शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

शेतीच्या कामांना वेग आल्याने साहित्य खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 00:23 IST

रायगडमध्ये बळीराजा लागला कामाला : मशागतीची कामे अंतिम टप्प्यात, हातउसने पैसे घेऊन बी-बियाण्यांची केली खरेदी

अलिबाग : सुरुवातीला कोरोनाचे सावट आणि नंतर निसर्ग चक्रीवादळाने दिलेला तडाखा असे दुहेरी संकट रायगडवर ओढवले होते. जिल्ह्यातील ग्रामीण भागांतील नागरिक स्थिरस्थावर होण्यासाठी अद्यापही चाचपडत आहेत. मात्र, शहरातील नागरिक पावसापासून रक्षण करण्यासाठी कामाला लागले आहेत. घराच्या डागडूजी बरोबरच शेतीच्या कामांना आता वेग आला आहे. त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे.मान्सून अगदी तोंडावर आल्यामुळे शेतकऱ्यांना खरीपाचे वेध लागल्याने मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. त्यामुळे शेतांमध्ये वर्दळ पाहायला मिळत आहे.

एकीकडे मार्च महिन्याच्या अंतिम टप्प्यात टाळेबंदी झाल्याने सर्वत्र शांतता होती. सरकारने खरीपपूर्व शेतीकामांना शिथिलता दिल्यानंतर पेरणीपूर्व नांगरणी, सपाटी अशी कामे सुरू झाली होती. मात्र, कोरोनाचे सावट असल्याने मजूर ही भेटणे अशक्य झाले होते. बाजारपेठेत शेतीच्या अवजारास बियाणांच्या खरेदीला गेल्यावर एकाच ठिकाणी वस्तू मिळाली नसल्याने शेतकºयांची ससेहोलपट झाली होती. मागील बुधवारी जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार फटका बसल्यामुळे शेतीकामाची गती मंदावली होती. मात्र, आता मंगळावारपासून पुन्हा वेगाने सुरू झाली आहेत.जिल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष घालून खरीपाच्या तोंडावर पीककर्ज उपलब्ध करून दिल्यास शेतकºयाला मोठा आधार होणार आहे. त्यातच वादळामुळे काही ठिकाणी नुकसान झाल्याने शेतकºयांसमोर अनेक अडचणी उभ्या आहेत. आज सर्व उद्योग अडगळीत असताना शेती उद्योग सुरू आहे. मात्र अचानक निसर्ग वादळाच्या फटक्याने शेतकरी राजाचे खच्चीकरण झाले आहे.एकीकडे पडझड झालेल्या घरांची डागडूजी करण्यासाठी बाजूला ठेवलेले पैसे खर्च करावे लागत आहे. येणाºया पावसापासून आपला व आपल्या घरांचा बचाव करण्यासाठी त्यांना संरक्षण देण्यासाठी मेणकापड, ताडपत्री खेरीदी करताना दिसत आहेत. काहींनी हात उसणे पैसे घेऊन बी-बीयाण्यांची खरेदी केली असून निसर्ग वादळाचा तडाखा बसल्याने पुन्हा एकदा मशागतीच्या कामांना मंगळवार पासून मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली आहे.मान्सून दाखल झाल्यावर फळझाड लागवडीला वेगदरवर्षी मान्सून येण्यापूर्वी शेतकरी फळबाग लागवडीसाठी नियोजन करायचे.मात्र वादळामुळे फळबाग लागवड ठप्प झाली आहे. नर्सरी तसेच विविध रोपवाटिकांमध्ये अद्यापही कलम व रोप तेथेच पडून आहेत. चांगल्या वाढ झालेल्या अवस्थेत या रोपांची व कलमांची विक्र ीही रखडलेली आहे. त्यामुळे याचा फटका रोपवाटिका विक्रेत्यांनाही बसलेला आहे. विविध प्रकारची कलमे व रोपे चांगल्या वाढ झालेल्या अवस्थेत आली असून ती परिपक्व होऊन विक्र ीच्या प्रतीक्षेत आहेत. मान्सून दाखल झाल्यानंतर फळझाड लागवडीसाठी वेग येणार असल्याचे रोपवाटिका विक्र ेत्यांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग