शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
3
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
4
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
5
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
6
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
7
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
8
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
9
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
10
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
11
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
12
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
13
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
14
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
15
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
16
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
17
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
20
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान

रायगडमध्ये बेरोजगारीचा प्रश्न कायम, साडेचार वर्षांमध्ये आश्वासनांची पूर्ती नाही।

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 4:42 AM

रायगड लोकसभा मतदार संघातून २०१४ साली मतदारांनी शिवसेनेचे अनंत गीते यांना निवडून दिले होते. निवडून आल्यानंतर केंद्रामध्ये अवजड उद्योग विभागाचे मंत्रिपद गीते यांना मिळाले.

- आविष्कार देसाईअलिबाग - रायगड लोकसभा मतदार संघातून २०१४ साली मतदारांनी शिवसेनेचे अनंत गीते यांना निवडून दिले होते. निवडून आल्यानंतर केंद्रामध्ये अवजड उद्योग विभागाचे मंत्रिपद गीते यांना मिळाले. त्यानंतर त्यांनी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील बेरोजगारी मोडीत काढण्यासाठी रायगड-रोहे तालुक्यातील चणेरा आणि रत्नागिरी-लोटे-परशुराम परिसरात दोन मोठ्या पेपर इंडस्ट्री स्थापन करण्याच्या घोषणा केल्या होत्या. तसेच अलिबागला रेल्वे आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र, गेल्या साडेचार वर्षांमध्ये या दोन्हीही आश्वासनांची पूर्ती झाली नाही त्यामुळे शिवसेनेला या निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे.भाजपा-शिवसेना युतीने २०१४ च्या निवडणुकीत भरमसाठ आश्वासने दिली होती. त्याचा विसर मतदारांना अद्यापही पडलेला नाही. त्यानंतर आता २०१९ च्या निवडणुकीसाठी नवीन घोषणा करूनमतदारांना प्रलोभनेदाखवली जात आहेत.रायगड जिल्हा हा मुंबईच्या अगदी जवळ, तर रत्नागिरी जिल्हा हा कोल्हापूरच्या जवळ असणारे जिल्हे आहेत; परंतु म्हणावी तशी अद्याप दोन्ही जिल्ह्यांची प्रगती झालेली नाही. बेरोजगारी असल्याने तेथील तरुण आजही पोटापाण्यासाठी मुंबई, पुण्यात भटकंती करत आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील बेरोजगारी कमी करण्यासाठी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी रायगड जिल्ह्यातील रोहे तालुक्यातील चणेरा आणि रत्नागिरीमधील लोटे-परशुराम परिसरात दोन मोठ्या पेपर इंडस्ट्रीज स्थापन करण्याच्या घोषणा केल्या होत्या. लोटे परशुराम येथे फक्त त्यांनी जागा बघितली आहे, तर रोहे तालुक्यातील चणेरा येथे जागेचा पत्ताच नाही. गेल्या साडेचार वर्षांत या दोन्ही ठिकाणी काहीच काम झाले नाही त्यामुळे याचा फटका त्यांना बसू शकतो.याबाबत अनंत गीते यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.आरसीएफ कं पनीतील१४१ प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सुटला नाहीअलिबाग तालुका हा मुंबईला हाकेच्या अंतरावर आहे, असे असतानादेखील अलिबागमध्ये रेल्वे आलेली नाही. अलिबागला रेल्वे आणण्याचे आश्वासन गीते यांनी दिले होते. काही राजकीय पक्षांनी विरोध केल्याने रेल्वे आणण्यात अडचणी येत असल्याचे मध्यंतरी त्यांनी एका जाहीर सभेत सांगितले होते.मात्र, कें द्रात आणि राज्यात सत्ता असूनही काम न झाल्याने नाराजी व्यक्त के ली जात आहे.अलिबाग तालुक्यातील थळ येथील आरसीएफ कंपनीमधील १४१ प्रकल्प्रस्तांचा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून भिजत पडलेला आहे. गीते यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी हातामध्ये घेतला होता. मात्र, त्यातही त्यांना यश आले नाही, यातील प्रकल्पग्रस्त आजही वाऱ्यावरच आहेत.

टॅग्स :jobनोकरीNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकर