शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
3
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
4
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
5
Technology: SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
6
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
7
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
8
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
9
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
10
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
11
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
12
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
13
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
14
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
15
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
16
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
17
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
18
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
19
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
20
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन

एसटीच्या इतिहासातील ‘ती काळरात्र’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 23:58 IST

माझी एसटी, मी एसटीचा

रत्नपाल जाधव

ऑगस्ट २०१६ ची अमावस्येची ती भयाण पावसाळी रात्र. एसटीच्या इतिहासातील काळरात्र होती. त्या दिवशी संपूर्ण कोकणपट्ट्यासह महाबळेश्वर व सातारा परिसरांत पावसाने अगदी थैमान घातले होते. पोलादपूर व महाडमध्ये असलेल्या सावित्री नदीने उग्ररूप धारण केले होते. सावित्रीच्या पुराच्या पाण्याला जणू काही उधाण आले होते. सावित्री नदीचा रुद्रावतार इतका भयंकर होता की, तिच्या लाटांच्या माऱ्यापुढे १०० वर्षे जुना असलेला पूल रात्री ११.३० च्या सुमारास ढासळला. नुसता ढासळलाच नाही तर सावित्री नदीच्या पोटात त्या काळ्याकुट्ट अशा मिट्ट अंधारात एसटी महामंडळाच्या दोन व तीन छोट्या वाहनांना व त्यातील एकूण जवळपास ४० निष्पाप लोकांचा बळी घेतला. आजच्या दिवशी या दुर्दैवी घटनेला तीन वर्षे झाली आहेत. शासनाने ढासळलेल्या पुलाच्या जागी केवळ १६५ या विक्रमी दिवसांत नवीन पूल जरी उभारला असला, तरी त्याने आमचे गेलेले एसटी कर्मचारी व एसटीतून प्रवास करणारे १८ प्रवासी, तर परत येणार नाहीत ना? या निष्पाप जीवांनीच नाही तर त्यांच्या स्वप्नांनीही सावित्रीच्या गर्भात कायमची जलसमाधी घेतली.

चिपळूण बसस्थानकात बहुतांश मुंबईच्या दिशेने जाणाºया चालक-वाहकांची ड्युटी बदलत असते. त्याप्रमाणे साधारणपणे रात्री ९.३० च्या सुमारास जयगड-मुंबई ही गाडी तसेच राजापूर-बोरिवली ही गाडी, या गाड्यांनी चिपळूण सोडलं व मुंबईच्या दिशेने नेहमीप्रमाणे निघाल्या. पण, नियतीच्या मनात मात्र भलतंच होतं. दोन्ही गाड्यांत चालक-वाहक धरून एकूण २२ प्रवासी होते. पाऊस तर आभाळ फाटल्यागत धोधो कोसळत होता. पावसाच्या त्रासामुळे खिडक्यांच्या काचा प्रवाशांनी बंद केलेल्या होत्या. पोलादपूर सुटलं. रस्त्यावर खूप पाऊस असल्याने वाहने तशी मंदगतीनेच पुढे सरकत होती. वाहनांची गर्दीही पावसामुळे तुरळक होती. सावित्री नदीच्या लाटा पुलाला हादरे देत होत्या. एसटीच्या या दोन गाड्या व एक चारचाकी गाडी पुलाच्या काही अंतरावर मध्यभागी आल्यावर पूल ढासळला व क्षणार्धात दोनही एसटीच्या गाड्या व चारचाकी सावित्रीच्या प्रवाहात गायब झाल्या.पुलावर काहीतरी भयंकर घडतंय, हे जिथून पुलाची सुरुवात होते, तेथे असणाºया गॅरेजमध्ये काम करणाºया वसंत कुमार या मेकॅनिकच्या लक्षात आलं आणि भररस्त्यावर येऊन त्याने आपल्या मित्रांसह मागून येणाºया गाड्यांना वेळीच थांबवल्यामुळे अनर्थ टळला. वसंत कुमारने केलेल्या संपर्कामुळे सर्व आपत्कालीन व्यवस्था जागी झाली. वसंत कुमारच्या रूपाने जणू देवदूतच त्या दिवशी धावून आला, अन्यथा अजून बरेच जीव सावित्रीच्या पोटी गडप झाले असते. गुहागर-बोरिवली ही एसटीही त्याचदरम्यान या पुलाजवळ आली होती. पण, पुढे घडलेला प्रसंग पाहता वाहक डी.जी.जाधव व चालक एस.एम.केदार यांनी याही प्रसंगात प्रसंगावधान दाखवत मागून येणाºया सर्व वाहनांना थांबवलंच आणि इतरही मागोमाग येणाºया एसटीचालकांना फोन करून घटनेची माहिती दिली.

एसटीच्या गाड्या जेव्हा प्रवासाला निघतात, तेव्हा या एसटींची प्रत्येक बसस्थानकात पोहोचण्याची वेळ साधारण ठरलेली असते. तशी स्थानकप्रमुखाच्या नोंदवहीत चालकाकडून नोंद केली जाते. पोलादपूरहून निघताना या दोन्ही एसटीच्या वाहनांची नोंद चालकाकडून केली गेली होती, पण नियोजित वेळेत या दोन्ही गाड्या महाडला न आल्यामुळे व सावित्रीचा पूल ढासळल्याची बातमी पसरल्यामुळे निश्चितच या गाड्या सावित्री पात्रात वाहून गेल्या असाव्यात, याबाबतच्या शंकेला दुजोरा मिळाला. तब्बल १० तासांनंतर सर्च आॅपरेशन सुरू झालं. धोधो कोसळणारा पाऊस, सावित्रीच्या तुफान उसळणाºया लाटा, नदीच्या पात्रात असलेला मगरींचा वावर या प्रतिकूल परिस्थितीत एनडीआरएफ, नौदल, हेलिकॉप्टर्स, कोस्ट गार्डच्या जवानांनी रेस्क्यू आॅपरेशन सुरू केलं. अनेक प्रयत्न करून अखेर गाळात खोल अडकलेल्या दोनही एसटीच्या गाड्या व चारचाकी गाडी शोधण्यात यश आलं.गेले काही दिवस कोकण व मुंबईत तुफान पाऊस पडतोय आणि त्यात सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली, अशी बातमी ऐकायला मिळाली की, या दुर्घटनेची आठवण ताजी होते.२ आॅगस्ट २०१६ ची भयाण अमावस्येची रात्र एसटी कर्मचाऱ्यांसाठी न विसरता येणारी. त्या रात्री सावित्री नदीच्या लाटांच्या रुद्रावताने १०० वर्षे जुन्या पुलाला आपल्या पोटात सामावून घेतले आणि या दुर्घटनेत एसटी महामंडळाच्या दोन बसेससह तीन छोट्या वाहनांना आणि त्यातील सुमारे ४० निष्पाप जीवांना जलसमाधी मिळाली. सुमारे १०-१२ दिवस इथे रेस्क्यू आॅपरेशन चाललं. त्यानंतर ढासळलेल्या पुलाच्या जागी केवळ १६५ या विक्रमी दिवसांत शासनाने नवीन पूल उभारला. पण, आजही सावित्रीने धोक्याची पातळी ओलांडली म्हटलं की, अनेकांना या दुर्घटनेची आठवण होते. जयगड-मुंबई गाडीचे चालक श्रीकांत कांबळे व त्यांचा मुलगा महेंद्र मात्र खूप दुर्दैवी ठरले. खरेतर, कांबळे मुंबई रूट कधीच करत नव्हते. केवळ मुंबईला मुलगा महेंद्रचे इंजिनीअरिंगचे अ‍ॅडमिशन दुसºया दिवशी माटुंगा येथे करायचे होते, म्हणून आगार व्यवस्थापकांना विनंती करून कांबळेंनी या रूटवर ड्युटी मागून घेतली होती. पण, सावित्री नदीने या दोघा पितापुत्राच्या स्वप्नांनाही वाहून नेलं होतं. चालक कांबळे २०१८ ला एसटी सेवेतून सेवानिवृत्त होणार होते. 

टॅग्स :riverनदीRainपाऊसRaigadरायगड