शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
6
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
7
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
8
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
9
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
10
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
11
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
12
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
13
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
14
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
15
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
16
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
17
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
18
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
19
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
20
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO

उरणमध्ये भात कापणी अंतिम टप्प्यात; रानडुक्करांमुळे शेतीचे नुकसान,शेतकरी चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 17:35 IST

राज्यात सर्वत्र शेतीच्या कामांना वेग आला आहे.परंतु मजुरांअभावी शेतकरी चिंतेत सापडला आहे.

उरण : उरण तालुक्यात भात कापणीला  जोरदार सुरुवात झाली असून भात कापणी अंतिम टप्प्यात  आली आहे. मात्र तरीही अजून सर्वत्र शेतमजुरांची टंचाई भासत असल्याने  शेतकरी  चिंतातूर झाला आहे.

निसर्गचक्राचे बिघडलेले संतुलन आणि अवकाळी पडणारा पाऊस ही भीती शेतकऱ्यांच्या मनात आहेच. अशातच हातातोंडाशी आलेला घास हिरावूनजाऊ नये म्हणून शेतकऱ्यांची भात कापणीची धावपळ सुरू आहे. परंतु भात कापणीकरीता वेळीच मजूर मिळत नसल्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे.दरम्यान नाईलाजाने शेतकरी, आपल्याच कुटुंबातील नातेवाईकांच्या मदतीने शेतात भात कापणी करताना दिसत आहेत. उरण तालुक्यात चिरनेर विभागात अनेक ठिकाणी आदिवासी मजुरांचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.

एकेकाळी भात कापणी झाल्यानंतर पिकाची कडवे चार दिवस चांगली वाळल्यानंतरच त्याचे भारे बांधून उडव्यात  रचून ठेवले जात असत. त्यानंतर शेतातच खळा  तयार करून त्याचे व्यवस्थित शेणाने सारवण करून त्यानंतरच त्या खळ्यावर मळणीची प्रक्रिया केली जात होती.

 परंतु सध्याच्या लहरी पावसाच्या भीतीने वर्षभर केलेले  कष्ट व त्यासाठी केलेला अमाप खर्च वाया जाऊ नये म्हणून शेतकरी पिके न वाळवताच आणि त्याची साठवणूक न करताच ताबडतोब कापलेले भात पीक  झोडून भात घरी आणत आहेत. उरण तालुका भाताचे कोठार समजले जात होते. परंतु मागील काही वर्षापासून शेती व शेतकऱ्यांचे वेगवेगळ्या माध्यमातून नुकसान होत असल्याने, तसेच येथील औद्योगीकरणामुळे शेतीतील उत्पादनावर हमखास गदा येताना दिसत आहे. पूर्वी इतके भाताचे शेतीतून विक्रमी उत्पादन होत नाही .

भातशेती ही पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांना कधी ओला दुष्काळ तर कधी सुक्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी जमिनी लागवडी खाली न आणता त्या ओसाड ठेवल्या जात आहेत. त्यामुळे या भागात शेतीकडे दुर्लक्ष झालेले दिसत आहे. ज्या मूठभर शेतकऱ्यांनी भातशेतीची लागवड केली आहे. अशाही शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी मजूर उपलब्ध होत नसल्यामुळे येथील शेतकरी हवालदिल  झाला आहे. त्यातच जंगल भागात असणाऱ्या भात शेतीवर रानडुकरांची वक्रदृष्टी वळली असल्याने, भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास कळपाने पिकावर हल्ला करणारी रानडुकरे हिरावून नेत असल्याने, रानडुकरांचा वनविभागाकडून, बंदोबस्त करावा अशी मागणीही उरण परिसरातील शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.

टॅग्स :Raigadरायगडuran-acउरणFarmerशेतकरी