शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

भूसंपादनातून वगळण्यासाठी पालकमंत्र्यांना निवेदन, पेन्सील नोंदी रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2020 12:29 AM

बिरवाडीमधील सांडपाणी थेट काळ नदीपात्रात जात असल्याने काळ नदीचे पाणी प्रदूषित होऊन प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे.

बिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडी, काळीज,आमशेत येथील महाड व अतिरिक्त महाड औद्योगिक क्षेत्र जमीन भूसंपादनातून वगळणे, तसेच इतर समस्यांचे निराकरण करण्याबाबत बिरवाडीतील नागरिक विनोद पारेख यांनी राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री आदिती तटकरे, तसेच रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांना लेखी निवेदन दिले आहे.निवेदनात पाच प्रमुख मागण्यांचा समावेश करण्यात आला असून, शेतकऱ्यांच्या सात-बारावर एमआयडीसी पेन्सील नोंद रद्द करणे, बिरवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये गावठाण क्षेत्र वाढवणे, भूमिहीन शेतकऱ्यांना रोजगार देणे, बिरवाडीत कायमस्वरूपी सांडपाण्याची विल्हेवाट लावणे, एमआयडीसी महाडचे नामांतर करून एमआयडीसी बिरवाडी करणे आदी मागण्यांचा समावेश आहे.मागण्यांची पूर्तता न झाल्यास व्यापारी विनोद पारेख, माजी राजिप सदस्य कृष्णा घाग, माजी उपसरपंच अरुण पवार, बिरवाडी ग्रामपंचायत सदस्य अनंत पवार, चंद्रकांत पोळ, मधुकर शेडगे, अशोक कदम यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.पाच वर्षांपासून पत्रव्यवहार सुरू असून, मागण्यांची अद्याप पूर्तता होत नसल्याने एमआयडीसी कार्यालयावर धडक मोर्चा काढून चक्का जाम करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. ग्रामस्थांचे शिष्टमंडळ लवकरच रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे व खासदार सुनील तटकरे यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडणार आहे. बिरवाडीमधील सांडपाणी थेट काळ नदीपात्रात जात असल्याने काळ नदीचे पाणी प्रदूषित होऊन प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. शेतकºयांच्या जमिनीवर एमआयडीसीच्या पेन्सील नोंदी असल्याने कोणताही उद्योग, व्यवसाय या जमिनीवर शेतकºयाला करता येत नाही.- महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्याने गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ग्रामस्थांच्या मागण्या मार्गी लागतील, असा विश्वास ग्रामस्थांना आहे. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीनही पक्षांच्या नेत्यांची व लोकप्रतिनिधींची भेट घेऊन ग्रामस्थ आपली भूमिका मांडणार असल्याने या परिसरातील विकासाला चालना मिळेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :Aditi Tatkareअदिती तटकरे