शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

भातशेतीच्या कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 02:54 IST

खांब कोलाड विभागातील उन्हाळी शेती ही डोलवहाळ येथील धरणाच्या पाण्यावर केली जाते.

रोहा : मे महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात तालुक्यातील खांब कोलाड विभागात भातशेतीच्या कामाला सुरुवात झाली आहे. शेतकरी चांगले पीक येण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहे. खांब कोलाड विभागातील उन्हाळी शेती ही डोलवहाळ येथील धरणाच्या पाण्यावर केली जाते.उन्हाळ्यात या भागातील नडवली, खांब, वैजनाथ, पुंगाव, मुठवली, शिरवली, पुई, गोवे, कोलाड, महादेववाडी, चिंचवली, तिसे आणि तळवली या गावांतील शेतकºयांना धरणाचे मुबलक पाणी मिळत असल्याने उन्हाळी शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते.खांब कोलाड विभागातील शेतकºयांनी या वर्षीही लवकर तयार होणाºया बी-बियाण्यांची लावणी केली आहे. लवकर तयार होणाºया भातशेतीमध्ये रत्ना, कोलम, कलिंगड, रूपाली या बियाणांचा समावेश होतो. तर उशिरा येणाºया भाताच्या जातीमध्ये जया, आयराट या बियाण्यांचा समावेश आहे. रोह्यातील पोहा हा संपूर्ण भारत देशात प्रसिद्ध मानला जातो. पोहा बनविण्यासाठी जया, आयराट या जातीचा जास्त वापर होत असतो.गेली सहा वर्षे कालव्याला पाणी येत नसल्याने रोहा तालुक्यातील ३० टक्के शेती ही कालव्याच्या पाण्यावर केली जात आहे. त्यामुळे उत्पादन कमी असल्याने या वर्षी तरी भाताला क्विंटलमागे २००० इतका हमीभाव मिळेल, या आशेवर शेतकरी आहेत. यावर्षी २००० ते २२०० इतका भाव मिळेल, अशी अपेक्षा येथील शेतकरी व्यक्त करीत आहे. याचप्रमाणे यंदा शेतकºयांना चांगला हमीभाव द्यावा, अशी मागणी येथील स्थानिक शेतकरी संघटनांकडून होत असून दुबार पीक शेतकºयांसाठी वरदान ठरत आहे.माणगाव तालुक्यामध्ये भातकापणीला वेगलोकमत न्यूज नेटवर्कमाणगाव : माणगाव तालुक्यामध्ये दुबार भातशेती कापणीला वेग आल्याने शेतकºयांची लगबग सुरू झाली आहे. माणगाव तालुक्यात कालव्यातून मिळणाºया पाण्यामुळे शेतकरी दुबार भातशेती करू लागले आहेत. तालुक्यातील अनेक गावांत कालवे तयार करण्यात आल्याने शेतीला त्याचा फायदा होत आहे. माणगावमध्ये एकूण ३३०० हेक्टर क्षेत्रावर भात पीक घेण्यात आले आहे. यात जया, रत्ना, सुवर्णा, कर्जत-५, इ. वाणांची लागवड उन्हाळी हंगामामध्ये करण्यात आली आहे. साधारणत: ही लागवड जानेवारी महिन्यात केली जात असून, सध्या भातशेती कापणी वेगाने चालू आहे. आठ दिवसांत कापणी पूर्ण होईल. उन्हाळी भात पिकाचे ४५ क्विंटल प्रतिहेक्टरी उत्पादन येते, या हंगामातील भातशेतीवर कमी प्रमाणामधे कीड व रोगाचा प्रार्दुभाव आढळून येतो. उन्हाळी भात उत्पादनवाढीसाठी कृषी विभागाकडून विविध प्रशिक्षण, अभ्यासदौरे व चर्चासत्रांचे नियोजन केले होते. माणगाव तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी पी. बी. नवले यांनी दुबार पीक घेणाºया शेतकºयांना वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी