शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
2
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
3
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
4
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
5
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
6
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
7
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
8
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
9
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
10
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
11
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
12
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
13
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
14
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
15
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
16
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
17
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
18
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
19
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 

नववर्ष सुरुवातीलाच जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांची धामधूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:41 AM

नववर्षाच्या सुरुवातीलाच रायगड जिल्ह्यातील तब्बल ९७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.

अलिबाग : नववर्षाच्या सुरुवातीलाच रायगड जिल्ह्यातील तब्बल ९७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा कल नेमका कोणत्या पक्षाकडे अधिक आहे, हे कळू शकेल. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका याच वर्षामध्ये पार पडणार आहेत. त्याच धामधूममध्ये जिल्ह्यातील ९७ ग्रमपंचायतींची मुदत मार्च ते जून २०१९ या कालावधीमध्ये संपत आहे. निवडणूक विभागाकडून ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.देशभरात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. आगामी २०१९ वर्षे हे निवडणुकांचे वर्ष आहे. मेमध्ये लोकसभा तर आॅक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होऊ शकतात. रायगड जिल्ह्यातही आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका रंगणार आहेत. जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील ९७ ग्रमपंचायतींची मुदत येत्या मार्च ते जून या कालावधीमध्ये पूर्ण होत आहे. त्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये अलिबाग तालुक्यातील २५, मुरुड - ३, पेण- ५, पनवेल- ५, उरण-१, कर्जत- ३, खालापूर- १, माणगाव- ११, तळा- ५, रोहा- ६, महाड- १७, श्रीवर्धन- ११ आणि म्हसळा तालुक्यातील चार अशा एकूण ९७ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.सरपंचपदाची थेट निवडणूक सुरू झाल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष दक्ष झाले आहेत. त्यांनी राजकीय व्यूहरचनेमध्ये बदल करून निवडणुकांना सामोरे जाण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठीची सर्व तयारी पूर्ण केली आहे. सरपंचाला असलेले भक्कम अधिकार, मतदारांमधून होणाऱ्या थेट निवडीमुळे सरपंचपदाच्या उमेदवारीसाठी राजकीय पक्षातील उमेदवारांमध्ये चांगलीच रस्सीखेच वाढली आहे. मतदारच आपल्या आवडीचा सरपंच थेट निवडून देत असल्याने उमेदवार निवडताना नेत्यांना इच्छुकांचे मन वळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे.गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या निवडणुकांकडे पाहिल्यास विविध राजकीय पक्षांनी स्थानिक पातळीवर सोयीस्कर युत्या आघाड्या केल्या होत्या. त्यामध्ये त्यांना चांगलेच यश आल्याने आगामी निवडणुकीसाठी हाच फॉर्म्युला राहण्याची शक्यता बळावली आहे. ग्रामपंचायतींमध्ये मतदार याद्या अंतिम करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. १७ डिसेंबर २०१८ रोजी प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोग या ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे, असे निवडणूक विभागाचे रवींद्र मठपती यांनी सांगितले.

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायतRaigadरायगड