शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकरी मदतीचा मुद्दा गाजला; कृषिमंत्री आधी म्हणाले, ‘नाही’ नंतर म्हणाले, ‘हो, प्रस्ताव आला’
2
आजचे राशीभविष्य, ४ डिसेंबर २०२५: अचानक धनप्राप्ती अन् विविध फायदे होतील, ज्याने आनंदित व्हाल
3
रुपया नव्वदीपार, गाठला ऐतिहासिक तळ; महागाई वाढणार, विद्यार्थ्यांपासून गृहिणींपर्यंत सर्वांना बसणार फटका
4
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
5
लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन
6
Indigo Flights Issue: ...म्हणून इंडिगोची सेवा ढेपाळली; १०० पेक्षा जास्त विमाने झाली रद्द
7
राज्यात सरासरी ६७.६३% मतदान; तळेगाव दाभाडे तळात, तर कोल्हापुरातील मुरगूड अव्वल 
8
Aadhar Card Update: आता घरबसल्या अपडेट करा 'आधार', नाव, मोबाइल, पत्ता घरीच बदलता येणार
9
नवी मुंबईतील शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
10
मुंबईसह देशभर विमानतळांवर गोंधळ, २०० विमाने झाली रद्द; बोर्डिंग पास हाताने लिहिण्याची आली वेळ 
11
महामुंबईतील १९ आरएमसी प्लांट बंद, तीन उद्योगांची प्रत्येकी पाच लाखांची बँकहमी जप्त
12
महाडमध्ये दोन गटांतील राड्याप्रकरणी विकास गोगावलेंसह २० जणांवर गुन्हा, परस्परविरोधी तक्रारी दाखल
13
इंडिगोची दोन्ही विमाने रद्द; १२ तास ताटकळले संभाजीनगरकर
14
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
15
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
16
IND vs SA Turning Point Of The Match : ती एक चूक नडली! यशस्वीमुळे टीम इंडिया ठरली अपयशी
17
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
18
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
19
IND vs SA : पंचांनी चेंडू बदलून दिला, पण... KL राहुलनं कोणावर फोडलं पराभवाचं खापर?   
20
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

विकास निधी खर्च करण्यात आघाडी; जिल्ह्यातील ९४ टक्के निधी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 00:25 IST

जिल्हा वार्षिक आराखड्यातील ९४ टक्के निधीचा विनियोग करून रायगड जिल्ह्याने कोकणात आघाडी घेतली आहे, तर शिल्लक ६ टक्के निधी मार्च महिनाअखेर खर्ची पडणार आहे.

- जयंत धुळपअलिबाग : जिल्हा वार्षिक आराखड्यातील ९४ टक्के निधीचा विनियोग करून रायगड जिल्ह्याने कोकणात आघाडी घेतली आहे, तर शिल्लक ६ टक्के निधी मार्च महिनाअखेर खर्ची पडणार आहे. जिल्ह्यास मिळालेल्या निधीपैकी एकही पैसा राज्य सरकारकडे परत जाणार नाही. गेल्या दोन वर्षात जिल्ह्याने ९९ टक्के विकास निधी खर्च केला आहे.लोकसभा निवडणूक एप्रिल महिन्यात होणार असल्याने, जिल्हा विकास आराखड्यांची कामे आचारसंहिता लागण्यापूर्वी मार्गी लावण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी बैठकीत सर्व संबंधित यंत्रणांना दिल्या होत्या. परिणामी नियोजन विभागाने सर्व विभागांच्या कामांना मंजुरी देऊ न निधी वितरित केला होता. हा निधी मार्चअखेर खर्च करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.गेल्या आर्थिक वर्षात जिल्ह्याने ९९ टक्के विकास निधी खर्च केला होता. त्यामुळे यंदाही विकास निधी खर्ची पडेल यासाठी जिल्हा नियोजन मंडळाने प्रयत्न केले होते. त्याचे सकारात्मक परिणाम प्राप्त झाले आहेत. पतन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, समाजकल्याण विभाग, ग्रामीण रुग्णालय, पाणीपुरवठा विभाग, माहिती व जनसंपर्क विभाग, पशुसंवर्धन विभागांचा अपवाद सोडला तर बहुतांश सर्व विभागांनी आपला विकास निधी खर्च केला आहे. अनुसूचित जमाती उपयोजनांसाठी ५३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. हा निधी शंभर टक्के खर्च झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त आकडेवारीवरून दिसून येत आहे.१४० कोटींचा निधी १५ मार्चअखेर खर्चजिल्हा नियोजन आराखड्यानुसार, गाभा क्षेत्रातील १४९ कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. यापैकी १४० कोटींचा निधी १५ मार्चअखेर खर्च झाला. हे प्रमाण ९४ टक्के आहे. तर बिगर गाभा क्षेत्रातील ३९ कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. यातील ३२ कोटींचा निधी खर्च झाला आहे. हे प्रमाण ७८ टक्के आहे.ज्या विभागांनी आपल्याकडील विकास निधी खर्च केला नाही त्या सर्व विभागांनी मार्चअखेर निधी खर्च करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कुठलाही विकास निधी समर्पित होणार नाही या पद्धतीने नियोजन करण्याची सक्त सूचना खातेप्रमुखांना देण्यात आली आहे.

टॅग्स :MONEYपैसा