शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राजकीय चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 00:46 IST

ग्रामीण सत्ता केंद्रावर वर्चस्वासाठी कसाेटी; राजकीय वातावरण तापले

रायगड : जिल्ह्यातील ८८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका १५ जानेवारीला हाेत आहेत. राज्यातील सत्तेमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आहे. मात्र जिल्ह्यातील निवडणुका एकत्र लढण्याबाबत अद्यापही चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच आहे. शेकापनेही अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे पुढील कालावधीत रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघणार असल्याचे बाेलले जाते.ग्रामीण भागातील सत्ता केंद्रावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी माेर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे निवडणुका हाेत असलेल्या गावागावांमध्ये पुढील काही दिवस राजकीय रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. जिल्ह्यामध्ये हाेऊ घातलेल्या ८८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक ग्रामपंचायती या दक्षिण रायगडमधील आहेत. दक्षिण रायगडमध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसची चांगली पकड आहे. त्यानंतर शिवसेनेचा नंबर लागताे. काँग्रेस सत्तेत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवीन उमेद जागी झाली आहे. आघाडीमध्ये लढल्यास त्यांना किती जागा मिळतील हे पाहणे गरजेचे आहे. आघाडीमार्फत निवडणुका लढण्याबाबत अद्यापही चर्चा सुरू आहे. शेकापची या निवडणुकीमध्ये काय भूमिका घ्यायची याबाबत ठरलेले नसल्याने अनिश्चिततेचे ढग कायम आहेत.स्थानिक संस्थांमध्ये शेकापचा दबदबास्थानिक संस्था माेठ्या संख्येने शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात आहेत. जिल्हा परिषदेमध्येही सर्वाधिक संख्याबळ शेतकरी कामगार पक्षाकडेच आहे. मात्र हाेणाऱ्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक ग्रामपंचायती या दक्षिण रायगडमधील असल्याने त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे हे काेणीही अमान्य करू शकणार नाही.किती जागा मिळणार  अद्यापही गुलदस्त्यातच मुळात काेणत्या राजकीय पक्षांना काेणकाेणत्या ग्रामपंचायतीमध्ये किती जागा मिळणार हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे. राज्यामध्ये एकत्र असले तरी स्थानिक पातळीवरील समीकरणे वेगळी असतात. परंतु एकत्र लढल्यास जिल्ह्यातील मतदारांपर्यंत चांगला संदेश जाऊ शकताे, अशीही चर्चा आहे.तिन्ही पक्ष एकत्र लढणार का?राज्यातील सत्तेमध्ये असणारे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी अद्यापही आपापली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे अंतिम क्षणी याबाबत निर्णय हाेणार असल्याचे बाेलले जाते. राजकीय नेत्यांनी भूमिका स्पष्ट केलेली नसल्याने सर्वसामान्य कार्यकर्ते चाचपडत असल्याचे चित्र आहे. लढल्यास काय परिणाम?ग्रामपंचायतीमध्ये आघाडी करण्याबाबत तिन्ही पक्षीय पातळीवर चर्चा सुरू आहे. मात्र एकत्र लढण्याबाबत अद्यापही एकमत झालेले नाही.  त्याबाबत काेणत्याही पक्षाच्या प्रमुखांनी जाहीर केलेले नाही. स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे वेगवेगळी असतात. ती तपासूनच निर्णय घेण्याबाबत वरिष्ठ स्तरावर बैठका हाेत आहेत.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस