शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

उरणातील शेकडो हेक्टर खारफुटी, पाणथळ क्षेत्रात नवी मुंबई सेझ आयटी हब प्रकल्प निर्मितीचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 16:36 IST

राज्य शासनाने नुकतीच नवी मुंबई सेझला एकात्मिक औद्योगिक प्राधिकरणात बदलण्यास परवानगी दिली आहे.

मधुकर ठाकूर 

उरण : उरण परिसरातील नवी मुंबई सेझवर अल्ट्रा मॉडर्न आयटी हब प्रकल्प उभारणे पर्यावरणासाठी पुर्तता हानीकारक ठरणार आहे.या प्रकल्पामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होणार आहे.त्याशिवाय अशा प्रकारच्या विकासाच्या नावाखाली उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पामुळे पाणी शोषून घेण्यासाठी उरण परिसरात जमीनच शिल्लक राहणार नसल्याने उरण क्षेत्राला पुराचा तडाखा बसण्याची भीती असल्याच्या पर्यावरणवाद्यांच्या तक्रारींनंतर मुख्यमंत्र्यांनी पर्यावरण आणि वन सचिवांना या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्य शासनाने नुकतीच नवी मुंबई सेझला एकात्मिक औद्योगिक प्राधिकरणात बदलण्यास परवानगी दिली आहे. यानंतर नवी मुंबई सेझच्या भूखंडाचा वापर ८५% व्यावसायिक आणि १५% रहिवासी उद्देशासाठी केला जाणार आहे.या प्रकल्पामुळे शेकडो हेक्टर पाणथळ क्षेत्र आणि हजारो खारफुटींवर माती-दगडाचा भराव घातला जाणार आहे.आगामी या प्रकल्पामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास  होईल.पर्यावरणाची हानी करणा-या अशा प्रकारच्या विकासाच्या नावाखाली उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पामुळे पाणी शोषून घेण्यासाठी उरण परिसरात जमीनच शिल्लक राहणार नाही. यामुळे उरण क्षेत्राला पुराचा तडाखा बसण्याची भीती नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी.एन.कुमार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या तक्रारीतुन व्यक्त केली आहे.पर्यावरणवाद्यांच्या तक्रारींनंतर मुख्यमंत्र्यांनी पर्यावरण आणि हवामान बदल विभागाचे प्रमुख सचिव प्रविण दरडे आणि वन विभागाचे सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांना या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

नॅटकनेक्ट फाउंडेशनने केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाला (एमओइएफसीसी) आणि मुख्यमंत्र्यांना सिडकोने मोठ्या प्रमाणात खारफुटी  आणि पाणथळ क्षेत्रांना नवी मुंबई सेझला वितरण करण्यात आल्या प्रकरणी या आधीही तक्रारी केल्या आहेत. नवी मुंबई सेझने एका मोठ्या खाजगी कंपनीसोबत एमओयूवर स्वाक्षरी केल्यानंतर तर विकासाच्या नावाखाली खारफुटी आणि पाणथळ क्षेत्रांचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत आहे.याबाबत उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या उच्च-अधिकार समित्यांनी खारफुटी व पाणथळ क्षेत्रांचे पुनर्वसन करण्याचे आदेश देखील अंमलबजावणी न झाल्यामुळे विफल ठरले असल्याचे नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी.एन.कुमार यांचे म्हणणे आहे.

पाणजे आंतरभरती सर्वात मोठा विवादास्पद प्रश्न  पाणथळ क्षेत्र होय. याचा विस्तार २८९ हेक्टर क्षेत्रावर करण्यात आला आहे. या भागाला सिडकोमार्फत पूर निवारण उपाययोजना म्हणून धारण तलावाच्या स्वरुपात परावर्तित करण्यात आले होते. तरीही  सिडकोने पाणजे पाणथळ क्षेत्राला नवी मुंबई सेझचे सेक्टर १६ ते २८ म्हणून विकास आराखड्यात दाखवले आहे. यामुळे या भागातही मोठ्या प्रमाणात बांधकाम होणार असून धारण तलाव आता नाहीसा होणार आहे. खारफुटी व पाणथळ जागांवर अमानुष पध्दतीने घातला जाणारा भराव या आधीच उरण परिसरातील काही गावे आणि भातशेतीमध्ये पुर येण्याचे कारण बनला आहे. असे भराव व बांधकामांमुळे आंतरभरतीच्या मुक्त प्रवाहात अडथळा निर्माण झाला आहे. तसेच द्रोणागिरी नोडच्या निर्मितीसाठी जमीनीच्या पातळ्या वाढवल्या गेल्या आहेत.यामुळेही अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचा गंभीर आरोप श्री एकवीरा आई प्रतिष्ठान व सागरशक्तीचे संचालक नंदकुमार पवार यांनी माहिती देताना केला आहे.

टॅग्स :uran-acउरण