देत नाही. शिवाय तलाठी देखील हे काम आपले नसल्याचे ग्रामस्थ विजय खेडेकर यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीRaigadरायगड