शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
5
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
6
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
7
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
8
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
9
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
10
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
11
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
12
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
13
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
14
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
15
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
16
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
17
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
18
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
19
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
20
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी

रेल्वेस्थानकात सुविधांची वानवा

By admin | Updated: October 19, 2015 01:19 IST

महाड तालुक्यातील खाडीपट्टी विभागातील वामणे - सापे रेल्वे स्थानकात प्रवाशांना कोणतीच सुविधा नाही, तसेच निवारा शेड नसल्याने पावसाळ्यात भिजत तर ऊन्हात तापत

दासगांव : महाड तालुक्यातील खाडीपट्टी विभागातील वामणे - सापे रेल्वे स्थानकात प्रवाशांना कोणतीच सुविधा नाही, तसेच निवारा शेड नसल्याने पावसाळ्यात भिजत तर ऊन्हात तापत या रेल्वे स्थानकात उभे राहावे लागत आहे, तसेच येथे बसण्याची कोणती सुविधा नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, स्वच्छालय नाही, यामुळे या ठिकणाहून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे या गैरसोर्इंकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी होत आहे.महाड तालुक्यातील वामणे - सापे हे रेल्वे स्थानक खाडीपट्टी विभागातील म्हत्वाचे स्थानक आहे. या स्थानकावरून गोठे, रावढल, तुडील, खुटील, नरवण, वामणे, सापे, नडगाव, म्हाप्रल, मंडणगड, आंबेत, या अनेक गावातून नागरिक कोकण रेल्वेचा प्रवास करतात. या सर्व गावांना हेच जवळचे स्थानक आहे. या स्थानकावरून दरदिवशी या गावातील शेकडो नागरिक रेल्वेने ये - जा करत आहेत. कोकण रेल्वेने ज्या वेळी कोकणात सुरुवात केली त्यावेळी वीर स्थानक व करंजाडी या मधल्या टप्प्यात रेल्वेचे स्थानकच नव्हते. या खाडी पट्यातील नागरिकांना रेल्वे मार्गाने प्रवास करावयाचा असेल तर विर स्थानकात किंवा करजाडी स्थानकात जावे लागत असे. याचा विचार करत या विभागातील ३० गावांची मनसुर इब्राहीम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली खाडीपट्टा एकता रेल्वे संघर्ष समिती तयार करण्यात आली. व या खाडी पट्टा विभागात रेल्वेचे स्थानक व्हावे यासाठी आंदोलन करण्यात आले. नागरिकांचा विचार करत १२ वर्षापूर्वी कोकण रेल्वे प्रशासनाने वामणे सापे स्थानक तयार केले. या ठिकाणी कोकण रेल्वेच्या दोन गाड्यांना थांबा देऊन या विभागातील रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर केली.कोकण रेल्वेने या ठिकाणी स्थानक दिले. थांबा दिला मात्र निवारा शेडची काही सोय नाही. प्रवाशांना बसण्याचे आसन नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, वॉचमॅन नाही यामुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आहे. तसेच तिकीट घरदेखील नाही या ठिकाणी खाजगी व्यक्ती कमिशनवर प्रवाशांची गैर सोय होऊ नये म्हणून हे काम करत आहे.या अगोदर या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विर किंवा करंजाडी स्थानकता तिकीटसाठी जावे लागत होते. सध्याच्या स्थितीत या वामणे - सापे स्थानकावर खाडीपट्टी विभागातील दरदिवशी शेकडो प्रवासी रेल्वेने ये - जा करीत आहेत. मात्र या ठिकाणी या स्थानकात होणाऱ्या गैरसोई बद्दल रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने प्रवाशांमध्ये रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजी आहे. रेल्वे प्रशासनाने वामणे - सापे या स्थानकात होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)