शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

आवक वाढल्याने फळांचा व्यवसाय तेजीत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 11:09 PM

मार्गशीर्ष महिन्यात व्रत व पूजा करताना पाच फळांची गरज असल्याने फळांचा व्यवसाय सध्या तेजीत आहे.

माणगाव : माणगाव शहरांतील बाजारपेठेत फळांची आवक वाढल्याने फळ विक्रेत्यांचा व्यवसाय तेजीत आहे. मार्गशीर्ष महिन्यात फळांची आवक व विक्री वाढल्याने फळांचे दर स्थिर आहेत.

माणगाव बाजारपेठांमध्ये सफरचंद, डाळिंब, केळी, संत्री, मोसंबी, पेरू, पपई विविध प्रकारची फळे यांची आवक वाढली आहे. सातारा, पुणे जिल्ह्यातील व्यापारी माणगावमध्ये टेम्पो घेऊन येतात. त्यामुळे स्थानिक फळविक्रेते व परजिल्ह्यातील व्यापाऱ्यांमध्ये चुरस निर्माण झालेली दिसून येते. बाहेरून येणारे फळविक्रेते दोन-तीन दिवसांत विक्री करून मूळ गावी रवाना होतात. त्याच्याकडून वाजवी दरात फळे उपलब्ध होत असल्याने ग्राहकांमधूनही समाधान व्यक्त होते.

मार्गशीर्ष महिन्यात व्रत व पूजा करताना पाच फळांची गरज असल्याने फळांचा व्यवसाय सध्या तेजीत आहे. पाच फळे ही ५० रुपये दराने बाजारात विक्रीसाठी आहेत. सध्या सफरचंद १०० रुपये किलो, मोसंबी संत्री ८० रुपये किलो, तर चिकू ७५ रुपये किलो व केळी ४० रुपये डझन या भावाने बाजारात उपलब्ध आहेत. पूजेसाठी आवश्यक मनपसंतीची व उत्तम दर्जाची फळे या विक्रेत्यांकडून कमी दरात उपलब्ध होत असल्याने महिलावर्गातूनही समाधान व्यक्त होत आहे.

टॅग्स :fruitsफळेMarketबाजारRaigadरायगड