Varandha Ghat Travel Advisory: गेल्या काही दिवसांपासून कोकण आणि पुणे घाटमाथ्यावर प्रचंड पाऊस सुरू आहे. पुढील काही दिवस अतिवृष्टीचा होण्याचा इशारा दिला गेला आहे. त्यामुळे पुण्यावरून कोकणाला जोडणाऱ्या वरंध घाट मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. २० जून ते ३० सप्टेंबरपर्यंत हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वरंध घाट मार्गावर पावसाळ्यात अपघात होण्याची शक्यता असते. त्यात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. आगामी पुढे या भागात अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. जोरदार पावसामुळे या मार्गावर काही ठिकाणी दरड कोसळण्याचाही धोका आहे.
यापूर्वीही या मार्गावर दरड कोसळणे, रस्ता खचणे, रस्ताचा भराव वाहून जाणे, वाहनांचा अपघात घडून जीवित व वित्त हानी झालेली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी हा मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
वाचा >>मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
कोणत्या मार्गाने प्रवास करता येणार?
वरंध घाट मार्ग २० जूनपासून ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहे. या काळात कोकणातून पुण्याला जाण्यासाठी राजेवाडी फाटा-महाड-माणगाव-ताह्मिणी घाट-पुणे या मार्गाचा वापर करता येईल. त्याचबरोबर कोल्हापूरला जाण्यासाठी राजेवाडी फाटा-पोलादपूर-खेड-चिपळून-कराड-कोल्हापूर या मार्गाने प्रवास करता येईल.