शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
2
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
3
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
4
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
5
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
6
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
7
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
8
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
9
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
10
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
11
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
12
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
13
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
14
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
15
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
16
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
17
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
18
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
19
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
20
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर

विकास निधी खर्च करण्यात आघाडी; जिल्ह्यातील ९४ टक्के निधी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 00:25 IST

जिल्हा वार्षिक आराखड्यातील ९४ टक्के निधीचा विनियोग करून रायगड जिल्ह्याने कोकणात आघाडी घेतली आहे, तर शिल्लक ६ टक्के निधी मार्च महिनाअखेर खर्ची पडणार आहे.

- जयंत धुळपअलिबाग : जिल्हा वार्षिक आराखड्यातील ९४ टक्के निधीचा विनियोग करून रायगड जिल्ह्याने कोकणात आघाडी घेतली आहे, तर शिल्लक ६ टक्के निधी मार्च महिनाअखेर खर्ची पडणार आहे. जिल्ह्यास मिळालेल्या निधीपैकी एकही पैसा राज्य सरकारकडे परत जाणार नाही. गेल्या दोन वर्षात जिल्ह्याने ९९ टक्के विकास निधी खर्च केला आहे.लोकसभा निवडणूक एप्रिल महिन्यात होणार असल्याने, जिल्हा विकास आराखड्यांची कामे आचारसंहिता लागण्यापूर्वी मार्गी लावण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी बैठकीत सर्व संबंधित यंत्रणांना दिल्या होत्या. परिणामी नियोजन विभागाने सर्व विभागांच्या कामांना मंजुरी देऊ न निधी वितरित केला होता. हा निधी मार्चअखेर खर्च करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.गेल्या आर्थिक वर्षात जिल्ह्याने ९९ टक्के विकास निधी खर्च केला होता. त्यामुळे यंदाही विकास निधी खर्ची पडेल यासाठी जिल्हा नियोजन मंडळाने प्रयत्न केले होते. त्याचे सकारात्मक परिणाम प्राप्त झाले आहेत. पतन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, समाजकल्याण विभाग, ग्रामीण रुग्णालय, पाणीपुरवठा विभाग, माहिती व जनसंपर्क विभाग, पशुसंवर्धन विभागांचा अपवाद सोडला तर बहुतांश सर्व विभागांनी आपला विकास निधी खर्च केला आहे. अनुसूचित जमाती उपयोजनांसाठी ५३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. हा निधी शंभर टक्के खर्च झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त आकडेवारीवरून दिसून येत आहे.१४० कोटींचा निधी १५ मार्चअखेर खर्चजिल्हा नियोजन आराखड्यानुसार, गाभा क्षेत्रातील १४९ कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. यापैकी १४० कोटींचा निधी १५ मार्चअखेर खर्च झाला. हे प्रमाण ९४ टक्के आहे. तर बिगर गाभा क्षेत्रातील ३९ कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. यातील ३२ कोटींचा निधी खर्च झाला आहे. हे प्रमाण ७८ टक्के आहे.ज्या विभागांनी आपल्याकडील विकास निधी खर्च केला नाही त्या सर्व विभागांनी मार्चअखेर निधी खर्च करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कुठलाही विकास निधी समर्पित होणार नाही या पद्धतीने नियोजन करण्याची सक्त सूचना खातेप्रमुखांना देण्यात आली आहे.

टॅग्स :MONEYपैसा