शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
2
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
3
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
4
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
5
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
6
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
7
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
8
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
9
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
10
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
11
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
12
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
13
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
14
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
15
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
16
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
17
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
18
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
19
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
20
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ

‘एमआयडीसी’विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार, बंधाऱ्यांंच्या दुरुस्तीअभावी शहापूर-धेरंडमधील शेतीचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 8:35 PM

Rajgad News: खाडीकिनारी असणाऱ्या बंधाऱ्यांची दुरुस्ती केली नसल्याने १५० शेतकऱ्यांचे हाती आलेले पीक देखील वाय जात असल्याने तीन वर्षांची दाेन काेटी ६४ लाख ७५ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी करत ‘एमआयडीसी’विरोधातील रोष आता कायदेशीर लढाईतून व्यक्त केला जाणार आहे.

रायगड : अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंडमधील जमिनी एमआयडीसीने संपादित केल्या आहेत. परंतु खाडीकिनारी असणाऱ्या बंधाऱ्यांची दुरुस्ती केली नसल्याने १५० शेतकऱ्यांचे हाती आलेले पीक देखील वाय जात असल्याने तीन वर्षांची दाेन काेटी ६४ लाख ७५ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी करत ‘एमआयडीसी’विरोधातील रोष आता कायदेशीर लढाईतून व्यक्त केला जाणार आहे.

अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंडमधील ३८७.७७ इतके हरी-२ मध्ये मोडणारे क्षेत्र नगर रचना विभागाची विनापरवानगी संपादित करण्यात आले. ही सर्व जमीन खारभूमीचे उपजाऊ क्षेत्र आहे. पण गेल्या तीन वर्षांपासून मोठे शहापूर पूर्व भागातील खार बंधिस्थीजवळ ५० मीटर लांबीचे व २० मीटर खोली असलेले भगदाड पडले आहे. त्यामुळे २५ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान येथील संरक्षण बांध फुटून हाताताेंडाशी आलेले भात पिकामध्ये खारे पाणी घुसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच भातशेतीचे पूर्व मशागतीचा खर्च, उत्पादनातील घट आणि रोजगार बुडाल्यामुळे तीन वर्षांत जवळपास दाेन काेटी ६४ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांचे झाले असल्याने एमआयडीसीने शहापूर-धेरंड परिसरातील १५० शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाच्यामार्फत शेतकऱ्यांनी केली आहे.

३५० खार बंधारे दुर्लक्षितचया भागातील शेती, गावे उच्चतम भरती रेषेच्या दाेन मीटर खाली आहेत. या क्षेत्राचे संरक्षण गेली ३५० वर्षे खार बंधारे करीत आहेत. येथील जमिनी एमआयडीसीने २००९ साली संपादित केल्यानंतर या खार बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि नूतनीकरण याची जबाबदारी एमआयडीसीकडे आहे. हे समजावून देण्यासाठी शेतकऱ्यांना एमआयडीसीच्या अंधेरी येथील मुख्यालयाजवळ दोन वेळा आंदोलने केली आहेत.

आश्वासनांवरच बोळवण२३ नाेव्हेबर २०१९ रोजी श्रमिक मुक्ती दल आणि सहायक मुख्य कार्यकरी अधिकारी अविनाश सुबेदार यांच्या दालनात बैठक झाली. सदर बैठकीत संपादनाशी निगडित बांधाची जबाबदारी एमआयडीसीने घेण्याचे इतिवृत्तातील मुद्दा क्रमाक पाचमध्ये मान्य केले. परंतु तात्पुरत्या दुरुस्तीपलीकडे आजतागायत काहीही झालेले नाही.

सामाजिक चळवळीची जन्मभूमीया जमिनीत सरखेल कान्होजी आंग्रे, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, दिवंगत ना. ना. पाटील, दिवंगत तांडेल, जागतिक कीर्तीच्या विचारवंत डॉ. गेल ओम्व्हेट, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या विचारांची आणि संघर्षाची बीज या मातीत दडली आहेत.

 एमआयडीसीने जमीन संपादित केल्यानंतर बांध बंधिस्थी सुस्थितीत ठेवण्याचे, त्याची दुरुस्ती करण्याचे मान्य केलेले आहे. असे असताना आता टाळाटाळ होत असल्याने त्यांची शिक्षा शेतकऱ्यांना भाेगावी लागत आहे. त्यामुळे आमचा हक्क मिळेपर्यंत कायदेशीर आणि शांततेच्या मार्गाने लढा सुरूच राहणार आहे.- राजन भगत, श्रमिक मुक्ती दल

टॅग्स :Raigadरायगड