शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

भातशेतीच्या कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 02:54 IST

खांब कोलाड विभागातील उन्हाळी शेती ही डोलवहाळ येथील धरणाच्या पाण्यावर केली जाते.

रोहा : मे महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात तालुक्यातील खांब कोलाड विभागात भातशेतीच्या कामाला सुरुवात झाली आहे. शेतकरी चांगले पीक येण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहे. खांब कोलाड विभागातील उन्हाळी शेती ही डोलवहाळ येथील धरणाच्या पाण्यावर केली जाते.उन्हाळ्यात या भागातील नडवली, खांब, वैजनाथ, पुंगाव, मुठवली, शिरवली, पुई, गोवे, कोलाड, महादेववाडी, चिंचवली, तिसे आणि तळवली या गावांतील शेतकºयांना धरणाचे मुबलक पाणी मिळत असल्याने उन्हाळी शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते.खांब कोलाड विभागातील शेतकºयांनी या वर्षीही लवकर तयार होणाºया बी-बियाण्यांची लावणी केली आहे. लवकर तयार होणाºया भातशेतीमध्ये रत्ना, कोलम, कलिंगड, रूपाली या बियाणांचा समावेश होतो. तर उशिरा येणाºया भाताच्या जातीमध्ये जया, आयराट या बियाण्यांचा समावेश आहे. रोह्यातील पोहा हा संपूर्ण भारत देशात प्रसिद्ध मानला जातो. पोहा बनविण्यासाठी जया, आयराट या जातीचा जास्त वापर होत असतो.गेली सहा वर्षे कालव्याला पाणी येत नसल्याने रोहा तालुक्यातील ३० टक्के शेती ही कालव्याच्या पाण्यावर केली जात आहे. त्यामुळे उत्पादन कमी असल्याने या वर्षी तरी भाताला क्विंटलमागे २००० इतका हमीभाव मिळेल, या आशेवर शेतकरी आहेत. यावर्षी २००० ते २२०० इतका भाव मिळेल, अशी अपेक्षा येथील शेतकरी व्यक्त करीत आहे. याचप्रमाणे यंदा शेतकºयांना चांगला हमीभाव द्यावा, अशी मागणी येथील स्थानिक शेतकरी संघटनांकडून होत असून दुबार पीक शेतकºयांसाठी वरदान ठरत आहे.माणगाव तालुक्यामध्ये भातकापणीला वेगलोकमत न्यूज नेटवर्कमाणगाव : माणगाव तालुक्यामध्ये दुबार भातशेती कापणीला वेग आल्याने शेतकºयांची लगबग सुरू झाली आहे. माणगाव तालुक्यात कालव्यातून मिळणाºया पाण्यामुळे शेतकरी दुबार भातशेती करू लागले आहेत. तालुक्यातील अनेक गावांत कालवे तयार करण्यात आल्याने शेतीला त्याचा फायदा होत आहे. माणगावमध्ये एकूण ३३०० हेक्टर क्षेत्रावर भात पीक घेण्यात आले आहे. यात जया, रत्ना, सुवर्णा, कर्जत-५, इ. वाणांची लागवड उन्हाळी हंगामामध्ये करण्यात आली आहे. साधारणत: ही लागवड जानेवारी महिन्यात केली जात असून, सध्या भातशेती कापणी वेगाने चालू आहे. आठ दिवसांत कापणी पूर्ण होईल. उन्हाळी भात पिकाचे ४५ क्विंटल प्रतिहेक्टरी उत्पादन येते, या हंगामातील भातशेतीवर कमी प्रमाणामधे कीड व रोगाचा प्रार्दुभाव आढळून येतो. उन्हाळी भात उत्पादनवाढीसाठी कृषी विभागाकडून विविध प्रशिक्षण, अभ्यासदौरे व चर्चासत्रांचे नियोजन केले होते. माणगाव तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी पी. बी. नवले यांनी दुबार पीक घेणाºया शेतकºयांना वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी