शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

एसटीच्या इतिहासातील ‘ती काळरात्र’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 23:58 IST

माझी एसटी, मी एसटीचा

रत्नपाल जाधव

ऑगस्ट २०१६ ची अमावस्येची ती भयाण पावसाळी रात्र. एसटीच्या इतिहासातील काळरात्र होती. त्या दिवशी संपूर्ण कोकणपट्ट्यासह महाबळेश्वर व सातारा परिसरांत पावसाने अगदी थैमान घातले होते. पोलादपूर व महाडमध्ये असलेल्या सावित्री नदीने उग्ररूप धारण केले होते. सावित्रीच्या पुराच्या पाण्याला जणू काही उधाण आले होते. सावित्री नदीचा रुद्रावतार इतका भयंकर होता की, तिच्या लाटांच्या माऱ्यापुढे १०० वर्षे जुना असलेला पूल रात्री ११.३० च्या सुमारास ढासळला. नुसता ढासळलाच नाही तर सावित्री नदीच्या पोटात त्या काळ्याकुट्ट अशा मिट्ट अंधारात एसटी महामंडळाच्या दोन व तीन छोट्या वाहनांना व त्यातील एकूण जवळपास ४० निष्पाप लोकांचा बळी घेतला. आजच्या दिवशी या दुर्दैवी घटनेला तीन वर्षे झाली आहेत. शासनाने ढासळलेल्या पुलाच्या जागी केवळ १६५ या विक्रमी दिवसांत नवीन पूल जरी उभारला असला, तरी त्याने आमचे गेलेले एसटी कर्मचारी व एसटीतून प्रवास करणारे १८ प्रवासी, तर परत येणार नाहीत ना? या निष्पाप जीवांनीच नाही तर त्यांच्या स्वप्नांनीही सावित्रीच्या गर्भात कायमची जलसमाधी घेतली.

चिपळूण बसस्थानकात बहुतांश मुंबईच्या दिशेने जाणाºया चालक-वाहकांची ड्युटी बदलत असते. त्याप्रमाणे साधारणपणे रात्री ९.३० च्या सुमारास जयगड-मुंबई ही गाडी तसेच राजापूर-बोरिवली ही गाडी, या गाड्यांनी चिपळूण सोडलं व मुंबईच्या दिशेने नेहमीप्रमाणे निघाल्या. पण, नियतीच्या मनात मात्र भलतंच होतं. दोन्ही गाड्यांत चालक-वाहक धरून एकूण २२ प्रवासी होते. पाऊस तर आभाळ फाटल्यागत धोधो कोसळत होता. पावसाच्या त्रासामुळे खिडक्यांच्या काचा प्रवाशांनी बंद केलेल्या होत्या. पोलादपूर सुटलं. रस्त्यावर खूप पाऊस असल्याने वाहने तशी मंदगतीनेच पुढे सरकत होती. वाहनांची गर्दीही पावसामुळे तुरळक होती. सावित्री नदीच्या लाटा पुलाला हादरे देत होत्या. एसटीच्या या दोन गाड्या व एक चारचाकी गाडी पुलाच्या काही अंतरावर मध्यभागी आल्यावर पूल ढासळला व क्षणार्धात दोनही एसटीच्या गाड्या व चारचाकी सावित्रीच्या प्रवाहात गायब झाल्या.पुलावर काहीतरी भयंकर घडतंय, हे जिथून पुलाची सुरुवात होते, तेथे असणाºया गॅरेजमध्ये काम करणाºया वसंत कुमार या मेकॅनिकच्या लक्षात आलं आणि भररस्त्यावर येऊन त्याने आपल्या मित्रांसह मागून येणाºया गाड्यांना वेळीच थांबवल्यामुळे अनर्थ टळला. वसंत कुमारने केलेल्या संपर्कामुळे सर्व आपत्कालीन व्यवस्था जागी झाली. वसंत कुमारच्या रूपाने जणू देवदूतच त्या दिवशी धावून आला, अन्यथा अजून बरेच जीव सावित्रीच्या पोटी गडप झाले असते. गुहागर-बोरिवली ही एसटीही त्याचदरम्यान या पुलाजवळ आली होती. पण, पुढे घडलेला प्रसंग पाहता वाहक डी.जी.जाधव व चालक एस.एम.केदार यांनी याही प्रसंगात प्रसंगावधान दाखवत मागून येणाºया सर्व वाहनांना थांबवलंच आणि इतरही मागोमाग येणाºया एसटीचालकांना फोन करून घटनेची माहिती दिली.

एसटीच्या गाड्या जेव्हा प्रवासाला निघतात, तेव्हा या एसटींची प्रत्येक बसस्थानकात पोहोचण्याची वेळ साधारण ठरलेली असते. तशी स्थानकप्रमुखाच्या नोंदवहीत चालकाकडून नोंद केली जाते. पोलादपूरहून निघताना या दोन्ही एसटीच्या वाहनांची नोंद चालकाकडून केली गेली होती, पण नियोजित वेळेत या दोन्ही गाड्या महाडला न आल्यामुळे व सावित्रीचा पूल ढासळल्याची बातमी पसरल्यामुळे निश्चितच या गाड्या सावित्री पात्रात वाहून गेल्या असाव्यात, याबाबतच्या शंकेला दुजोरा मिळाला. तब्बल १० तासांनंतर सर्च आॅपरेशन सुरू झालं. धोधो कोसळणारा पाऊस, सावित्रीच्या तुफान उसळणाºया लाटा, नदीच्या पात्रात असलेला मगरींचा वावर या प्रतिकूल परिस्थितीत एनडीआरएफ, नौदल, हेलिकॉप्टर्स, कोस्ट गार्डच्या जवानांनी रेस्क्यू आॅपरेशन सुरू केलं. अनेक प्रयत्न करून अखेर गाळात खोल अडकलेल्या दोनही एसटीच्या गाड्या व चारचाकी गाडी शोधण्यात यश आलं.गेले काही दिवस कोकण व मुंबईत तुफान पाऊस पडतोय आणि त्यात सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली, अशी बातमी ऐकायला मिळाली की, या दुर्घटनेची आठवण ताजी होते.२ आॅगस्ट २०१६ ची भयाण अमावस्येची रात्र एसटी कर्मचाऱ्यांसाठी न विसरता येणारी. त्या रात्री सावित्री नदीच्या लाटांच्या रुद्रावताने १०० वर्षे जुन्या पुलाला आपल्या पोटात सामावून घेतले आणि या दुर्घटनेत एसटी महामंडळाच्या दोन बसेससह तीन छोट्या वाहनांना आणि त्यातील सुमारे ४० निष्पाप जीवांना जलसमाधी मिळाली. सुमारे १०-१२ दिवस इथे रेस्क्यू आॅपरेशन चाललं. त्यानंतर ढासळलेल्या पुलाच्या जागी केवळ १६५ या विक्रमी दिवसांत शासनाने नवीन पूल उभारला. पण, आजही सावित्रीने धोक्याची पातळी ओलांडली म्हटलं की, अनेकांना या दुर्घटनेची आठवण होते. जयगड-मुंबई गाडीचे चालक श्रीकांत कांबळे व त्यांचा मुलगा महेंद्र मात्र खूप दुर्दैवी ठरले. खरेतर, कांबळे मुंबई रूट कधीच करत नव्हते. केवळ मुंबईला मुलगा महेंद्रचे इंजिनीअरिंगचे अ‍ॅडमिशन दुसºया दिवशी माटुंगा येथे करायचे होते, म्हणून आगार व्यवस्थापकांना विनंती करून कांबळेंनी या रूटवर ड्युटी मागून घेतली होती. पण, सावित्री नदीने या दोघा पितापुत्राच्या स्वप्नांनाही वाहून नेलं होतं. चालक कांबळे २०१८ ला एसटी सेवेतून सेवानिवृत्त होणार होते. 

टॅग्स :riverनदीRainपाऊसRaigadरायगड