शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

चार दिवसांपासून पडतोय वादळी पाऊस; पावसाने शेकडो एकर तयार भातशेती धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 23:36 IST

नागोठणेत पिकांचे नुकसान, नागोठणे ते शेतपळस या रोहे तालुक्यातील भागात साधारणत: साडेचारशे ते पाचशे एकर शेतात भातशेती पिकविली जाते.

नागोठणे : समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्या पार्श्वभूमीवर नागोठणे विभागात मागील चार दिवसांपासून वादळी-वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतात तयार झालेली भातशेती भिजून गेली असल्याने, हातातोंडाशी आलेला घास निघून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसान झालेल्या भातशेतीचा तातडीने पंचनामा करण्याचा आदेश दिला असल्याने आपल्या भातशेतीचा कधी पंचनामा होईल, याकडे शेतकरी डोळे लावून बसला आहे. 

नागोठणे ते शेतपळस या रोहे तालुक्यातील भागात साधारणत: साडेचारशे ते पाचशे एकर शेतात भातशेती पिकविली जाते. ऑक्टोबर महिन्यात पीक तयार झाल्यावर भातशेतीची कापणी करून भाताच्या लोंबी चार-आठ दिवस शेतातच आडव्या करून ठेवल्यानंतर ते बाहेर काढून शेतातच त्याची झोडणी करून भात व पेंढा वेगवेगळा  केला जातो. पंधरा दिवसांपासून भाताच्या कापणीला सुरुवात झाली असून, यातील दीडशे ते दोनशे एकर क्षेत्रात भात शेतकऱ्यांनी सुरक्षितपणे आपल्या घरीही नेऊन ठेवले आहे. मात्र, अजूनही अडीचशे ते तीनशे एकर जमिनीवरील काही भातशेतीची कापणी करून ते शेतातच पडून आहे, तर उर्वरित भाताचे पीक कापणी न झाल्याने शेतातच उभे आहे. संभाव्य वादळामुळे मागील चार दिवसांपासून येथे पाऊस पडत असल्यामुळे शेतात पावसाचे साचून राहिले असल्याने, हातात आलेले पीक भिजल्यामुळे हातातून जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेकडो टन भाताचे नुकसान होण्याची भीती आहे व जे भात उरेल, त्याचे दाणे काळे पडणार असल्याने त्याला किंमतही येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

काढणीला आलेले पीक भिजले

रोहा : चालू वर्षात एका पाठोपाठ एक आलेली संकटे, त्यातच परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून जात असल्याचे पाहणे शेतकऱ्यांच्या नशिबी आले आहे. ‘नको देवराया अंत आता पाहू’ अशी विनवणी शेतकरी करत आहेत,  तर माजी आमदार पंडित पाटील  यांनी ओला दुष्काळ जाहीर  करावा, अशी मागणी केली आहे.

गुढीपाडव्यापासून संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर झाल्याने शेतीमालाला उठाव मिळाला नाही. लग्नसराई न झाल्याने, तसेच बाजारपेठा, हॉटेल बंद असल्याने, डाळी, कडधान्ये यासह फुले, भाजीपाला, नारळ यांना उठाव नाही. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. 

शहरात रोजगारासाठी गेलेली मंडळी रोजगार ठप्प झाल्याने गावी आल्याने, ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. तरी हिंमत न हारता शेतकऱ्याने खरिपाच्या पेरणीची तयारी केली, पण निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा कोकणात बसला.येथील आंबा, काजू, नारळ, सुपारी पिकविणारा शेतकरी अक्षरश: उद्ध्वस्त झाला. वाडवडिलांनी मोठ्या केलेल्या बागा नष्ट झाल्या. शासनाचे पाहणी दौरे झाले, तुटपुंजी मदत मिळाली. अजून अनेकांना ती मिळालेली नाही. उद्ध्वस्त घरे, शेती, बागा यांचे दु:ख सावरत कोकणात शेतकऱ्यांनी भाताची लागवड केली. पर्जन्यमान मागील चार महिने बऱ्यापैकी असल्याने भाताचे पीक हाती येईल, अशी आशा होती, पण गेला आठवडाभर झालेल्या पावसामुळे भाताचे पीक मातीमोल झाले आहे. भाताचे पीक कापणे व त्याची मळणी करण्याचा खर्चदेखील निघणार नाही, अशी शेतक ऱ्यांची भयावह परिस्थिती आहे. 

टॅग्स :floodपूरFarmerशेतकरीRainपाऊस