शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
2
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
3
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
5
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
6
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
7
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
8
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
9
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
10
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
11
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
12
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
13
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
14
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
15
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
16
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
17
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
18
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
19
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
20
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल

चौपदरीकरणाचे काम २०१९ पर्यंत पूर्ण होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2018 4:49 AM

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचा पाहणी दौरा : सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

माणगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यावर पडलेले खड्डे गणेशोत्सवापूर्वी भरण्यात येणार आहेत. शिवाय या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम २०१९ वर्षअखेर पूर्ण करणार असल्याची ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मुंबई-गोवा महामार्गाची रखडलेली कामे व खड्डेमय रस्त्याच्या पाहणीसाठी चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पनवेल ते माणगाव दौरा केला. माणगाव येथील विश्रामगृहात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी केंद्रीय अवजडमंत्री अनंत गीते, रायगडचे पालक मंत्री रवींद्र चव्हाण, आ. प्रशांत ठाकूर, आ. भरत गोगावले, आ. अनिकेत तटकरे, आ. निरंजन डावखरे, रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे आदी उपस्थित होते. त्याचबरोबर माणगाव उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव- दिघावकर, तहसीलदार ऊर्मिला पाटील, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्गाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कोकणातील अतिवृष्टी, महामार्गावरून सुरू असलेली सततची अवजड वाहतूक आणि वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे महामार्गाची दुर्दशा झाली आहे. महामार्गाचे पहिल्या टप्प्याचे काम निधीअभावी रखडले होते. मात्र आता केंद्राकडून १० हजार कोटींचा निधी उपलब्ध झाल्याने पनवेल ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा पत्रादेवीपर्यंतचे काम डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करू, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. महामार्गाचे काम दोन टप्प्यात हाती घेण्यात आले असून पनवेल ते इंदापूरपर्यंत दोन टप्पे करण्यात आले आहेत. महामार्गाला सिमेंट काँक्र ीटच्या रस्त्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. या संपूर्ण रस्त्याचे काँक्रीटीकरण करणार असून १० ते १२ वर्षांत रस्त्यावर खड्डा पडणार नाही याची काळजी घेतली जाईल, तरीही खड्डे पडले तर त्यास ठेकेदाराला जबाबदार धरले जाईल. कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी मुंबईतून कोकणात येतात. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी मुंबई- गोवा महामार्गावर सर्व खड्डे बुजवण्यात येतील, असे पाटील यांनी सांगितले.वाकण पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचा आदेशनागोठणे : महामार्गाच्या पाहणी दौऱ्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील पनवेल ते पोलादपूर दरम्यान वाकण नाका येथे काही काळ थांबले. जुन्या पुलाची दुरुस्ती करण्याचे गरजेचे असल्याने त्यांनी पुलाचे तातडीने स्ट्रक्चरल आॅडिट करून दुरुस्ती करावी, असा आदेश संबंधित अधिकाºयांना दिला. पुलाच्या शेजारी नव्याने बांधकाम होत असलेल्या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, तसेच सध्या वापरात असलेला जुना पूल राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग करावा असे निर्देशही दिले.आंबेत पुलाची दुरु स्ती येत्या दोन महिन्यात पूर्ण करणार असून त्यासाठी १५ कोटींच्या खर्चाला पाटील यांनी मंजुरी दिली. हे काम राज्याच्या बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे पुलाचे आयुष्यमान ५ वर्षांनी वाढणार आहे.आंबेत पुलाच्या जागी नवीन पूल बांधण्यासाठी १५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सदर पुलाचा प्रस्ताव राज्याने लवकरात लवकर सादर केल्यावर केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून प्रस्तावाला मंजुरी घेण्याचे अभिवचन खासदार अनंत गीते यांनी दिले. नवीन पूल येत्या दोन वर्षात पूर्ण करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलroad safetyरस्ते सुरक्षाMumbaiमुंबई