शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

उरणमध्ये भात कापणी अंतिम टप्प्यात; रानडुक्करांमुळे शेतीचे नुकसान,शेतकरी चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 17:35 IST

राज्यात सर्वत्र शेतीच्या कामांना वेग आला आहे.परंतु मजुरांअभावी शेतकरी चिंतेत सापडला आहे.

उरण : उरण तालुक्यात भात कापणीला  जोरदार सुरुवात झाली असून भात कापणी अंतिम टप्प्यात  आली आहे. मात्र तरीही अजून सर्वत्र शेतमजुरांची टंचाई भासत असल्याने  शेतकरी  चिंतातूर झाला आहे.

निसर्गचक्राचे बिघडलेले संतुलन आणि अवकाळी पडणारा पाऊस ही भीती शेतकऱ्यांच्या मनात आहेच. अशातच हातातोंडाशी आलेला घास हिरावूनजाऊ नये म्हणून शेतकऱ्यांची भात कापणीची धावपळ सुरू आहे. परंतु भात कापणीकरीता वेळीच मजूर मिळत नसल्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे.दरम्यान नाईलाजाने शेतकरी, आपल्याच कुटुंबातील नातेवाईकांच्या मदतीने शेतात भात कापणी करताना दिसत आहेत. उरण तालुक्यात चिरनेर विभागात अनेक ठिकाणी आदिवासी मजुरांचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.

एकेकाळी भात कापणी झाल्यानंतर पिकाची कडवे चार दिवस चांगली वाळल्यानंतरच त्याचे भारे बांधून उडव्यात  रचून ठेवले जात असत. त्यानंतर शेतातच खळा  तयार करून त्याचे व्यवस्थित शेणाने सारवण करून त्यानंतरच त्या खळ्यावर मळणीची प्रक्रिया केली जात होती.

 परंतु सध्याच्या लहरी पावसाच्या भीतीने वर्षभर केलेले  कष्ट व त्यासाठी केलेला अमाप खर्च वाया जाऊ नये म्हणून शेतकरी पिके न वाळवताच आणि त्याची साठवणूक न करताच ताबडतोब कापलेले भात पीक  झोडून भात घरी आणत आहेत. उरण तालुका भाताचे कोठार समजले जात होते. परंतु मागील काही वर्षापासून शेती व शेतकऱ्यांचे वेगवेगळ्या माध्यमातून नुकसान होत असल्याने, तसेच येथील औद्योगीकरणामुळे शेतीतील उत्पादनावर हमखास गदा येताना दिसत आहे. पूर्वी इतके भाताचे शेतीतून विक्रमी उत्पादन होत नाही .

भातशेती ही पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांना कधी ओला दुष्काळ तर कधी सुक्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी जमिनी लागवडी खाली न आणता त्या ओसाड ठेवल्या जात आहेत. त्यामुळे या भागात शेतीकडे दुर्लक्ष झालेले दिसत आहे. ज्या मूठभर शेतकऱ्यांनी भातशेतीची लागवड केली आहे. अशाही शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी मजूर उपलब्ध होत नसल्यामुळे येथील शेतकरी हवालदिल  झाला आहे. त्यातच जंगल भागात असणाऱ्या भात शेतीवर रानडुकरांची वक्रदृष्टी वळली असल्याने, भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास कळपाने पिकावर हल्ला करणारी रानडुकरे हिरावून नेत असल्याने, रानडुकरांचा वनविभागाकडून, बंदोबस्त करावा अशी मागणीही उरण परिसरातील शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.

टॅग्स :Raigadरायगडuran-acउरणFarmerशेतकरी