शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

Raigad Flood:...आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला; मृतांच्या नातेवाईकांना दिला भावनिक आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 07:48 IST

प्रश्न सोडवण्यास प्राधान्य : उत्कृष्ट दर्जाच्या पुनर्वसनासाठी प्रयत्नशील असणार

ठळक मुद्देमहाड तालुक्यातील भोर घाट रस्त्यावर शिंदे वाडी येथून सहा ते सात किलोमीटर डोंगर भागात तळीये हे गाव होते. गावात उरलेली १५६ ग्रामस्थांपैकी १०९ ग्रामस्थांचे नशीब बलवत्तर म्हणून ते वाचले आहेत.जिल्ह्याची पालक म्हणून दरड ग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याची जबाबदारी माझी राहील.

निखिल म्हात्रेअलिबाग : जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक हा माझा नातेवाईक आहे. जे त्याचे दुःख, ते माझे दुःख असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी म्हणाल्या. मृतांची व त्यांच्या नातेवाइकांची अवस्था पाहून घटनास्थळी त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला, तर म्हाडाकडून करण्यात येणारे पुनर्वसन उत्कृष्ट दर्जाचे व्हावे म्हणून प्रयत्न असणार आहे, असे तळीये दुर्घटनेतील अनुभव सांगताना निधी चौधरी यांनी लोकमतला सांगितले.

महाड तालुक्यातील भोर घाट रस्त्यावर शिंदे वाडी येथून सहा ते सात किलोमीटर डोंगर भागात तळीये हे गाव होते. या गावाची लोकसंख्या होती २४१, मात्र आता फक्त १५६ जण आहेत. गावात उरलेली १५६ ग्रामस्थांपैकी १०९ ग्रामस्थांचे नशीब बलवत्तर म्हणून ते वाचले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची पालक म्हणून दरड ग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याची जबाबदारी माझी राहील. प्रामुख्याने त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी लोकमतला सांगितले.

जिल्ह्यात १०३ दरडग्रस्त गाव आहेत. यामध्ये तळीये गाव नव्हते, तरी येथे दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत ५२ जिल्हावासी मृत्युमुखी पडले आहेत, तर ३३ जणांचे शोधकार्य अद्याप सुरू आहे. माझ्या जिल्ह्यावर आलेली काळरात्र वेदनादायी ठरली आहे. ही दुर्दैवी घटना कधी विसरता येणार नाही, असे निधी चौधरी यांनी भावनाविवश होऊन सांगितले. तळीये येथे आपल्या नातेवाइकांचा शोध घेण्यासाठी लांबवरून नातेवाईक आले होते. घटनास्थळीच चित्र पाहता नागरिकांचा आक्रोश केला, त्यांच्या भावना समजून घेत मृतांच्या नातेवाइकांना भावनिक आधार दिला.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीfloodपूर