शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत निर्णय नाही, सुनील तटकरे यांनी घेतली माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 05:37 IST

२०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील पक्ष कार्यालयात सकाळी बैठक पार पडली. जिल्हानिहाय सर्व जागांचा आढावा घेण्यात येणार आहे.

अलिबाग : रायगड लोकसभेच्या उमेदवारीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुनील तटकरे यांनी माघार घेतली आहे. रत्नागिरीमधील त्यांचे कट्टर विरोधक माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनीही रायगड लोकसभेची जागा लढण्याची इच्छा व्यक्त केल्याने शनिवारी झालेल्या बैठकीमध्ये कोणताही निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे रायगड लोकसभा मतदार संघाचा किल्ला कोण लढवणार हे स्पष्ट झाले नाही. तटकरे यांनी माघार घेतल्याने रायगडमधली त्यांच्या समर्थकांमध्ये मात्र प्रचंड नाराजी आहे.२०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील पक्ष कार्यालयात सकाळी बैठक पार पडली. जिल्हानिहाय सर्व जागांचा आढावा घेण्यात येणार आहे. शनिवारच्या बैठकीमध्ये १७ जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. सुरुवातच लोकसभेच्या उमेदवारीवरून झाली.बैठकीमध्ये तटकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, असा त्यांच्या समर्थकांचा विश्वास होता. २०१४ साली सुनील तटकरे यांनी ही जागा शिवसेनेचे खासदार केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या विरोधात लढवली होती. त्यामध्ये तटकरे यांचा अवघ्या दोन हजार ११० मतांनी पराभव झाला होता.तटकरे यांना त्या वेळी शेकापने कडाडून विरोध केला होता. चिपळूण विधानसभेची जागा २००४ आणि २००९ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढलेले रमेश कदम यांना शेकापने उमेदवारी देऊन तटकरे यांच्या समोर कडवे आव्हान उभे केले होते.शनिवारी पार पडलेल्या बैठकीमध्ये रायगड लाकसभेच्या जागेबाबतचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्या वेळी भास्कर जाधव हे निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी जाधव यांनी सांगितले. त्यानंतर चिपळूणमधील पदाधिकाऱ्यांना विचारण्यात आले असता त्यांनी स्पष्ट भूमिका न घेता पक्ष जो उमेदवार देईल, त्याचे काम करण्यात येईल, असे सांगितले.त्यानंतर सुनील तटकरे यांनी निवडणूक लढणार नसल्याचे बैठकीमध्ये स्पष्ट केले. त्यावर शरद पवार यांनी उमेदवार जाहीर केला नसल्याचे सांगितले; परंतु संतप्त झालेल्या तटकरे यांनी मी निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही. पक्ष जो उमेदवार देईल त्याचे काम माझे कार्यकर्ते मनापासून करतील, असे ठणकावून सांगितले. त्यानंतर मावळ लोकसभेच्या जागेबाबत बैठक सुरू झाली.बैठकीत ठामपणे मागणी नाहीचसुनील तटकरे हे २०१४ ची लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार नव्हते, केवळ पक्षाचा आदेश असल्याने ते शिवधनुष्य त्यांनी उचलेले होते. त्यामध्ये त्यांचा पराभव झाला; परंतु त्यांनी गीते यांना कडवी झुंज दिली होती, हे लपलेले नाही.२०१४ चा वचपा काढण्यासाठी तटकरे यांना २०१९ साली पुन्हा संधी दिली जाईल, असा पुरा विश्वास होता. मात्र, भास्कर जाधव यांच्या नावाने माशी शिंकल्याची तटकरे समर्थकांची धारणा झाली.राष्टवादी काँग्रेसचे अली कौचाली वगळता तटकरे यांनाच रायगड लोकसभेची जागा द्यावी, अशी ठामपणे मागणी बैठकीमध्ये कोणी केली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.वास्तविक पाहता सुनील तटकरे यांनाच उमेदवारी देणे गरजेचे आहे. २०१४ सालच्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी पक्षाने दिली पाहिजे.याआधीच्या निवडणुकीत अनंत गीते हे एक लाख मताधिक्क घेऊन निवडून येत होते. मात्र, तटकरे यांनी त्यांना फक्त दोन हजार मतांवरच विजय मानण्यास भाग पाडले होते.सुनील तटकरेच त्यांना कडवे आव्हान देऊ शकतात, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोज धुमाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड