शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

शेतीच्या कामांना वेग आल्याने साहित्य खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 00:23 IST

रायगडमध्ये बळीराजा लागला कामाला : मशागतीची कामे अंतिम टप्प्यात, हातउसने पैसे घेऊन बी-बियाण्यांची केली खरेदी

अलिबाग : सुरुवातीला कोरोनाचे सावट आणि नंतर निसर्ग चक्रीवादळाने दिलेला तडाखा असे दुहेरी संकट रायगडवर ओढवले होते. जिल्ह्यातील ग्रामीण भागांतील नागरिक स्थिरस्थावर होण्यासाठी अद्यापही चाचपडत आहेत. मात्र, शहरातील नागरिक पावसापासून रक्षण करण्यासाठी कामाला लागले आहेत. घराच्या डागडूजी बरोबरच शेतीच्या कामांना आता वेग आला आहे. त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे.मान्सून अगदी तोंडावर आल्यामुळे शेतकऱ्यांना खरीपाचे वेध लागल्याने मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. त्यामुळे शेतांमध्ये वर्दळ पाहायला मिळत आहे.

एकीकडे मार्च महिन्याच्या अंतिम टप्प्यात टाळेबंदी झाल्याने सर्वत्र शांतता होती. सरकारने खरीपपूर्व शेतीकामांना शिथिलता दिल्यानंतर पेरणीपूर्व नांगरणी, सपाटी अशी कामे सुरू झाली होती. मात्र, कोरोनाचे सावट असल्याने मजूर ही भेटणे अशक्य झाले होते. बाजारपेठेत शेतीच्या अवजारास बियाणांच्या खरेदीला गेल्यावर एकाच ठिकाणी वस्तू मिळाली नसल्याने शेतकºयांची ससेहोलपट झाली होती. मागील बुधवारी जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार फटका बसल्यामुळे शेतीकामाची गती मंदावली होती. मात्र, आता मंगळावारपासून पुन्हा वेगाने सुरू झाली आहेत.जिल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष घालून खरीपाच्या तोंडावर पीककर्ज उपलब्ध करून दिल्यास शेतकºयाला मोठा आधार होणार आहे. त्यातच वादळामुळे काही ठिकाणी नुकसान झाल्याने शेतकºयांसमोर अनेक अडचणी उभ्या आहेत. आज सर्व उद्योग अडगळीत असताना शेती उद्योग सुरू आहे. मात्र अचानक निसर्ग वादळाच्या फटक्याने शेतकरी राजाचे खच्चीकरण झाले आहे.एकीकडे पडझड झालेल्या घरांची डागडूजी करण्यासाठी बाजूला ठेवलेले पैसे खर्च करावे लागत आहे. येणाºया पावसापासून आपला व आपल्या घरांचा बचाव करण्यासाठी त्यांना संरक्षण देण्यासाठी मेणकापड, ताडपत्री खेरीदी करताना दिसत आहेत. काहींनी हात उसणे पैसे घेऊन बी-बीयाण्यांची खरेदी केली असून निसर्ग वादळाचा तडाखा बसल्याने पुन्हा एकदा मशागतीच्या कामांना मंगळवार पासून मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली आहे.मान्सून दाखल झाल्यावर फळझाड लागवडीला वेगदरवर्षी मान्सून येण्यापूर्वी शेतकरी फळबाग लागवडीसाठी नियोजन करायचे.मात्र वादळामुळे फळबाग लागवड ठप्प झाली आहे. नर्सरी तसेच विविध रोपवाटिकांमध्ये अद्यापही कलम व रोप तेथेच पडून आहेत. चांगल्या वाढ झालेल्या अवस्थेत या रोपांची व कलमांची विक्र ीही रखडलेली आहे. त्यामुळे याचा फटका रोपवाटिका विक्रेत्यांनाही बसलेला आहे. विविध प्रकारची कलमे व रोपे चांगल्या वाढ झालेल्या अवस्थेत आली असून ती परिपक्व होऊन विक्र ीच्या प्रतीक्षेत आहेत. मान्सून दाखल झाल्यानंतर फळझाड लागवडीसाठी वेग येणार असल्याचे रोपवाटिका विक्र ेत्यांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग