शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

भातशेतीच्या कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 02:54 IST

खांब कोलाड विभागातील उन्हाळी शेती ही डोलवहाळ येथील धरणाच्या पाण्यावर केली जाते.

रोहा : मे महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात तालुक्यातील खांब कोलाड विभागात भातशेतीच्या कामाला सुरुवात झाली आहे. शेतकरी चांगले पीक येण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहे. खांब कोलाड विभागातील उन्हाळी शेती ही डोलवहाळ येथील धरणाच्या पाण्यावर केली जाते.उन्हाळ्यात या भागातील नडवली, खांब, वैजनाथ, पुंगाव, मुठवली, शिरवली, पुई, गोवे, कोलाड, महादेववाडी, चिंचवली, तिसे आणि तळवली या गावांतील शेतकºयांना धरणाचे मुबलक पाणी मिळत असल्याने उन्हाळी शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते.खांब कोलाड विभागातील शेतकºयांनी या वर्षीही लवकर तयार होणाºया बी-बियाण्यांची लावणी केली आहे. लवकर तयार होणाºया भातशेतीमध्ये रत्ना, कोलम, कलिंगड, रूपाली या बियाणांचा समावेश होतो. तर उशिरा येणाºया भाताच्या जातीमध्ये जया, आयराट या बियाण्यांचा समावेश आहे. रोह्यातील पोहा हा संपूर्ण भारत देशात प्रसिद्ध मानला जातो. पोहा बनविण्यासाठी जया, आयराट या जातीचा जास्त वापर होत असतो.गेली सहा वर्षे कालव्याला पाणी येत नसल्याने रोहा तालुक्यातील ३० टक्के शेती ही कालव्याच्या पाण्यावर केली जात आहे. त्यामुळे उत्पादन कमी असल्याने या वर्षी तरी भाताला क्विंटलमागे २००० इतका हमीभाव मिळेल, या आशेवर शेतकरी आहेत. यावर्षी २००० ते २२०० इतका भाव मिळेल, अशी अपेक्षा येथील शेतकरी व्यक्त करीत आहे. याचप्रमाणे यंदा शेतकºयांना चांगला हमीभाव द्यावा, अशी मागणी येथील स्थानिक शेतकरी संघटनांकडून होत असून दुबार पीक शेतकºयांसाठी वरदान ठरत आहे.माणगाव तालुक्यामध्ये भातकापणीला वेगलोकमत न्यूज नेटवर्कमाणगाव : माणगाव तालुक्यामध्ये दुबार भातशेती कापणीला वेग आल्याने शेतकºयांची लगबग सुरू झाली आहे. माणगाव तालुक्यात कालव्यातून मिळणाºया पाण्यामुळे शेतकरी दुबार भातशेती करू लागले आहेत. तालुक्यातील अनेक गावांत कालवे तयार करण्यात आल्याने शेतीला त्याचा फायदा होत आहे. माणगावमध्ये एकूण ३३०० हेक्टर क्षेत्रावर भात पीक घेण्यात आले आहे. यात जया, रत्ना, सुवर्णा, कर्जत-५, इ. वाणांची लागवड उन्हाळी हंगामामध्ये करण्यात आली आहे. साधारणत: ही लागवड जानेवारी महिन्यात केली जात असून, सध्या भातशेती कापणी वेगाने चालू आहे. आठ दिवसांत कापणी पूर्ण होईल. उन्हाळी भात पिकाचे ४५ क्विंटल प्रतिहेक्टरी उत्पादन येते, या हंगामातील भातशेतीवर कमी प्रमाणामधे कीड व रोगाचा प्रार्दुभाव आढळून येतो. उन्हाळी भात उत्पादनवाढीसाठी कृषी विभागाकडून विविध प्रशिक्षण, अभ्यासदौरे व चर्चासत्रांचे नियोजन केले होते. माणगाव तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी पी. बी. नवले यांनी दुबार पीक घेणाºया शेतकºयांना वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी