शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या इतिहासातील ‘ती काळरात्र’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 23:58 IST

माझी एसटी, मी एसटीचा

रत्नपाल जाधव

ऑगस्ट २०१६ ची अमावस्येची ती भयाण पावसाळी रात्र. एसटीच्या इतिहासातील काळरात्र होती. त्या दिवशी संपूर्ण कोकणपट्ट्यासह महाबळेश्वर व सातारा परिसरांत पावसाने अगदी थैमान घातले होते. पोलादपूर व महाडमध्ये असलेल्या सावित्री नदीने उग्ररूप धारण केले होते. सावित्रीच्या पुराच्या पाण्याला जणू काही उधाण आले होते. सावित्री नदीचा रुद्रावतार इतका भयंकर होता की, तिच्या लाटांच्या माऱ्यापुढे १०० वर्षे जुना असलेला पूल रात्री ११.३० च्या सुमारास ढासळला. नुसता ढासळलाच नाही तर सावित्री नदीच्या पोटात त्या काळ्याकुट्ट अशा मिट्ट अंधारात एसटी महामंडळाच्या दोन व तीन छोट्या वाहनांना व त्यातील एकूण जवळपास ४० निष्पाप लोकांचा बळी घेतला. आजच्या दिवशी या दुर्दैवी घटनेला तीन वर्षे झाली आहेत. शासनाने ढासळलेल्या पुलाच्या जागी केवळ १६५ या विक्रमी दिवसांत नवीन पूल जरी उभारला असला, तरी त्याने आमचे गेलेले एसटी कर्मचारी व एसटीतून प्रवास करणारे १८ प्रवासी, तर परत येणार नाहीत ना? या निष्पाप जीवांनीच नाही तर त्यांच्या स्वप्नांनीही सावित्रीच्या गर्भात कायमची जलसमाधी घेतली.

चिपळूण बसस्थानकात बहुतांश मुंबईच्या दिशेने जाणाºया चालक-वाहकांची ड्युटी बदलत असते. त्याप्रमाणे साधारणपणे रात्री ९.३० च्या सुमारास जयगड-मुंबई ही गाडी तसेच राजापूर-बोरिवली ही गाडी, या गाड्यांनी चिपळूण सोडलं व मुंबईच्या दिशेने नेहमीप्रमाणे निघाल्या. पण, नियतीच्या मनात मात्र भलतंच होतं. दोन्ही गाड्यांत चालक-वाहक धरून एकूण २२ प्रवासी होते. पाऊस तर आभाळ फाटल्यागत धोधो कोसळत होता. पावसाच्या त्रासामुळे खिडक्यांच्या काचा प्रवाशांनी बंद केलेल्या होत्या. पोलादपूर सुटलं. रस्त्यावर खूप पाऊस असल्याने वाहने तशी मंदगतीनेच पुढे सरकत होती. वाहनांची गर्दीही पावसामुळे तुरळक होती. सावित्री नदीच्या लाटा पुलाला हादरे देत होत्या. एसटीच्या या दोन गाड्या व एक चारचाकी गाडी पुलाच्या काही अंतरावर मध्यभागी आल्यावर पूल ढासळला व क्षणार्धात दोनही एसटीच्या गाड्या व चारचाकी सावित्रीच्या प्रवाहात गायब झाल्या.पुलावर काहीतरी भयंकर घडतंय, हे जिथून पुलाची सुरुवात होते, तेथे असणाºया गॅरेजमध्ये काम करणाºया वसंत कुमार या मेकॅनिकच्या लक्षात आलं आणि भररस्त्यावर येऊन त्याने आपल्या मित्रांसह मागून येणाºया गाड्यांना वेळीच थांबवल्यामुळे अनर्थ टळला. वसंत कुमारने केलेल्या संपर्कामुळे सर्व आपत्कालीन व्यवस्था जागी झाली. वसंत कुमारच्या रूपाने जणू देवदूतच त्या दिवशी धावून आला, अन्यथा अजून बरेच जीव सावित्रीच्या पोटी गडप झाले असते. गुहागर-बोरिवली ही एसटीही त्याचदरम्यान या पुलाजवळ आली होती. पण, पुढे घडलेला प्रसंग पाहता वाहक डी.जी.जाधव व चालक एस.एम.केदार यांनी याही प्रसंगात प्रसंगावधान दाखवत मागून येणाºया सर्व वाहनांना थांबवलंच आणि इतरही मागोमाग येणाºया एसटीचालकांना फोन करून घटनेची माहिती दिली.

