शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

उरणमधील रानसई धरणाची पाणी पातळी खालावली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 00:43 IST

६४ दिवस पुरेल इतकेच पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कउरण : उरण परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणातील पाण्याची पातळी खालावली असून नागरिकांना फक्त पुढील  ६४ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे उरणकरांचा  पाणीपुरवठा या  आठवड्यापासून मंगळवार आणि शुक्रवार असा दोन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उरण विभागाचे प्रभारी उपअभियंता रणजित काळेबाग यांनी दिली.उरणकरांची तहान भागवण्यासाठी तालुक्यातील रानसई एकमेव धरण आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या या रानसई धरणातूनच उरण तालुक्यातील ३७ ग्रामपंचायती, उरण नगर परिषद आणि परिसरातील काही औद्योगिक कंपन्यांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र या वर्षी रानसई धरणात येत्या एप्रिल महिन्यापर्यंत नागरिकांना पुरेल इतकाच ६४ दिवसांचा पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यातच  कडक उन्हाच्या तडाख्याने रानसई धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची  पातळी आणखीनच कमी होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय मागील वर्षात पावसाचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळेही उरणच्या पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे पाणीटंचाईची झळ बसणार नाही याची धोरण उरण एमआयडीसीने स्वीकारले आहे. यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून शहरी व ग्रामीण भागातील पाणीपुरवठा आठवड्यातून मंगळवारी आणि शुक्रवारी असा दोन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी उपअभियंता रणजित काळेबाग यांनी दिली. 

हेटवणेतून घेतले जाते पाणी एमआयडीसीकडून दहा एमएलडी पाणीपुरवठा करण्याची मागणी केली जाते. मात्र सिडकोकडून पाच एमएलडी इतके मिळते. त्यामुळे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि उरणकरांना पावसाळ्यापर्यंत सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी वाया न घालवता जपून वापर करावा असे आवाहनही काळेबाग यांनी केले आहे.