शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अतिवृष्टीचा मुरूड तालुक्यातील 25 गावांना बसला दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 09:25 IST

रस्ते, पूल वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला : घरांमध्ये शिरले पाणी

ठळक मुद्देदरम्यान, मुरूडखालोखाल श्रीवर्धन तालुक्यात १५३ मि.मी., तर म्हसळा तालुक्यात १०५ मि.मी. पाऊस नोंदवला गेला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ५७ मि.मी. सरासरीने एकूण ९१२ मि.मी. पाऊस पडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करायगड : गेल्या २४ तासांत एकट्या मुरूड तालुक्यात तब्बल ४७५ मिमी पावसाची नाेंद झाली आहे. रात्रभर धुवाधार बरसणाऱ्या पावसामुळे मुरूडमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने २५ गावांतील घरांमध्ये पाणी शिरले हाेते. मच्छीमार बाेटीसह रस्ते खचून काही पूलही वाहून गेले आहेत. त्यामुळे वांदेली, काकळघर, आदड, चिकणी, विहूर,  भोईघर आणि वांडेली या गावांचा संपर्क  तुटला आहे. पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.  

काही दिवस विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. पावसाचा सर्वाधिक तडाखा हा मुरूड तालुक्याला बसला आहे. बोरली, मांडला, काकलघर, मुरूड, शिगरे, खतीब खार, आंबोली, सायगाव, वांदे, उंडर गाव, तेलवडे, खारीकवाडा, मजगाव, खरदोनकुळे, विहूर, मोरे, नांदगाव, काशीद, चिकणी, वालवती, आदाड, उसरोली, वेलास्ते, चोरधे, साळाव, अशा एकूण २५ गावांमध्ये अतिवृष्टीमुळे घरात पाणी शिरले हाेते. यामुळे गावातील एक हजार ५५० कुटुंबांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याशिवाय दुकाने, टपऱ्यांचेही नुकसान झाले आहे.  रात्री भरतीसोबतच जोरदार पावसाने हजेरी दिल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. बोर्ली व मांडला येथील घरांत पाच ते सात फुटांपर्यंत पाणी होते. त्यामुळे मुरूडकरांना रात्र जागून काढावी लागली. मंगळवारी पावसाचा जाेर काहीसा कमी झाल्याने सकाळपासून पाणी ओसरायला सुरुवात झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

पावसाने चांगलीच दाणादाण उडवून दिल्याने पावसामुळे अलिबाग- मुरूड रस्त्यावरील विहूर गावाजवळ रस्ता एका बाजूने चांगलाच खचला आहे. त्यामुळे या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू आहे. पाऊस सुरू असताना समुद्रानेही राैद्ररूप धारण केले हाेते. त्यामुळे महाकाय लाटा उसळत असल्याने मुरूडमधील मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे. किनारी भागात मच्छीमारांनी शाकारून ठेवलेल्या बोटी एकमेकांवर आदळून मच्छीमार बोटींची प्रचंड हानी झाली आहे. एकदरा समुद्रकिनारी नांगरून ठेवलेल्या बोटींचेही नांगर तुटले आहेत. समुद्रांच्या लाटांच्या माऱ्यामुळे त्या थेट मुरूडच्या समुद्र किनारी आल्याचे स्थानिक मच्छीमारांनी सांगितले. दरम्यान, मुरूडखालोखाल श्रीवर्धन तालुक्यात १५३ मि.मी., तर म्हसळा तालुक्यात १०५ मि.मी. पाऊस नोंदवला गेला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ५७ मि.मी. सरासरीने एकूण ९१२ मि.मी. पाऊस पडला आहे.

राेहा-मुरूड रत्यावर मध्यरात्री दरड काेसळल्याने या मार्गावरून वाहतूक बंद करण्यात आली हाेती. पावसाचा जाेर थांबल्यानंतर सकाळी दरड हटवण्याचे काम हाती घेण्यात आले. दरड हटवल्यानंतर मार्गावरून वाहतूक सुरू झाली आहे.-सागर पाठक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

 

टॅग्स :RaigadरायगडRainपाऊस