शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

माणगाव तालुक्यातील भातशेती पाण्यात गेल्याने शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 2:12 AM

जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून संपूर्ण कोकणासह रायगड जिल्ह्याला सततच्या पावसाने झोडपले असल्याने माणगाव तालुक्यातील हजारो हेक्टर भातशेती पावसाच्या पाण्याखाली आली आहे.

माणगाव : जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून संपूर्ण कोकणासह रायगड जिल्ह्याला सततच्या पावसाने झोडपले असल्याने माणगाव तालुक्यातील हजारो हेक्टर भातशेती पावसाच्या पाण्याखाली आली आहे. यामुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. पावसाचे, नदीनाल्यांचे, पुराचे पाणी शेतात राहिल्याने भातशेती खराब झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग नुकसानीमुळे घाबरला आहे.शेतकऱ्यांनी पारंपरिक पध्दतीने भातशेतीची लावणी करून घेतली. या संततधार पावसाने काही भागातील लावणीसुध्दा करावयाची बाकी राहिली आहेत तर भातशेतीचे आवाण(रोप) चांगली उगवली, परंतु या पावसाचे पाणी तुडुंब शेतात भरल्याने रोपे कुजली आहेत. त्यामुळे शेतकरी आवाण (रोप) लावण्याकरिता आवाण शोधत फिरताना दिसत आहेत.माणगाव तालुक्याची भौगोलिक स्थिती पाहता सदर डोंगर, टेकड्या, नद्या-नाले यांनी व्यापले आहे.त्यामुळे या भागात पावसाळ्यात जोरदार अतिवृष्टी झाल्यावर डोंगर माथ्यावरील पावसाचे पाणी त्या त्या ठिकाणच्या नाल्यातून ओहळाद्वारे नदीत जाते. या पाण्यामुळे माणगावमधील काळ नदीस पूर येते. पुराचे पाणी सखल भागातील भातशेतीत घुसल्याने भातशेती खराब झाली आहे. पर्यायी शेतकºयाची मेहनत व आर्थिक नुकसान माणगाव तालुक्यात झाले आहे.माणगाव विभागात गोरेगाव विभाग, पेण- खरवली विभाग, मोर्बा विभाग, लोणेरे विभाग, इंदापूर विभाग, निजामपूर विभागातील शेतकºयाची हजारो हेक्टर भातशेती पाण्याखाली येवून नुकसान झाले आहे.शासनाने त्वरित पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करून शेतकºयांना मदत मिळावी ही मागणी होत आहे.>संततधार पावसाने शेतात पाणी तुंबल्याने सखल भागातील शेती कुजून खराब झाल्याचे, तसेच लावणी केलेली शेती सुध्दा खराब होवू लागल्याचे निदर्शनास आले आहे. प्राथमिक अंदाजानुसार ३०० ते ४०० एकर शेतजमीन तालुक्यात खराब झाल्याचे दिसते, तरी उर्वरित रोपे शेतकºयांनी एककाडी पध्दतीने शेती करावी जेणेकरून रोपे कमी लागतील.-पी.बी. नवले, तालुका कृषी अधिकारी, माणगाव>आमच्या शेतीची लावणी लवकर केली होती. परंतु या सततच्या पडणाºया पावसाने आमची भातशेती पाण्यात बुडून गेल्याने खराब झाली आहे.-उदय गायकवाड, शेतकरीमाझ्या शेतीमधील आवाण पावसाने खराब झाले आहे. आता या शेतीत आवाण शोधण्याकरिता मी फिरत आहे.-दुर्वास म्हशेळकर,शेतकरी, गोरेगाव