शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

प्लॅस्टिकबंदी मोहिमेत पेण तालुक्यात ९६ हजारांचा दंड केला वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 02:36 IST

दररोजच्या कचऱ्यामध्ये प्लॅस्टिकचे प्रमाण हे मोठ्या संख्येने होते. मात्र प्लॅस्टिकबंदी लागू केल्यापासून तेच प्रमाण ३० टक्क्यांनी कमी झाले आहे.

- आविष्कार देसाई अलिबाग : दररोजच्या कचऱ्यामध्ये प्लॅस्टिकचे प्रमाण हे मोठ्या संख्येने होते. मात्र प्लॅस्टिकबंदी लागू केल्यापासून तेच प्रमाण ३० टक्क्यांनी कमी झाले आहे. राज्य सरकारने केलेल्या प्लॅस्टिकबंदीचे सकारात्मक परिणाम रायगड जिल्ह्यात दिसून येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत प्लॅस्टिकविरोधी कारवाई करताना तब्बल दोन टन ७८७ किलो प्लॅस्टिक जमा करून एक लाख ६१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात प्रशासनाला यश आले आहे. पैकी पेण तालुक्यामध्ये सर्वाधिक ९६ हजार दंड वसूल करण्यात आला आहे. सरकार प्रशासन आणि नागरिक यांनी एकमेकांशी सांगड घातल्याने राष्ट्र हिताचे चांगले कार्य घडू शकते हेच त्या निमित्ताने अधोरेखित होते.जनजागृतीवर दिला जातोय भरनागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी माहिती पत्रके वाटली जात आहेत. काही ठिकाणी होर्डिंग्ज, बॅनरही लावण्यात आले आहेत.काही तालुक्यांमध्ये पर्यावरण रक्षणासाठी प्लॅस्टिकबंदी किती महत्त्वाची आहे हे सांगण्यासाठी जनजागृतीपर रॅली काढण्यात आल्या आहेत. काही नगर पालिका हद्दीमध्ये प्लॅस्टिकला पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचे वाटपही करण्यात आले आहे. फळ-भाजी-मच्छी विक्रेते यांची बैठक घेऊन त्यांना प्लॅस्टिक पिशव्या न वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात कर्जत इतर तालुक्यांच्या तुलनेमध्ये उजवी ठरणार आहे. येथे प्लॅस्टिकपासून रस्ते तयार करण्याचा प्रस्ताव मुख्याधिकारी यांनी तयार केला आहे. डांबरामध्ये काही प्रमाणात प्लॅस्टिक मिसळून अशा प्रकारचे रस्ते तयार केलेले जातात. हेच यातून स्पष्ट होणार आहे.अशाच प्रकारचे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी ज्या नगर पालिका, नगर पंचायती, महानगर पालिका पुढाकार घेणार आहेत त्यांना पालकमंत्र्यांच्या निधीतून म्हणजेच जिल्हा नियोजन समितीमार्फत ठरावीक निधी उपलब्ध करून देण्याची तयारी सरकारने दाखवली आहे. नावीन्यपूर्ण उपक्रम राबवताना निधीची कमतरता भासू नये यासाठी संबंधित विभागातील कंपन्यांच्या सीएसआर फंडातून अशी कामे करण्याच्या सूचनाही सरकारने दिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विविध कंपन्यांना आणखीन एका सरकारी योजनेसाठी आपला सीएसआर खर्च करावा लागणार आहे.>जिल्ह्यामध्ये प्लॅस्टिकबंदीची संकल्पना चांगल्या पध्दतीने रुजू पाहत आहे. रोजच्या कचºयामध्ये प्लॅस्टिकचे प्रमाण हे ३० टक्क्यांनी कमी झाले आहे. याच पध्दतीने मोहीम सुरु राहिल्यास आणि नागरिकांनी सहकार्य केल्यास लवकरच जिल्ह्यातून प्लॅस्टिकला हद्दपार करण्यात यश येईल.-महेश चौधरी, नगर पालिका प्रशासन

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी