शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

Raigad Flood:...आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला; मृतांच्या नातेवाईकांना दिला भावनिक आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 07:48 IST

प्रश्न सोडवण्यास प्राधान्य : उत्कृष्ट दर्जाच्या पुनर्वसनासाठी प्रयत्नशील असणार

ठळक मुद्देमहाड तालुक्यातील भोर घाट रस्त्यावर शिंदे वाडी येथून सहा ते सात किलोमीटर डोंगर भागात तळीये हे गाव होते. गावात उरलेली १५६ ग्रामस्थांपैकी १०९ ग्रामस्थांचे नशीब बलवत्तर म्हणून ते वाचले आहेत.जिल्ह्याची पालक म्हणून दरड ग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याची जबाबदारी माझी राहील.

निखिल म्हात्रेअलिबाग : जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक हा माझा नातेवाईक आहे. जे त्याचे दुःख, ते माझे दुःख असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी म्हणाल्या. मृतांची व त्यांच्या नातेवाइकांची अवस्था पाहून घटनास्थळी त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला, तर म्हाडाकडून करण्यात येणारे पुनर्वसन उत्कृष्ट दर्जाचे व्हावे म्हणून प्रयत्न असणार आहे, असे तळीये दुर्घटनेतील अनुभव सांगताना निधी चौधरी यांनी लोकमतला सांगितले.

महाड तालुक्यातील भोर घाट रस्त्यावर शिंदे वाडी येथून सहा ते सात किलोमीटर डोंगर भागात तळीये हे गाव होते. या गावाची लोकसंख्या होती २४१, मात्र आता फक्त १५६ जण आहेत. गावात उरलेली १५६ ग्रामस्थांपैकी १०९ ग्रामस्थांचे नशीब बलवत्तर म्हणून ते वाचले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची पालक म्हणून दरड ग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याची जबाबदारी माझी राहील. प्रामुख्याने त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी लोकमतला सांगितले.

जिल्ह्यात १०३ दरडग्रस्त गाव आहेत. यामध्ये तळीये गाव नव्हते, तरी येथे दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत ५२ जिल्हावासी मृत्युमुखी पडले आहेत, तर ३३ जणांचे शोधकार्य अद्याप सुरू आहे. माझ्या जिल्ह्यावर आलेली काळरात्र वेदनादायी ठरली आहे. ही दुर्दैवी घटना कधी विसरता येणार नाही, असे निधी चौधरी यांनी भावनाविवश होऊन सांगितले. तळीये येथे आपल्या नातेवाइकांचा शोध घेण्यासाठी लांबवरून नातेवाईक आले होते. घटनास्थळीच चित्र पाहता नागरिकांचा आक्रोश केला, त्यांच्या भावना समजून घेत मृतांच्या नातेवाइकांना भावनिक आधार दिला.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीfloodपूर