शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
3
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
4
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
5
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
6
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
7
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
8
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
9
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
10
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
11
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
12
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
13
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
14
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
15
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
16
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
17
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
18
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
19
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
20
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार

प्लॅस्टिकबंदी मोहिमेत पेण तालुक्यात ९६ हजारांचा दंड केला वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 02:36 IST

दररोजच्या कचऱ्यामध्ये प्लॅस्टिकचे प्रमाण हे मोठ्या संख्येने होते. मात्र प्लॅस्टिकबंदी लागू केल्यापासून तेच प्रमाण ३० टक्क्यांनी कमी झाले आहे.

- आविष्कार देसाई अलिबाग : दररोजच्या कचऱ्यामध्ये प्लॅस्टिकचे प्रमाण हे मोठ्या संख्येने होते. मात्र प्लॅस्टिकबंदी लागू केल्यापासून तेच प्रमाण ३० टक्क्यांनी कमी झाले आहे. राज्य सरकारने केलेल्या प्लॅस्टिकबंदीचे सकारात्मक परिणाम रायगड जिल्ह्यात दिसून येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत प्लॅस्टिकविरोधी कारवाई करताना तब्बल दोन टन ७८७ किलो प्लॅस्टिक जमा करून एक लाख ६१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात प्रशासनाला यश आले आहे. पैकी पेण तालुक्यामध्ये सर्वाधिक ९६ हजार दंड वसूल करण्यात आला आहे. सरकार प्रशासन आणि नागरिक यांनी एकमेकांशी सांगड घातल्याने राष्ट्र हिताचे चांगले कार्य घडू शकते हेच त्या निमित्ताने अधोरेखित होते.जनजागृतीवर दिला जातोय भरनागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी माहिती पत्रके वाटली जात आहेत. काही ठिकाणी होर्डिंग्ज, बॅनरही लावण्यात आले आहेत.काही तालुक्यांमध्ये पर्यावरण रक्षणासाठी प्लॅस्टिकबंदी किती महत्त्वाची आहे हे सांगण्यासाठी जनजागृतीपर रॅली काढण्यात आल्या आहेत. काही नगर पालिका हद्दीमध्ये प्लॅस्टिकला पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचे वाटपही करण्यात आले आहे. फळ-भाजी-मच्छी विक्रेते यांची बैठक घेऊन त्यांना प्लॅस्टिक पिशव्या न वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात कर्जत इतर तालुक्यांच्या तुलनेमध्ये उजवी ठरणार आहे. येथे प्लॅस्टिकपासून रस्ते तयार करण्याचा प्रस्ताव मुख्याधिकारी यांनी तयार केला आहे. डांबरामध्ये काही प्रमाणात प्लॅस्टिक मिसळून अशा प्रकारचे रस्ते तयार केलेले जातात. हेच यातून स्पष्ट होणार आहे.अशाच प्रकारचे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी ज्या नगर पालिका, नगर पंचायती, महानगर पालिका पुढाकार घेणार आहेत त्यांना पालकमंत्र्यांच्या निधीतून म्हणजेच जिल्हा नियोजन समितीमार्फत ठरावीक निधी उपलब्ध करून देण्याची तयारी सरकारने दाखवली आहे. नावीन्यपूर्ण उपक्रम राबवताना निधीची कमतरता भासू नये यासाठी संबंधित विभागातील कंपन्यांच्या सीएसआर फंडातून अशी कामे करण्याच्या सूचनाही सरकारने दिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विविध कंपन्यांना आणखीन एका सरकारी योजनेसाठी आपला सीएसआर खर्च करावा लागणार आहे.>जिल्ह्यामध्ये प्लॅस्टिकबंदीची संकल्पना चांगल्या पध्दतीने रुजू पाहत आहे. रोजच्या कचºयामध्ये प्लॅस्टिकचे प्रमाण हे ३० टक्क्यांनी कमी झाले आहे. याच पध्दतीने मोहीम सुरु राहिल्यास आणि नागरिकांनी सहकार्य केल्यास लवकरच जिल्ह्यातून प्लॅस्टिकला हद्दपार करण्यात यश येईल.-महेश चौधरी, नगर पालिका प्रशासन

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी