शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
3
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
4
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
5
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
6
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
7
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
8
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
9
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
10
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
11
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
12
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
13
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
14
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
15
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
16
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
17
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
18
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
19
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
20
Swami Samartha: स्वामींना आवडणारी 'ही' एकच गोष्ट सोडा; स्वामी सगळं चांगलंच करतील!

वळके गावात व्यावसायिक गाळ्यावर घरांचे बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 3:04 AM

रायगड जिल्हा परिषदेमधील एकामागून एक घोटाळे समोर येत आहेत. मुरुड तालुक्यातील वळके ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचार आता उघड झाला आहे.

अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेमधील एकामागून एक घोटाळे समोर येत आहेत. मुरुड तालुक्यातील वळके ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचार आता उघड झाला आहे. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक आणि ग्रामसेविका यांना विस्तार अधिकारी यांनी दोषी ठरवले आहे. घोटाळेबाजांच्या विरोधात अहवाल असतानाही उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांनी अद्यापही कोणतीच ठोस कारवाई होत नसल्याने परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.प्रशासनाने दोषींवर कडक कारवाई न केल्यास ग्रामस्थांसह जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या राजश्री मिसाळ यांनी दिला आहे.वळके ग्रामपंचायतीने १९९४-९५, १९९५-९६ या कालावधीत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत मंजूर करुन ग्रामपंचायतीच्या मालकीच्या येसदे येथील जागेवर व्यावसायिक गाळ््यांचे बांधकाम केले होते. दारिद्र्य रेषेखाली तसेच बेरोजगार असलेल्या तरुणांना हे गाळे भाड्याने देऊन त्यामार्फत ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढावे या हेतूने गाळ््यांचे बांधकाम करण्यात आले होते. सदरचे चार गाळे ग्रामपंचायत सदस्य किशोर काजारे यांना ग्रामपंचायतीने भाडेतत्त्वावर दिले होते. त्यानंतर २०१३ रोजी किशोर यांनी आपल्या ग्रामपंचायत सदस्य पदाचा गैरवापर करुन गाळ््यांच्या जागेवर पक्क्या घरांचे बांधकाम केले. तसेच ग्राम निधी विकासासाठी न वापरता स्वत:च्या फायद्यासाठी वापरला गेला. दोन्ही प्रकरणात किशोर यांनी ग्रामसेवक राहुल पोरे आणि ग्रामसेविका आशा बिरवाडकर, स्वप्नाली नाईक यांना हाताशी धरुन ग्रामपंचायतीची मिळकत लाटण्याचा प्रयत्न केला. त्या विरोधात ग्रामस्थांनी पंचायत समिती यांच्याकडे २०१५ रोजी तक्रार केली होती, अशी माहिती पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मोहिते यांनी दिली. या गैरव्यवहाराबाबत पंचायत समितीने डोळेझाक केली होती, असेही त्यांनी स्पष्टकेले.ग्रामस्थांनी लावलेल्या सातत्याच्या रेट्यामुळे अखेर पंचायत समितीने विस्तार अधिकारी चव्हाण यांना याबाबतचा तपास करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार विस्तार अधिकारी चव्हाण आणि गटविकास अधिकारी वाणी यांनी याबाबतचा अहवाल तयार केला. त्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य किशोर काजारे, ग्रामसेवक राहुल पोरे, ग्रामसेविका आशा बिरवाडकर यांच्यासह अन्य काही जण दोषी असल्याचा अहवाल पंचायत समितीसह जिल्हा परिषदेला दोन महिन्यांपूर्वीच पाठवलाआहे. दरम्यान, रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.>अहवाल ग्रामपंचायतीकडे धूळखातगेल्या दोन महिन्यांपासून रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडे अहवाल धूळखात पडलेला आहे. उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर यांनी या अहवालावर अद्याप कारवाई का केली नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.प्रकाश खोपकर हे कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण होऊन ते त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्या राजश्री मिसाळ यांनी केला आहे.