शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

पावसाळी वस्तूंची मागणी घटल्याने व्यवसाय मंदावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 23:11 IST

उष्णता वाढली : लावणीचे काम करताना शेतकरी हैराण; पावसाने पाठ फिरवल्यामुळे श्रीवर्धन तालुक्यातील दुकानदारांचे नुकसान

गणेश प्रभाळेदिघी : गायब झालेल्या पावसाने जरा शेतकरी हवालदिल झाला आहे, तसेच बाजारपेठेतील अनेक विक्रेत्यांवरही त्यामुळे संक्रांत आली आहे. पावसाने पाठ फिरविल्यामुळे पावसाशी संबंधित वस्तूंची उलाढाल थांबली आहे. छत्री, रेनकोट, पावसाळी चप्पल, प्लॅस्टिक कागद, जर्किन, गाड्यांचे कर्व्हर यांची उलाढाल पूर्णपणे थांबली आहे. श्रीवर्धन तालुक्यातील विविध गाव-शहरात पावसाळी वस्तूंची मागणी करणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण कमी आहे.

दरम्यान, ऐन जून महिन्यात सुरुवातीला पडणाºया पावसाने अखेरच्या आठवड्यात पडून विश्रांती घेतली आहे. कमाल ३० तर किमान २३ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान आहे. सायंकाळी काहीसा पाऊस पडला तरीही स्थिती कायम आहे. पावसाने दडी मारल्याने पावसाळ्याशी संबंधित वस्तूंचा साठा करणाºया दुकानदारांचे मात्र नुकसान होणार आहे. पावसाने दडी मारल्यामुळे या वस्तूंच्या खरेदीकडे ग्राहकांनीही पाठ फिरविली आहे. पावसाळ्यात प्लॅस्टिकच्या चपलांची मोठ्या प्रमाणावर उलाढाल होते. प्लॅस्टिक चप्पल, बूट, सँडल अशा वस्तू व्यापाऱ्यांनी पावसाआधीच दुकानात भरून ठेवल्या. मात्र, गेल्या महिनाभरात म्हणावा तसा पाऊस न झाल्याने ग्राहकांनीही या वस्तूंच्या खरेदीकडे पाठ फिरविली आहे. या वस्तूंची शहरातील प्रत्येक दुकानदाराकडे किमान पाच लाख रुपयांपर्यंतची खरेदी असते. त्यात चप्पल, बुटांसह रेनकोट, छत्र्या, गाड्यांचे कव्हर्स, पावसाळी टोप्या आणि स्वेटर्सचाही समावेश आहे.

जून महिना हा पावसाळी वस्तू खरेदीसाठी सुगीचा महिना असतो. मात्र, जुलै हा महिनाही कोरडा गेला. खरेदी केलेला माल ठेवायचा कुठे? असा प्रश्न विक्रेत्यांसमोर आहे. छत्रीदुरुतीचे काम करणाºया विक्रेत्यांनाही मंदीच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

बोर्लीपंचतन शहरातील शिवाजी चौक, गणेश चौक या परिसरातील प्लॅस्टिक व पावसाळी गरजेच्या वस्तू विक्रे त्यांची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. दिवसभर ग्राहक फिरकत नसल्यामुळे त्यांचाही रोजगार बुडाला आहे. पावसाळ्यात वेगवेगळ्या प्रकारचे जर्किन्स आणि स्वेटर्सची सुमारे चार ते पाच लाख रुपयांची उलाढाल थांबली आहे. आतापर्यंत दिसणाºया रंगबिरंगी छत्र्याही दिसत नाहीत. त्यामुळे छत्र्यांबरोबरच दुरुस्तीचीही कामे बंद आहेत. दरम्यान, पंख्यांची दुरुस्ती करणाºया विक्रे त्यांकडे मात्र उन्हाळ्याप्रमाणेच महिन्याला किमान दहा ते पंधरा पंख्यांच्या दुरुस्तीची कामे येत आहेत, असे व्यावसायिकांनी सांगितले.छत्र्या दुरुस्ती करणारे कारागीर हवालदिलपावसाळा सुरू झाल्यानंतर छत्र्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू होतात. एखाद्या ठिकाणी बसल्यानंतरही दिवसभर उठता येत नाही, एवढा हंगामी व्यवसाय मिळतो. मात्र, यावर्षी घरोघरी फिरूनही कोणीही दुरुस्तीचे काम दिलेले नाही. त्यामुळे छत्री दुरुस्तीचा हंगामी व्यवसायही करता आलेला नाही, असे छत्री दुरुस्ती करणारे सांगतात. जून महिन्यात खरेदीसाठी दुकानात तुडुंब गर्दी होते. यंदा मात्र एखाद-दुसरे ग्राहक येत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. एकूण व्यवसायावर ५० टक्के परिणाम झाला आहे, असे दुकानदारांनी सांगितले.वातावरणात बदल दिसत असून पावसाला सुरुवात झाली आहे. आज दिवसभर बोर्लीपंचतन परिसरात पाऊस सुरूच असल्याने पुढे व्यवसायात नक्की वाढ होण्याची शक्यता आहे. - राजकुमार, दुकानदार, बोर्लीपंचतन

टॅग्स :Rainपाऊस