शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

अतिवृष्टीचा मुरूड तालुक्यातील 25 गावांना बसला दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 09:25 IST

रस्ते, पूल वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला : घरांमध्ये शिरले पाणी

ठळक मुद्देदरम्यान, मुरूडखालोखाल श्रीवर्धन तालुक्यात १५३ मि.मी., तर म्हसळा तालुक्यात १०५ मि.मी. पाऊस नोंदवला गेला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ५७ मि.मी. सरासरीने एकूण ९१२ मि.मी. पाऊस पडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करायगड : गेल्या २४ तासांत एकट्या मुरूड तालुक्यात तब्बल ४७५ मिमी पावसाची नाेंद झाली आहे. रात्रभर धुवाधार बरसणाऱ्या पावसामुळे मुरूडमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने २५ गावांतील घरांमध्ये पाणी शिरले हाेते. मच्छीमार बाेटीसह रस्ते खचून काही पूलही वाहून गेले आहेत. त्यामुळे वांदेली, काकळघर, आदड, चिकणी, विहूर,  भोईघर आणि वांडेली या गावांचा संपर्क  तुटला आहे. पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.  

काही दिवस विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. पावसाचा सर्वाधिक तडाखा हा मुरूड तालुक्याला बसला आहे. बोरली, मांडला, काकलघर, मुरूड, शिगरे, खतीब खार, आंबोली, सायगाव, वांदे, उंडर गाव, तेलवडे, खारीकवाडा, मजगाव, खरदोनकुळे, विहूर, मोरे, नांदगाव, काशीद, चिकणी, वालवती, आदाड, उसरोली, वेलास्ते, चोरधे, साळाव, अशा एकूण २५ गावांमध्ये अतिवृष्टीमुळे घरात पाणी शिरले हाेते. यामुळे गावातील एक हजार ५५० कुटुंबांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याशिवाय दुकाने, टपऱ्यांचेही नुकसान झाले आहे.  रात्री भरतीसोबतच जोरदार पावसाने हजेरी दिल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. बोर्ली व मांडला येथील घरांत पाच ते सात फुटांपर्यंत पाणी होते. त्यामुळे मुरूडकरांना रात्र जागून काढावी लागली. मंगळवारी पावसाचा जाेर काहीसा कमी झाल्याने सकाळपासून पाणी ओसरायला सुरुवात झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

पावसाने चांगलीच दाणादाण उडवून दिल्याने पावसामुळे अलिबाग- मुरूड रस्त्यावरील विहूर गावाजवळ रस्ता एका बाजूने चांगलाच खचला आहे. त्यामुळे या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू आहे. पाऊस सुरू असताना समुद्रानेही राैद्ररूप धारण केले हाेते. त्यामुळे महाकाय लाटा उसळत असल्याने मुरूडमधील मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे. किनारी भागात मच्छीमारांनी शाकारून ठेवलेल्या बोटी एकमेकांवर आदळून मच्छीमार बोटींची प्रचंड हानी झाली आहे. एकदरा समुद्रकिनारी नांगरून ठेवलेल्या बोटींचेही नांगर तुटले आहेत. समुद्रांच्या लाटांच्या माऱ्यामुळे त्या थेट मुरूडच्या समुद्र किनारी आल्याचे स्थानिक मच्छीमारांनी सांगितले. दरम्यान, मुरूडखालोखाल श्रीवर्धन तालुक्यात १५३ मि.मी., तर म्हसळा तालुक्यात १०५ मि.मी. पाऊस नोंदवला गेला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ५७ मि.मी. सरासरीने एकूण ९१२ मि.मी. पाऊस पडला आहे.

राेहा-मुरूड रत्यावर मध्यरात्री दरड काेसळल्याने या मार्गावरून वाहतूक बंद करण्यात आली हाेती. पावसाचा जाेर थांबल्यानंतर सकाळी दरड हटवण्याचे काम हाती घेण्यात आले. दरड हटवल्यानंतर मार्गावरून वाहतूक सुरू झाली आहे.-सागर पाठक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

 

टॅग्स :RaigadरायगडRainपाऊस