एसटीच्या गाड्या जेव्हा प्रवासाला निघतात, तेव्हा या एसटींची प्रत्येक बसस्थानकात पोहोचण्याची वेळ साधारण ठरलेली असते. तशी स्थानकप्रमुखाच्या नोंदवहीत चालकाकडून नोंद केली जाते. पोलादपूरहून निघताना या दोन्ही एसटीच्या वाहनांची नोंद चालकाकडून केली गेली होती, पण नियोजित वेळेत या दोन्ही गाड्या महाडला न आल्यामुळे व सावित्रीचा पूल ढासळल्याची बातमी पसरल्यामुळे निश्चितच या गाड्या सावित्री पात्रात वाहून गेल्या असाव्यात, याबाबतच्या शंकेला दुजोरा मिळाला. तब्बल १० तासांनंतर सर्च आॅपरेशन सुरू झालं. धोधो कोसळणारा पाऊस, सावित्रीच्या तुफान उसळणाºया लाटा, नदीच्या पात्रात असलेला मगरींचा वावर या प्रतिकूल परिस्थितीत एनडीआरएफ, नौदल, हेलिकॉप्टर्स, कोस्ट गार्डच्या जवानांनी रेस्क्यू आॅपरेशन सुरू केलं. अनेक प्रयत्न करून अखेर गाळात खोल अडकलेल्या दोनही एसटीच्या गाड्या व चारचाकी गाडी शोधण्यात यश आलं.गेले काही दिवस कोकण व मुंबईत तुफान पाऊस पडतोय आणि त्यात सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली, अशी बातमी ऐकायला मिळाली की, या दुर्घटनेची आठवण ताजी होते.२ आॅगस्ट २०१६ ची भयाण अमावस्येची रात्र एसटी कर्मचाऱ्यांसाठी न विसरता येणारी. त्या रात्री सावित्री नदीच्या लाटांच्या रुद्रावताने १०० वर्षे जुन्या पुलाला आपल्या पोटात सामावून घेतले आणि या दुर्घटनेत एसटी महामंडळाच्या दोन बसेससह तीन छोट्या वाहनांना आणि त्यातील सुमारे ४० निष्पाप जीवांना जलसमाधी मिळाली. सुमारे १०-१२ दिवस इथे रेस्क्यू आॅपरेशन चाललं. त्यानंतर ढासळलेल्या पुलाच्या जागी केवळ १६५ या विक्रमी दिवसांत शासनाने नवीन पूल उभारला. पण, आजही सावित्रीने धोक्याची पातळी ओलांडली म्हटलं की, अनेकांना या दुर्घटनेची आठवण होते. जयगड-मुंबई गाडीचे चालक श्रीकांत कांबळे व त्यांचा मुलगा महेंद्र मात्र खूप दुर्दैवी ठरले. खरेतर, कांबळे मुंबई रूट कधीच करत नव्हते. केवळ मुंबईला मुलगा महेंद्रचे इंजिनीअरिंगचे अ‍ॅडमिशन दुसºया दिवशी माटुंगा येथे करायचे होते, म्हणून आगार व्यवस्थापकांना विनंती करून कांबळेंनी या रूटवर ड्युटी मागून घेतली होती. पण, सावित्री नदीने या दोघा पितापुत्राच्या स्वप्नांनाही वाहून नेलं होतं. चालक कांबळे २०१८ ला एसटी सेवेतून सेवानिवृत्त होणार होते. 

टॅग्स :riverनदीRainपाऊसRaigadरायगड