शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
4
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
5
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
6
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
7
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
8
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
9
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
10
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
11
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
13
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
14
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
15
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
16
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
17
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
18
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
19
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
20
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'

उरणातील शेकडो हेक्टर खारफुटी, पाणथळ क्षेत्रात नवी मुंबई सेझ आयटी हब प्रकल्प निर्मितीचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 16:36 IST

राज्य शासनाने नुकतीच नवी मुंबई सेझला एकात्मिक औद्योगिक प्राधिकरणात बदलण्यास परवानगी दिली आहे.

मधुकर ठाकूर 

उरण : उरण परिसरातील नवी मुंबई सेझवर अल्ट्रा मॉडर्न आयटी हब प्रकल्प उभारणे पर्यावरणासाठी पुर्तता हानीकारक ठरणार आहे.या प्रकल्पामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होणार आहे.त्याशिवाय अशा प्रकारच्या विकासाच्या नावाखाली उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पामुळे पाणी शोषून घेण्यासाठी उरण परिसरात जमीनच शिल्लक राहणार नसल्याने उरण क्षेत्राला पुराचा तडाखा बसण्याची भीती असल्याच्या पर्यावरणवाद्यांच्या तक्रारींनंतर मुख्यमंत्र्यांनी पर्यावरण आणि वन सचिवांना या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्य शासनाने नुकतीच नवी मुंबई सेझला एकात्मिक औद्योगिक प्राधिकरणात बदलण्यास परवानगी दिली आहे. यानंतर नवी मुंबई सेझच्या भूखंडाचा वापर ८५% व्यावसायिक आणि १५% रहिवासी उद्देशासाठी केला जाणार आहे.या प्रकल्पामुळे शेकडो हेक्टर पाणथळ क्षेत्र आणि हजारो खारफुटींवर माती-दगडाचा भराव घातला जाणार आहे.आगामी या प्रकल्पामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास  होईल.पर्यावरणाची हानी करणा-या अशा प्रकारच्या विकासाच्या नावाखाली उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पामुळे पाणी शोषून घेण्यासाठी उरण परिसरात जमीनच शिल्लक राहणार नाही. यामुळे उरण क्षेत्राला पुराचा तडाखा बसण्याची भीती नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी.एन.कुमार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या तक्रारीतुन व्यक्त केली आहे.पर्यावरणवाद्यांच्या तक्रारींनंतर मुख्यमंत्र्यांनी पर्यावरण आणि हवामान बदल विभागाचे प्रमुख सचिव प्रविण दरडे आणि वन विभागाचे सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांना या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

नॅटकनेक्ट फाउंडेशनने केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाला (एमओइएफसीसी) आणि मुख्यमंत्र्यांना सिडकोने मोठ्या प्रमाणात खारफुटी  आणि पाणथळ क्षेत्रांना नवी मुंबई सेझला वितरण करण्यात आल्या प्रकरणी या आधीही तक्रारी केल्या आहेत. नवी मुंबई सेझने एका मोठ्या खाजगी कंपनीसोबत एमओयूवर स्वाक्षरी केल्यानंतर तर विकासाच्या नावाखाली खारफुटी आणि पाणथळ क्षेत्रांचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत आहे.याबाबत उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या उच्च-अधिकार समित्यांनी खारफुटी व पाणथळ क्षेत्रांचे पुनर्वसन करण्याचे आदेश देखील अंमलबजावणी न झाल्यामुळे विफल ठरले असल्याचे नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी.एन.कुमार यांचे म्हणणे आहे.

पाणजे आंतरभरती सर्वात मोठा विवादास्पद प्रश्न  पाणथळ क्षेत्र होय. याचा विस्तार २८९ हेक्टर क्षेत्रावर करण्यात आला आहे. या भागाला सिडकोमार्फत पूर निवारण उपाययोजना म्हणून धारण तलावाच्या स्वरुपात परावर्तित करण्यात आले होते. तरीही  सिडकोने पाणजे पाणथळ क्षेत्राला नवी मुंबई सेझचे सेक्टर १६ ते २८ म्हणून विकास आराखड्यात दाखवले आहे. यामुळे या भागातही मोठ्या प्रमाणात बांधकाम होणार असून धारण तलाव आता नाहीसा होणार आहे. खारफुटी व पाणथळ जागांवर अमानुष पध्दतीने घातला जाणारा भराव या आधीच उरण परिसरातील काही गावे आणि भातशेतीमध्ये पुर येण्याचे कारण बनला आहे. असे भराव व बांधकामांमुळे आंतरभरतीच्या मुक्त प्रवाहात अडथळा निर्माण झाला आहे. तसेच द्रोणागिरी नोडच्या निर्मितीसाठी जमीनीच्या पातळ्या वाढवल्या गेल्या आहेत.यामुळेही अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचा गंभीर आरोप श्री एकवीरा आई प्रतिष्ठान व सागरशक्तीचे संचालक नंदकुमार पवार यांनी माहिती देताना केला आहे.

टॅग्स :uran-acउरण