शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचाराविरोधात उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 11:56 PM

पनवेल तालुक्यातील पालीदेवद सुकापूर ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा समितीने योजनेमध्ये भ्रष्टाचार केल्याचा अहवाल जिल्हा परिषदेने दिला आहे. असे असताना संबंधितावर कारवाई करण्यास रायगड जिल्हा परिषद प्रशासन टाळाटाळ करत आहे.

अलिबाग : पनवेल तालुक्यातील पालीदेवद सुकापूर ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा समितीने योजनेमध्ये भ्रष्टाचार केल्याचा अहवाल जिल्हा परिषदेने दिला आहे. असे असताना संबंधितावर कारवाई करण्यास रायगड जिल्हा परिषद प्रशासन टाळाटाळ करत आहे. या विरोधात रायगड जिल्हा परिषदेतील भाजपाचे सदस्य अमित जाधव यांनी योगेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, राजेश पाटील, महेश पाटील या सहकाऱ्यांसह बेमुदत उपोषण सुरू केले आहे.याबाबत गुन्हा दाखल करण्याचे पत्र पालीदेवद ग्रामपंचायतीने १५ नोव्हेंबर रोजी पोलिसांना दिले आहे. त्यामुळे उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी आंदोलकांना बुधवारी सायंकाळी केली. मात्र गटविकास अधिकाºयांना गुन्हा दाखल करण्याचे अधिकार असल्याने त्यांनी तसे करावे, अशी मागणी आंदोलकांनी लावून धरल्याने आजच्या दिवशी उपोषणाचा गुंता सुटला नाही.पाणीपुरवठा समितीने भ्रष्टाचारासारखा गंभीर गुन्हा केलेला आहे. त्यामुळे संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल केल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा अमित जाधव यांनी दिला आहे.२०१४ ते २०१७ या कालावधीत पाणी समितीचे अध्यक्ष एकनाथ भोपी आणि सचिव जी.आर.नाईक यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे सादर केले होते. पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीचे गठण केली होती. या प्रकरणात अनियमितता असल्याचा अहवाल साळुंखे समितीने दिला. मात्र एक वर्षाचा कालावधी लोटला तरी, गुन्हा दाखल करण्यात आला नाही, वरवर पाहता हा भ्रष्टाचार २२ लाख रुपयांचा दिसत असता तरी, सखोल चौकशी केल्यास हा आकडा दोन कोटी रुपयांच्या घरात असल्याचा दावा अमित जाधव यांनी केला. याबाबत माहिती अधिकारात मिळालेली माहिती गटविकास अधिकाºयांना सुपूर्द करण्यात आलेली आहे. असे असताना जिल्हा परिषद प्रशासन संबंधितांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. समितीचे अध्यक्ष भोपी यांनी २० जून २०१८ रोजी पालीदेवद ग्रामपंचायतीकडे १८ लाख रुपये जमा केले आहेत. याचाच त्यांनी रक्कम भरुन गुन्ह्याची कबुली दिली आहे. रक्कम भरल्याने त्यांनी केलेला गुन्हा कमी होत नसल्याचेही ते म्हणाले.यातील गंभीर बाब म्हणजे २००८ साली समितीची स्थापना झाल्यापासून २०१४-२०१५ पर्यंतचे दप्तर मागितले होते, मात्र दप्तर जाळून पुरावा नष्ट केला आहे. सरकारी दप्तर नष्ट करण्याआधी कायदेशीर प्रक्रिया त्यांनी पूर्ण केलेली नसल्याने हा गंभीर गुन्हा आहे, असे ृग्रामपंचायत सदस्य योगेश पाटील यांनी सांगितले. याबाबत कारवाई होण्याचे पत्र मुख्यकार्यकारी अधिकारी देत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरुच राहणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले. पनवेलचे गटविकास अधिकारी डी.एन.तेटगुरे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.सदरची पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी केली आहे. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा याच्याशी काहीच संबंध येत नसल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय वेंगुर्लेकर यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणी