शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

‘एमआयडीसी’विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार, बंधाऱ्यांंच्या दुरुस्तीअभावी शहापूर-धेरंडमधील शेतीचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 20:35 IST

Rajgad News: खाडीकिनारी असणाऱ्या बंधाऱ्यांची दुरुस्ती केली नसल्याने १५० शेतकऱ्यांचे हाती आलेले पीक देखील वाय जात असल्याने तीन वर्षांची दाेन काेटी ६४ लाख ७५ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी करत ‘एमआयडीसी’विरोधातील रोष आता कायदेशीर लढाईतून व्यक्त केला जाणार आहे.

रायगड : अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंडमधील जमिनी एमआयडीसीने संपादित केल्या आहेत. परंतु खाडीकिनारी असणाऱ्या बंधाऱ्यांची दुरुस्ती केली नसल्याने १५० शेतकऱ्यांचे हाती आलेले पीक देखील वाय जात असल्याने तीन वर्षांची दाेन काेटी ६४ लाख ७५ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी करत ‘एमआयडीसी’विरोधातील रोष आता कायदेशीर लढाईतून व्यक्त केला जाणार आहे.

अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंडमधील ३८७.७७ इतके हरी-२ मध्ये मोडणारे क्षेत्र नगर रचना विभागाची विनापरवानगी संपादित करण्यात आले. ही सर्व जमीन खारभूमीचे उपजाऊ क्षेत्र आहे. पण गेल्या तीन वर्षांपासून मोठे शहापूर पूर्व भागातील खार बंधिस्थीजवळ ५० मीटर लांबीचे व २० मीटर खोली असलेले भगदाड पडले आहे. त्यामुळे २५ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान येथील संरक्षण बांध फुटून हाताताेंडाशी आलेले भात पिकामध्ये खारे पाणी घुसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच भातशेतीचे पूर्व मशागतीचा खर्च, उत्पादनातील घट आणि रोजगार बुडाल्यामुळे तीन वर्षांत जवळपास दाेन काेटी ६४ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांचे झाले असल्याने एमआयडीसीने शहापूर-धेरंड परिसरातील १५० शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाच्यामार्फत शेतकऱ्यांनी केली आहे.

३५० खार बंधारे दुर्लक्षितचया भागातील शेती, गावे उच्चतम भरती रेषेच्या दाेन मीटर खाली आहेत. या क्षेत्राचे संरक्षण गेली ३५० वर्षे खार बंधारे करीत आहेत. येथील जमिनी एमआयडीसीने २००९ साली संपादित केल्यानंतर या खार बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि नूतनीकरण याची जबाबदारी एमआयडीसीकडे आहे. हे समजावून देण्यासाठी शेतकऱ्यांना एमआयडीसीच्या अंधेरी येथील मुख्यालयाजवळ दोन वेळा आंदोलने केली आहेत.

आश्वासनांवरच बोळवण२३ नाेव्हेबर २०१९ रोजी श्रमिक मुक्ती दल आणि सहायक मुख्य कार्यकरी अधिकारी अविनाश सुबेदार यांच्या दालनात बैठक झाली. सदर बैठकीत संपादनाशी निगडित बांधाची जबाबदारी एमआयडीसीने घेण्याचे इतिवृत्तातील मुद्दा क्रमाक पाचमध्ये मान्य केले. परंतु तात्पुरत्या दुरुस्तीपलीकडे आजतागायत काहीही झालेले नाही.

सामाजिक चळवळीची जन्मभूमीया जमिनीत सरखेल कान्होजी आंग्रे, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, दिवंगत ना. ना. पाटील, दिवंगत तांडेल, जागतिक कीर्तीच्या विचारवंत डॉ. गेल ओम्व्हेट, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या विचारांची आणि संघर्षाची बीज या मातीत दडली आहेत.

 एमआयडीसीने जमीन संपादित केल्यानंतर बांध बंधिस्थी सुस्थितीत ठेवण्याचे, त्याची दुरुस्ती करण्याचे मान्य केलेले आहे. असे असताना आता टाळाटाळ होत असल्याने त्यांची शिक्षा शेतकऱ्यांना भाेगावी लागत आहे. त्यामुळे आमचा हक्क मिळेपर्यंत कायदेशीर आणि शांततेच्या मार्गाने लढा सुरूच राहणार आहे.- राजन भगत, श्रमिक मुक्ती दल

टॅग्स :Raigadरायगड