शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

रेल्वेस्थानकात सुविधांची वानवा

By admin | Updated: October 19, 2015 01:19 IST

महाड तालुक्यातील खाडीपट्टी विभागातील वामणे - सापे रेल्वे स्थानकात प्रवाशांना कोणतीच सुविधा नाही, तसेच निवारा शेड नसल्याने पावसाळ्यात भिजत तर ऊन्हात तापत

दासगांव : महाड तालुक्यातील खाडीपट्टी विभागातील वामणे - सापे रेल्वे स्थानकात प्रवाशांना कोणतीच सुविधा नाही, तसेच निवारा शेड नसल्याने पावसाळ्यात भिजत तर ऊन्हात तापत या रेल्वे स्थानकात उभे राहावे लागत आहे, तसेच येथे बसण्याची कोणती सुविधा नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, स्वच्छालय नाही, यामुळे या ठिकणाहून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे या गैरसोर्इंकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी होत आहे.महाड तालुक्यातील वामणे - सापे हे रेल्वे स्थानक खाडीपट्टी विभागातील म्हत्वाचे स्थानक आहे. या स्थानकावरून गोठे, रावढल, तुडील, खुटील, नरवण, वामणे, सापे, नडगाव, म्हाप्रल, मंडणगड, आंबेत, या अनेक गावातून नागरिक कोकण रेल्वेचा प्रवास करतात. या सर्व गावांना हेच जवळचे स्थानक आहे. या स्थानकावरून दरदिवशी या गावातील शेकडो नागरिक रेल्वेने ये - जा करत आहेत. कोकण रेल्वेने ज्या वेळी कोकणात सुरुवात केली त्यावेळी वीर स्थानक व करंजाडी या मधल्या टप्प्यात रेल्वेचे स्थानकच नव्हते. या खाडी पट्यातील नागरिकांना रेल्वे मार्गाने प्रवास करावयाचा असेल तर विर स्थानकात किंवा करजाडी स्थानकात जावे लागत असे. याचा विचार करत या विभागातील ३० गावांची मनसुर इब्राहीम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली खाडीपट्टा एकता रेल्वे संघर्ष समिती तयार करण्यात आली. व या खाडी पट्टा विभागात रेल्वेचे स्थानक व्हावे यासाठी आंदोलन करण्यात आले. नागरिकांचा विचार करत १२ वर्षापूर्वी कोकण रेल्वे प्रशासनाने वामणे सापे स्थानक तयार केले. या ठिकाणी कोकण रेल्वेच्या दोन गाड्यांना थांबा देऊन या विभागातील रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर केली.कोकण रेल्वेने या ठिकाणी स्थानक दिले. थांबा दिला मात्र निवारा शेडची काही सोय नाही. प्रवाशांना बसण्याचे आसन नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, वॉचमॅन नाही यामुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आहे. तसेच तिकीट घरदेखील नाही या ठिकाणी खाजगी व्यक्ती कमिशनवर प्रवाशांची गैर सोय होऊ नये म्हणून हे काम करत आहे.या अगोदर या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विर किंवा करंजाडी स्थानकता तिकीटसाठी जावे लागत होते. सध्याच्या स्थितीत या वामणे - सापे स्थानकावर खाडीपट्टी विभागातील दरदिवशी शेकडो प्रवासी रेल्वेने ये - जा करीत आहेत. मात्र या ठिकाणी या स्थानकात होणाऱ्या गैरसोई बद्दल रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने प्रवाशांमध्ये रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजी आहे. रेल्वे प्रशासनाने वामणे - सापे या स्थानकात होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)