शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 05:37 IST

रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने कारखाने उभे राहिले आहेत. त्यामध्ये केमिकल कंपन्यांचाही अधिक भरणा आहे.

आविष्कार देसाई अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने कारखाने उभे राहिले आहेत. त्यामध्ये केमिकल कंपन्यांचाही अधिक भरणा आहे. येथील औद्योगिक वसाहतींमध्ये अधून-मधून स्फोट होऊन त्यामध्ये आतापर्यंत शेकडो निष्पाप कामगारांना आपला प्राण गमवावा लागला आहे. सातत्याने असे अपघात होत असल्याने जखमींवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यामध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध नाही. त्यामुळे मुंबईमध्ये उपचारासाठी जाण्यावाचून कोणताच पर्याय नसल्याने लवकरच अशी सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी जोर धरत आहे.माणगाव तालुक्यातील क्रिप्टझो कंपनीमध्ये शुक्रवारी झालेल्या भीषण स्फोटामध्ये १८ कामगार जखमी झाले आहेत. त्यांच्यावर माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरु करण्यात आले होते. त्यापैकी आठ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना एमजीएम आणि जेजे रुग्णालयात अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. माणगाव ते नवीमुंबई असा प्रवास या गंभीर रुग्णांना करावा लागला आहे.जिल्ह्यातीलरस्त्यांची आधीच दैना उडाली आहे. त्यामुळे त्याचा प्रवास किती वेदनादायक असेल याचा विचारच न केलेला बरा.जिल्ह्यामध्ये जिल्हा सरकारी रुग्णालय आहे. मात्र, त्यामध्ये पुरेशा सोयी-सुविधांचा अभाव आहे. तसेच डॉक्टरांचीही कमतरता असल्याने या ठिकाणी उपचार घेता येत नाहीत. जिल्ह्यामध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारावे, अशी बऱ्याच वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र, त्याकडे प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सरकार सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याने रायगडकरांची ही मागणी अद्याप पूर्ण होऊ शकलेली नाही. महाड येथे ट्रामा केअर सेंटर उभारण्यात आलेले आहे. मात्र, तेथेही पुरेसे तज्ज्ञ, मनुष्यबळ आणि सुविधांअभावी ते बंद पडलेले आहे. रोहा, माणगाव आणि महाड विभागामध्ये कंपन्याचे जाळेपसरलेले असल्याने कंपन्यांमध्ये अपघात होतच असतात. तसेच महामार्गावर होणाºया जखमींवर तातडीने उपचार मिळावेत, त्यासाठी महाड तालुक्यामध्ये ट्रामा केअर सेंटर उभारण्यात आले होते. तेही बंद असल्याने शुक्रवारी झालेल्या स्फोटामध्ये जखमी झालेल्यांना मुंबई आणि नवी मुंबईला अधिक उपचारासाठी हलवण्याची वेळ आली आहे.जिल्ह्यामध्ये कंपन्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांच्या सीएसआर फंडातून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल का उभारले जात नाही, असाही प्रश्न आहे. कारण येथीलच जमिनी घेऊन कंपन्या उभारण्यात आल्या आहेत. कंपन्यांचे उत्तरदायित्व म्हणून जिल्हाधिकारी यांनी यामध्ये पुढाकार घेऊन, असे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.>अचानक झाला स्फोटमाणगावमध्ये असलेली क्रिप्टझो ही कंपनी आग विझवण्यासाठी आवश्यक असलेली उपकरणे तयार करते. ती गॅसच्या साहाय्याने तयार केली जातात. शुक्रवारी दुपारी सुमारे ४.३० वाजता या कंपनीमध्ये या सिस्टीमचा डेमो करीत असताना अचानक स्फोट झाला, आग वाढून ती डेमो केलेल्या खोलीच्या बाहेर आली आणि बाहेर उभे असलेले कामगार भाजले गेले.>मांडवा ते मुंबई मार्गावर बोट रूग्णवाहिका सुरू करणारमाणगावमधील कंपनीमध्ये झालेला अपघात भीषण आहे. त्यातील जखमींना अधिक उपचारासाठी मुंबई, नवी मुंबई येथे हलवावे लागत आहे. वास्तविकपणे जिल्ह्यामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल होणे गरजेचे आहे. नागोठणे येथे जागेची पाहणी करण्यात आली आहे. मात्र, त्याला पाहिजे तशी गती मिळालेली नाही, असे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. रस्त्यावरील प्रवास खडतर आणि अधिक वेळ घेणारा असल्याने मांडवा ते मुंबई या मार्गावर बोट रुग्णवाहिका सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी पाच कोटी रुपयांचा खर्च आहे. कंपन्यांच्या सीएसआर फंडातून तो उभारण्यावर भर देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी सरकारकडील निधी आणि कंपन्यांच्या सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करण्याबाबतची चांगली सूचना आहे. लवकरच याबाबत कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यात येईल, असेही सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.>एकूण १८ कामगार जखमी आहेत, आठ जण गंभीररीत्या भाजले आहेत. त्यांना मुंबई आणिनवी मुंबई येथील रुग्णालयात अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले आहे, तर उर्वरित जखमींवर माणगाव रुग्णालयात उपचार सुरू आहेत.- अनिल पारस्कर,जिल्हा पोलीस अधीक्षकरायगड जिल्ह्यातील एमआयडीसीमध्ये स्वतंत्र कार्यालय नाही, तसेच प्रदूषण महामंडळाचे कार्यालयही नाही. तसेच आग विझविण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन यंत्रणा नाही, साधे प्राथमिक आरोग्य केंद्रही प्राथमिक उपचारासाठी येथे नाही. आजची ही घटना घडली तेव्हा येथून जवळच असणाºया उपजिल्हा रुग्णालयातही रुग्णवाहिका उपलब्ध नाही. येथील मशनरीही बंद अवस्थेत आहेत.- जनार्दन मानकर, सामाजिक कार्यकर्ते, निजामपूर