शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राजकीय चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 00:46 IST

ग्रामीण सत्ता केंद्रावर वर्चस्वासाठी कसाेटी; राजकीय वातावरण तापले

रायगड : जिल्ह्यातील ८८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका १५ जानेवारीला हाेत आहेत. राज्यातील सत्तेमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आहे. मात्र जिल्ह्यातील निवडणुका एकत्र लढण्याबाबत अद्यापही चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच आहे. शेकापनेही अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे पुढील कालावधीत रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघणार असल्याचे बाेलले जाते.ग्रामीण भागातील सत्ता केंद्रावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी माेर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे निवडणुका हाेत असलेल्या गावागावांमध्ये पुढील काही दिवस राजकीय रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. जिल्ह्यामध्ये हाेऊ घातलेल्या ८८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक ग्रामपंचायती या दक्षिण रायगडमधील आहेत. दक्षिण रायगडमध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसची चांगली पकड आहे. त्यानंतर शिवसेनेचा नंबर लागताे. काँग्रेस सत्तेत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवीन उमेद जागी झाली आहे. आघाडीमध्ये लढल्यास त्यांना किती जागा मिळतील हे पाहणे गरजेचे आहे. आघाडीमार्फत निवडणुका लढण्याबाबत अद्यापही चर्चा सुरू आहे. शेकापची या निवडणुकीमध्ये काय भूमिका घ्यायची याबाबत ठरलेले नसल्याने अनिश्चिततेचे ढग कायम आहेत.स्थानिक संस्थांमध्ये शेकापचा दबदबास्थानिक संस्था माेठ्या संख्येने शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात आहेत. जिल्हा परिषदेमध्येही सर्वाधिक संख्याबळ शेतकरी कामगार पक्षाकडेच आहे. मात्र हाेणाऱ्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक ग्रामपंचायती या दक्षिण रायगडमधील असल्याने त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे हे काेणीही अमान्य करू शकणार नाही.किती जागा मिळणार  अद्यापही गुलदस्त्यातच मुळात काेणत्या राजकीय पक्षांना काेणकाेणत्या ग्रामपंचायतीमध्ये किती जागा मिळणार हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे. राज्यामध्ये एकत्र असले तरी स्थानिक पातळीवरील समीकरणे वेगळी असतात. परंतु एकत्र लढल्यास जिल्ह्यातील मतदारांपर्यंत चांगला संदेश जाऊ शकताे, अशीही चर्चा आहे.तिन्ही पक्ष एकत्र लढणार का?राज्यातील सत्तेमध्ये असणारे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी अद्यापही आपापली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे अंतिम क्षणी याबाबत निर्णय हाेणार असल्याचे बाेलले जाते. राजकीय नेत्यांनी भूमिका स्पष्ट केलेली नसल्याने सर्वसामान्य कार्यकर्ते चाचपडत असल्याचे चित्र आहे. लढल्यास काय परिणाम?ग्रामपंचायतीमध्ये आघाडी करण्याबाबत तिन्ही पक्षीय पातळीवर चर्चा सुरू आहे. मात्र एकत्र लढण्याबाबत अद्यापही एकमत झालेले नाही.  त्याबाबत काेणत्याही पक्षाच्या प्रमुखांनी जाहीर केलेले नाही. स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे वेगवेगळी असतात. ती तपासूनच निर्णय घेण्याबाबत वरिष्ठ स्तरावर बैठका हाेत आहेत.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस