शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

कृषिपंप वीजजोडणी धोरणच्या अटी शिथिल करा, पुनर्विचार करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 00:25 IST

agricultural pump news : सरकारच्या नवीन कृषिपंप वीज जोडणी धोरण २०२०मधील अटी कोकणातील विषेशतः रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर नसल्याने त्या अटी व शर्थींचा पुनर्विचार करून त्यामध्ये दुरुस्ती करावी

रायगड - सरकारच्या नवीन कृषिपंप वीज जोडणी धोरण २०२०मधील अटी कोकणातील विषेशतः रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर नसल्याने त्या अटी व शर्थींचा पुनर्विचार करून त्यामध्ये दुरुस्ती करावी, अशी मागणी रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष ॲड. प्रवीण ठाकूर यांनी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.वीज जोडणीचा खर्च शेतकऱ्याला भरायला लागणार नाही, अशी सुधारणा नवीन कृषी धोरणात करणे आवशक आहे असे ॲड. ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे. काेकणातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत शेतकऱ्याला खर्च भरण्याची अट काढून टाकून त्याला प्राधान्याने वीज पुरवठा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.कृषिपंप जोडणीसाठी निर्धारित नियम व अटींच्या आधारे कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. कृषिपंप वीज जोडणी धोरण २०२० नुसार एलटीलाईनवरून ३० मीटरपर्यंत अंतर असलेल्या ग्राहकाला लोड शिल्लक असल्यास एक महिन्यात जोडणी देण्यात येणार आहे. तसेच एलटीलाईनपासून २०० मीटरच्या आत अंतर असलेल्या आणि पर्याप्त लोड शिल्लक असलेल्या ग्राहकाला तीन महिन्यांच्या आत केबलच्या माध्यमातून जोडणी देण्यात येणार आहे.२०० मीटरपेक्षा जास्त अंतर असलेल्यांसाठीही यात समावेश आहे. ६०० मीटरपेक्षा जास्त अंतर असल्यास सौर ऊर्जेवर वीजजोडणी देण्यात येणार आहे. ६०० मीटरपर्यंतसाठीही एचव्हीडीएसमधून पर्याय असणार आहे. यासाठी दोन ग्राहकांपर्यंत एक ट्रान्सफॉर्मरची सुविधा देण्यात येणार आहे. यात ६०० मीटरपेक्षा अधिक अंतर असलेल्यांनाही योजनेचा लाभ मिळेल. परंतु बिल परताव्यातील सूट ६०० मीटरपर्यंतसाठीच मिळणार आहे. आर्थिक क्षमता नसलेल्यांसाठीही प्राधान्यक्रमानुसार कार्यवाही होणार आहे. तसेच आजी, माजी सैनिक, एससी, एसटी घटकांसाठी प्राधान्यक्रमाने जोडणी देण्यात येणार आहे. ग्राहकांकडून सामाजिक बंधपत्र घेणार आहे. तसेच पंपाला कॅपॅसीटर बसविणे आवश्यक आहे. यात ट्रान्सफॉर्मर फेल झाल्यास ८० टक्के पंपांना कॅपॅसीटर बसविलेला आणि ८० टक्के ग्राहकांनी वीज बिल भरणा सणे आवश्यक आहे, तरच ट्रान्सफॉर्मर बदलण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी याेजना असावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.एक लाख वीस हजारांच्या परताव्यासाठी लागू शकतात वीस वर्षेकृषिपंप वीज जोडणी धोरणानुसार वीज जोडणीचा खर्च अर्जदारास करायचा आहे. याचा परतावा ग्राहकाला वीज बिलातून देण्यात येणार आहे. तसेच अर्जदाराची आर्थिक कुवत नसल्यास प्राधान्यक्रमानुसार कनेक्शन देण्यात येणार आहे. अलिबाग तालुक्यातील एका शेतकऱ्याला चार खांब टाकण्यास एक लाख वीस हजार रुपये खर्च सांगण्यात आला आहे. कोकणातील शेतकरी शेतीसाठी जो कृषी पंप वापरतो त्याचे बिल महिना चारशे किंवा पाचशे रुपये येण्याची शक्यता असते. त्यामुळे एक लाख वीस हजार त्याला बिलातून परतावा करून देण्यासाठी वीस वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला या योजनेचा फायदा मिळण्याऐवजी वीज जोडणीसाठी लाख ते सव्वा लाख रुपये कर्ज काढून भरावे लागणार आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीRaigadरायगड